शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

तळोदा येथील जिल्हा बैठकीत पीओस प्रणालीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:50 IST

चलन न भरण्याचा एकमताने निर्णय

तळोदा : पीओएस प्रणालीतील सावळागोंधळ थांबवावा. रेशन धान्यात कपात करण्याच्या शासनाच्या अन्यायकारक धोरणास तीव्र विरोध करून या महिन्याच्या धान्यासाठी चलन न भरण्याचा निर्णय जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी मंगळवारी तळोदा येथील बैठकीत घेतला. याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाची भेटदेखील घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या या पावित्र्यामुळे ऐन सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनापुढे रेशन वाटपाचा प्रश्न निर्माण होणार            आहे. साहजिकच हा तिढा प्रशासन कसे हाताळते याकडे लक्ष लागून आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने या महिन्यापासून पीओएस यंत्रावरच रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना तशा आशयाच्या सूचना एका लेखी पत्रानुसार देण्यात आल्या असून आपोआपच धान्यातही कपात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक मंगळवारी येथील कनकेश्वर मंदिरात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन होते. व्यासपीठावर आमशा पाडवी, शानूबाई वळवी, देवीदास अल्हाटकर, जयसिंग माळी, सुरेश इंद्रजित, अरविंद कुवर, वांगीबाई पावरा, राजेंद्र गुरव आदी उपस्थित होते. या वेळी शासनाच्या गरीबांच्या रेशन धान्याबाबत अन्यायकारक धोरणामुळे त्यांना वंचित ठेवण्याचा डाव असून पीओएससारखी क्लिष्ट प्रणाली लागू केली आहे. आता तर थम्बशिवाय कार्डधारकांना स्वस्त धान्य न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे थम्ब मॅच न होणा:यांना धान्य मिळणार नाही. साहजिकच त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे. वास्तविक पीओएस प्रणाली लागू करताना त्यातील साधनसामग्री सुसज्ज करूनच लागू केली पाहिजे होती. मात्र त्यात सतत सावळागोंधळच सुरू आहे. एकीकडे शासन अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुणालाही धान्यापासून वंचित न ठेवण्याची सक्त ताकीद दुकानदारांना देते तर दुसरीकडे शासनच अशी अन्यायकारक धोरण लागू करून गरीबांना धान्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. जोपावेतो जिल्हा पुरवठा विभाग धान्याची कपात न करता 100 टक्के धान्य उपलब्ध करून देणार नाही तोपावेतो कोणत्याही दुकानदाराने प्रशासनाकडे चलन न भरता धान्याची उचल करू नये, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन, अरविंद कुवर, शानूबाई वळवी, सुरेश इंद्रजित, जयसिंग माळी            यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रावणगीर गोसावी यांनी तर सूत्रसंचालन ताराचंद साळवे यांनी केले. बैठकीला साक:या पाडवी, विजय कदम, वसंत पाडवी, यशवंत चौधरी, रमण चौधरी, पोपट माळी, दिलीप टवाळे, भालचंद्र राणे, शरफू तेली, सिंधूबाई पिंपळे, सुनील सूर्यवंशी, विनोद चौधरी यांच्यासह तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा व नंदुरबार तालुक्यातील रेशन दुकानदार महिला व पुरुष उपस्थित होते.