शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

संपर्क साखळी तोडण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील 15 व्यक्तींची चाचणी झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:10 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोविड-१९ संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. बाधिताच्या संर्कातील किमान १५ जणांची ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कोविड-१९ संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. बाधिताच्या संर्कातील किमान १५ जणांची कोविड चाचणी करावी. कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र  भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आदी उपस्थित होते.गमे  म्हणाले, कोरोनाबाधितांच्या मृत्यूमागील कारणाच्या विश्लेषणाच्या आधारे सर्वेक्षणातील त्रृटी दूर    करण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबत संपर्क साखळी तोडण्यासाठी प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान १५ व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात यावी. मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे         असे त्यांनी सांगितले. जिल्हा    प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगल्या उपाययोजना केल्याचे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी कोरोनाबाबत उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना लसीकरणाबाबत आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तळोदा येथे ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.महसूल कामाचा आढावा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्ह्यातील महसूल कामकाजाचा आढावा घेवून कामाबाबत समाधान व्यक्त केले.  ते म्हणाले, जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कामकाजाचे चांगले नियोजन करण्यात आले आहे.  अधिकाऱ्यांनी  प्रलंबित बाबी त्वरीत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे.  जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाने शेतकऱ्यांना मोजणी नकाशे वेळेवर द्यावे.  महसूल उत्पन्नात वाढ आणि वाळू घाटांच्या लिलावावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.  उभारी कार्यक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार मिळेल असे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभही अशा कुटुंबांना देण्याची सूचना त्यांनी केली.

वसुंधरा अभियानातील मुल्यांकन वाढवावेविभागीय आयुक्तांनी वसुंधरा अभियानाचा आढावा घेतला.  ते म्हणाले, डिसेंबर अखेरपर्यंत मुल्यांकन वाढविण्याचा प्रयत्न करावा. वृक्ष लागवडीवर भर देऊन पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात यावी.  वायु संवर्धनासाठी सीएसआर अंतर्गत निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. लोणखेडा आणि प्रकाशा येथे उद्यान निर्मितीसाठी स्थानिकांना प्रोत्साहित करावे. नगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या कामाची तपासणी करुन     आढळणाऱ्या त्रृटीचे विश्लेषण करावे व त्याआधारे आवश्यक सुधारणा कराव्यात. अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.

गेल्या बैठकीतील सुचनांचा घेतला आढावा... विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी पदभार स्विकारल्यानंतर नंदुरबारचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी आढावा बैठकीत केेलेल्या सुचनांची किती व कशी अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली.गेल्या वेळी त्यांनी थेट कोरोना उपचार कक्षामध्ये जाऊन तेथील पहाणी केली होती. आता देखील कोरोना संदर्भात त्यांनी विविध सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय राजस्व अभियानाच्या अंमलबजावणीची देखील त्यांनी माहिती घेतली.