शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

सोयाबीन बियाण्याची तपासणी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत़ या पथकांनी रविवारी उशिरापर्यंत पाच ठिकाणी कारवाई केली़ यात विसरवाडी ता़ नवापूर येथे एका कंपनीचे खत भेसळयुक्त असल्याचे समोर आल्याने संबधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़राज्यात खरीप हंगामात गुणवत्ता असलेले खत आणि बियाणे यांची विक्री व्हावी यासाठी कृषी विभागाने प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पथक नियुक्त केले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुका व एक जिल्हास्तरीय पथक नियुक्त करण्यात आले आहे़ या पथकांनी रविवारी अक्कलकुवा तालुक्यात वाण्याविहिर, नवापूर तालुक्यात खांडबारा, शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे तपासणी केली होती़ या दरम्यान या पाच ठिकाणी बियाणे आणि खते यांची गुणवत्ता ढासळली असल्याचे दिसून आल्याने तसेच कृषी सेवा केंद्रांचे व्यवहार बंद असल्याने कारवाई करण्यात आली़ या प्रकाराने कृषी सेवा केंद्रांच्या चालक आणि मालकांत खळबळ उडाली असून त्यांनी कंपन्यांकडून आलेल्या मालाची तपासणी करणे सुरू केले आहे़ दरम्यान सोमवारी कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी गोदामे व दुकानांची तपासणी केली आहे़ तालुका आणि जिल्हास्तरावर ही तपासणी होत आहे़सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेबाबत राज्याच्या विविध भागात तक्रारी होत आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात ही स्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीसाठी देण्याचे आदेश दिले असून बियाण्यात दोष असल्यास शेतकऱ्यांना ते बदलून देण्याचे आदेश सर्व दुकानदार आणि गोदामे यांना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़अक्कलकुवा तालुकास्तरीय भरारी पथकाने वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील महावीर व नागेश फर्टिलायझर या दुकानांमध्ये तपासणी केली असता, अनियमितता आढळल्याने खत नियंत्रण कायदा १९८५ अन्वये खतव्रिकी बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी गढरी यांनी बजावले यावेळी तालुका गुणनियंत्रण अधिकारी बोराळे उपस्थित होते़खांडबारा ता़ नवापूर येथील कुबेर कृषी सेवा केंद्र, शांताई कृषी सेवा केंद्र येथेही खत विक्री बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी व्ही़डी़चौधरी यांनी रविवारी काढले आहेत़खत विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेल्या विक्रेत्यांची कागदपत्रांची तपासणी विभागाकडून केली जात आहे़जिल्हास्तरीय पथकाने शहादा येथे विजय ट्रेडर्स या दुकानावर रविवारी तपासणी केली होती़ यावेळी याठिकाणी व्यवहार बंद असल्याचे दिसून आल्यानंतर खत व बियाणे विक्री थांबवण्याचे आदेश पथकाकडून सांगण्यात आले़ शहादा शहरातीलच सातपुडा कृषी सेवा केंद्रात बियाणे विक्री बाबत अनियमितता आढळून आल्याने येथून पाच कंपन्यांच्या बियाणे विक्रीला बंदी करण्यात आली आहे़जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांची यादी तयार करुन त्यानुसार विभाग कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांची जनजागृती केली जात आहे़सोयाबीन बियाणे बाबत राज्य शासनाचे आदेश आहेत़ त्यानुसार तपासणी करुन घेत आहेत़ सर्व सहा पथके जिल्हास्तरावर कार्यरत आहेत़ संपूर्ण खरीप हंगामात दुकानांची तपासणी सुरु राहणार आहे़ बोगस बियाणे व खत आढळल्यास तात्काळ कारवाई होणार आहे़-नरेंद्र महाले, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग, नंदुरबाऱ