शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांमुळे रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साठून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ पावसामुळे उडीद, मूग या पिकांचे आधीच नुकसान झाले होते़ आताच्या सलग पावसात कापूस, सोयाबीन, पपई आदींचे नुकसान झाले आहे़ यामुळे शेतकरी हतबल झाले असून शेतातील पाण्यामुळे पिकांवर इतर रोगांचा प्रादुर्भावही वाढीस लागला आहे़गेल्या दोन वर्षात अतीवृष्टी आणि अवकाळी यांचा फटका बसल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे़ खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले़ यानंतर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली़ परंतु बियाण्याची गुणवत्ता ही खालावलेली असल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही़ यातून शेतकºयांनी दुबार पेरणी केली़ अनेकांनी दुबार पेरणी करुनही सोयाबीन उगवले नाही़ काही शेतकºयांचे सोयाबीन उगवले परंतु सलग सुरू असलेल्या पावसात हा सोयाबीन पाण्याखाली गेला असून त्यातून एक रूपयाही उत्पादन येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़तालुक्यात यंदाही शेतकºयांनी पपईची लागवड केली आहे़ जिल्ह्यातील सर्वाधिक पपई उत्पादन घेणारा तालुका म्हणून शहादा तालुक्याची ख्याती आहे़ अत्यंत खर्चिक अशा या पिकावर हजारो रुपयांचा खर्च करुन शेतकºयांनी झाडे जगवली होती़ पाणी शेतात पाणी साचले असल्याने पिकावर मरत आला असून झाडाची पाने पिवळी पडू लागली असल्याचे दिसून आले आहे़यंदा पपईवर प्रारंभीपासून करपा मोजेक या रोगाचा प्रादुर्भाव होता़ यातून झाडांवर कमीत कमी फळे दिसून येत होती़ पावसामुळे पपई पूर्णपणे कामातून गेली आहे़कापूस हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते़ तालुक्यात यंदा ५० हजार ४८२ हेक्टरवर कापसाची लागड करण्यात आली आहे़ तालुक्यात सरासरी ११८ टक्के हा कापूस लागवड झाला होता़ यामुळे शेतकºयांची मोठी भिस्त कापूस उत्पादनावर होती़ परंतू पावसामुळे तालुक्यातील मोठा हिस्सा बाधित झाला आहे़ तालुक्यात येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण होवून निश्चित आकडेवारी समोर येणार आहे़ दरम्यान सलग आठ दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारात अद्यापही पाणी साचले आहे़ परिणामी बुरशी लागून कापसाची झाडे मरू लागली आहेत़ बोंडे अती पावसामुळे सडून गेली असून ही वाताहत पाहून शेतकरी हताश झाले आहेत़ पाणी काढणे शक्य होणार नसल्याने शेतकºयांनी पिक तसेच सोडून देण्याचा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले़दरम्यान कृषी विभागासोबत संपर्क केला असता काहीच ठिकाणी पंचनामे झाल्याचा खुलासा कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी वि़भा़जोशी यांच्याकडून करण्यात आला आहे़ बºयाच ठिकाणी पथक गेलेले नाही़

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, कळंबू, टेंभा, कुरावद, कौठळ ,बिलाडी या गावांची भौगोलिक परिस्थिती पाहता या गावांच्या उत्तरेस डोंगराळ भाग आहे़ यामुळे उंचीवरून कोसळणारे पावसाचे पाणी सरळ दक्षिणेकडे येऊन पाणी साचते़ तालुक्यातील वडाळी, बामखेडा, कोंढावळ, जयनगर, धांद्रे यासह विविध गावात खोलगट भाग असल्याने पावसाचे पाणी शेतात साचते़ हीच गत तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या गावांमध्ये आहे़ परंतु याठिकाणी सातपुड्याच्या डोंगराळ भागातून उतारावरून येणाऱ्या नद्या व नाले शेतांमध्ये पाणी आणून पिकांचे नुकसान करत आहेत़४एकीकडे खरीप पिकांचे नुकसान झाले असताना शहादा तालुक्यातील रायखेड, ब्राह्मणपुरी परिसरातील गावात वादळी वारे आणि पाऊस यामुळे केळीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी होत आहे़ झाडावर आलेल्या केळीच्या घोड्यांसह झाडे कोसळली असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे़ या पिकांचे अद्याप पंचनामे झालेले नसल्याची माहिती आहे़