शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आदिवासी विकास विभागांतर्गत भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश द्या - राजेंद्र पाडवी, बिरसा फायटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST

तळोदा : आदिवासी विकास विभागांतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत ९४ आदिवासी उमेदवारांची निवड होऊन साधारण दोन वर्षे झाली आहेत. परंतु ...

तळोदा : आदिवासी विकास विभागांतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत ९४ आदिवासी उमेदवारांची निवड होऊन साधारण दोन वर्षे झाली आहेत. परंतु अजून पावेतो संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही. त्यामुळे या उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर असून, तातडीने त्यांना नियुक्ती आदेश पारित करावे, अशी मागणी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी केली आहे. त्यांनी आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, २०१९ मध्ये आदिवासी विकास विभागाने पेसा कायदा अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रिया राबविली होती. त्यातील ८० टक्के भरती प्रक्रिया झाली होती. मात्र, उर्वरित २० टक्के भरती प्रक्रिया अद्यापही बाकी आहे. त्यातील प्रतीक्षा यादीतील अनेक पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाली असून, कुठल्याही प्रकाराची त्रुटी नसून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत सदर नियुक्ती आदेश दिलेले नाहीत.

कागदपत्रे पडताळणी केलेल्या उमेदवारांनी वारंवार सदर आदिवासी विभाग नाशिक येथे चौकशी केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकाराची समाधानकारक माहिती दिली नाही, असा आरोप करून ज्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी झाली आहेत, अशा पात्र उमेदवारांना ताबडतोब नियुक्ती आदेश देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, बिरसा फायटर्स तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शासकीय आश्रम शाळेत शिक्षकांची वाणवा

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित आदिवासी मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची मोठी वाणवा आहे. अनेक शाळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत. एवढेच नव्हे इंग्रजी, गणित व विज्ञान यासारखे महत्त्वाचे विषय शिक्षक देखील नाहीत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अक्षरशः खेळ खंडोबा सुरू आहे. असे असताना शासन शिक्षकांची पदे भरण्यास उदासीन भूमिका घेत आहे. आश्रम शाळेत शिक्षकांचे नियोजन करताना प्रकल्प प्रशासनाला देखील तारेवरची कसरत करावी लागत असते. तरीही आदिवासी विकास विभाग दखल घ्यायला तयार नाही. निदान आदिवासी विकास मंत्र्यांनी तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ज्या आदिवासी उमेदवारांची निवड झाली आहे त्या उमेदवारांना तत्काळ आदेश पारित करण्याची ताकीद अधिकाऱ्यांना द्यावी, अशी या उमेदवारांची मागणी आहे.