शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात होतोय सेंद्रीय शेतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यात येत असून यातून सेंद्रीय भाजीपाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यात येत असून यातून सेंद्रीय भाजीपाला उत्पादन घेतले जात आहे़ शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे तालुक्यात सेंद्रीय भाजीपाल्याची बाजारपेठ आकारास येत आहे़सातपुड्यात सुरु असलेल्या सेंद्रीय शेतीला बळ देण्यासाठी बेडाकुंड येथे कृषी जागृती चलो गाव की ओर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यात १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी सहभागी होऊन सेंद्रीय शेतीतील बारकावे शिकून घेतले़ यावेळी सेंद्रीय शेतीबाबत राजेंद्र वसावे यांनी शेतकºयांना मार्गदर्शनक केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल जावरे होते़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश येथून जैविक शेतीचा प्रचार प्रसार करणारे ओम कुमार , मिºया वळवी, सुपा वळवी, भरत पाडवी, योगेश्वर बुवा, रामजी पाडवी, संजय वळवी, नारसिंग वळवी, कविताबाई वळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राजेंद्र वसावे यांनी सेंद्रीय शेतीची सुरुवात ही नवीन सुदृढ भारताची सुरुवात आहे़ जैविक शेतीकडे भविष्यात सर्वच शेतकरी वळतील रासायनिक शेती पर्यावरण व सजीवांच्या जीवनात धोका ठरू लागली आहे. सातपुड्यातील जैविक शेती ही सर्वांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला़ कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेंद्रीय शेती करण्याचे फायदे आणि त्यासाठी लागणाºया विविध घटकांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले़बेडाकुंड येथील मिºया वळवी, सुपा वळवी य त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने जैविक शेतीसाठी पुढाकार घेत भाजीपाला उत्पादन सुरु केली होते़ त्यांचा कित्ता इतर शेतकºयांनी गिरवत या भागात मोठ्या प्रमाणाव सेंद्रीय शेतीला सुरुवात झाली आहे़ यांतर्गत फुलकोबी, पाणकोबी, मेथी ,कोथिंबीर ,कांदे, लसूण, टमाटे, वांगी या भाजीपाला पिकांची लागवड करुन उत्पादन घेतले जाते़ या उत्पादनाला मोलगी, अक्कलकुवा आणि नंदुरबार येथे विक्रीसाठी पाठवले जात आहे़ यातून शेतकºयांना बारमाही पैसे मिळू लागल्याने शेतकºयांच्या दैनंदिन आवकचा प्रश्न मार्गी लागला आहे़