शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पंचनाम्यांनी बळीराजा बेहाल : नंदुरबारात उभ्या पिकांचेच केवळ पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीनंतर आता शेतक:यांसमोर दुसरे संकट उभे ठाकले आह़े शेतात उभ्या असलेल्या कपाशी पिकांचेच केवळ पंचनामे करण्यात येत असल्याने इतर शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े सर्वच कपाशीच्या क्षेत्रांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत               ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीनंतर आता शेतक:यांसमोर दुसरे संकट उभे ठाकले आह़े शेतात उभ्या असलेल्या कपाशी पिकांचेच केवळ पंचनामे करण्यात येत असल्याने इतर शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े सर्वच कपाशीच्या क्षेत्रांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत               आह़े यंदा कपाशी उत्पादक शेतक:यांच्या मेहनतीवर बोंडअळीने पाणी फेरले होत़े पांढरे सोनं उगवणा:या शेतक:यांना यामुळे मोठा आर्थिक तोटाही सहन करावा लागत आह़े नंदुरबार जिल्ह्यात साधारणत 1 लाख 2 हजार हेक्टर कपाशीच्या क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र बोंडअळीग्रस्त आह़े बोंडअळीच्या थैमानामुळे येथील शेतक:यांसमोर अनेक संकटे निर्माण झाली आह़े कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम अंतीम टप्प्यात सुरु आह़े परंतु पंचनामे करताना ज्या शेतक:यांच्या शेतात कापूस पिक आह़े त्याच शेतक:यांच्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आह़े परंतु खरे तर, बहुतेक कपाशी उत्पादक शेतक:यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावानंतर आपल्या कपाशीच्या क्षेत्रावर नांगर फिरवला होता़ व आपली जमीन दुसरे पिक घेण्यासाठी रिकामी केली होती़ परंतु अशा शेतक:यांच्या शेतात सध्या कपाशीचे पिक नसल्यामुळे ते पंचनाम्यापासून वंचित राहत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे अशा शेतक:यांच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न यातून निर्माण होत आह़े त्यामुळे ज्या शेतक:यांनी आपल्या शेतात नांगर फिरवले आहे, अशांच्या क्षेत्राचेही पंचनामे आवश्यक असल्याचे मत शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े शेतकरी सापडताय दुहेरी संकटातयंदा कपाशीवर बोंडअळीने थैमान घातले होत़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून शेतक:यांकडून कपाशीवर लावण्यात आलेल्या सर्व पैसा वाया गेला तर दुसरीकडे कृषी विभागाकडूनही पंचनामे करताना भेदभाव करण्यात येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे सांगण्यात येत आह़े कपाशीवर मोठा खर्च झाला आह़े त्यातच, बोंडअळीने पिकाला कुरतळल्याने शेतक:यांची सर्व मेहनत व पैसा वाया गेला आह़े नंदुरबार तसेच शहादा तालुक्यात मोठय़ा संख्येने कपाशीचे उत्पादन घेण्यात येत असत़े परंतु या ठिकाणी बहुतांश शेतक:यांनी बोंडअळीमुळे कापसाच्या पिकावर नांगर फिरवत दुस:या पिकासाठी शेत रिकामे केले आहेत़ परंतु या ठिकाणच्या बहुतेक शेतक:यांच्या कपाशीच्या क्षेत्राचे पंचनामे झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े     अनेक ठिकाणी शेतक:यांनी कजर्बाजारी होऊन कपाशीचे पिक घेतले आह़े परंतु त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांना डोळ्यासमोर कपाशीच्या क्षेत्रावर नांगर फिरवावा लागला होता़ त्यातच आता कृषी विभागाकडूनही अशा प्रकारे हेळसांड होत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े प्रशासनाने शेतक:यांचा विचार करुन पंचनामे करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े