शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्याची तपासणी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत़ या पथकांनी रविवारी उशिरापर्यंत पाच ठिकाणी कारवाई केली़ यात विसरवाडी ता़ नवापूर येथे एका कंपनीचे खत भेसळयुक्त असल्याचे समोर आल्याने संबधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़राज्यात खरीप हंगामात गुणवत्ता असलेले खत आणि बियाणे यांची विक्री व्हावी यासाठी कृषी विभागाने प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पथक नियुक्त केले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुका व एक जिल्हास्तरीय पथक नियुक्त करण्यात आले आहे़ या पथकांनी रविवारी अक्कलकुवा तालुक्यात वाण्याविहिर, नवापूर तालुक्यात खांडबारा, शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे तपासणी केली होती़ या दरम्यान या पाच ठिकाणी बियाणे आणि खते यांची गुणवत्ता ढासळली असल्याचे दिसून आल्याने तसेच कृषी सेवा केंद्रांचे व्यवहार बंद असल्याने कारवाई करण्यात आली़ या प्रकाराने कृषी सेवा केंद्रांच्या चालक आणि मालकांत खळबळ उडाली असून त्यांनी कंपन्यांकडून आलेल्या मालाची तपासणी करणे सुरू केले आहे़ दरम्यान सोमवारी कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी गोदामे व दुकानांची तपासणी केली आहे़ तालुका आणि जिल्हास्तरावर ही तपासणी होत आहे़सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेबाबत राज्याच्या विविध भागात तक्रारी होत आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात ही स्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीसाठी देण्याचे आदेश दिले असून बियाण्यात दोष असल्यास शेतकऱ्यांना ते बदलून देण्याचे आदेश सर्व दुकानदार आणि गोदामे यांना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़अक्कलकुवा तालुकास्तरीय भरारी पथकाने वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील महावीर व नागेश फर्टिलायझर या दुकानांमध्ये तपासणी केली असता, अनियमितता आढळल्याने खत नियंत्रण कायदा १९८५ अन्वये खतव्रिकी बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी गढरी यांनी बजावले यावेळी तालुका गुणनियंत्रण अधिकारी बोराळे उपस्थित होते़खांडबारा ता़ नवापूर येथील कुबेर कृषी सेवा केंद्र, शांताई कृषी सेवा केंद्र येथेही खत विक्री बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी व्ही़डी़चौधरी यांनी रविवारी काढले आहेत़खत विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेल्या विक्रेत्यांची कागदपत्रांची तपासणी विभागाकडून केली जात आहे़जिल्हास्तरीय पथकाने शहादा येथे विजय ट्रेडर्स या दुकानावर रविवारी तपासणी केली होती़ यावेळी याठिकाणी व्यवहार बंद असल्याचे दिसून आल्यानंतर खत व बियाणे विक्री थांबवण्याचे आदेश पथकाकडून सांगण्यात आले़ शहादा शहरातीलच सातपुडा कृषी सेवा केंद्रात बियाणे विक्री बाबत अनियमितता आढळून आल्याने येथून पाच कंपन्यांच्या बियाणे विक्रीला बंदी करण्यात आली आहे़जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांची यादी तयार करुन त्यानुसार विभाग कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांची जनजागृती केली जात आहे़सोयाबीन बियाणे बाबत राज्य शासनाचे आदेश आहेत़ त्यानुसार तपासणी करुन घेत आहेत़ सर्व सहा पथके जिल्हास्तरावर कार्यरत आहेत़ संपूर्ण खरीप हंगामात दुकानांची तपासणी सुरु राहणार आहे़ बोगस बियाणे व खत आढळल्यास तात्काळ कारवाई होणार आहे़-नरेंद्र महाले, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग, नंदुरबाऱ