शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा येथील जिल्हा बैठकीत पीओस प्रणालीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:50 IST

चलन न भरण्याचा एकमताने निर्णय

तळोदा : पीओएस प्रणालीतील सावळागोंधळ थांबवावा. रेशन धान्यात कपात करण्याच्या शासनाच्या अन्यायकारक धोरणास तीव्र विरोध करून या महिन्याच्या धान्यासाठी चलन न भरण्याचा निर्णय जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी मंगळवारी तळोदा येथील बैठकीत घेतला. याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाची भेटदेखील घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या या पावित्र्यामुळे ऐन सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनापुढे रेशन वाटपाचा प्रश्न निर्माण होणार            आहे. साहजिकच हा तिढा प्रशासन कसे हाताळते याकडे लक्ष लागून आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने या महिन्यापासून पीओएस यंत्रावरच रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना तशा आशयाच्या सूचना एका लेखी पत्रानुसार देण्यात आल्या असून आपोआपच धान्यातही कपात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक मंगळवारी येथील कनकेश्वर मंदिरात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन होते. व्यासपीठावर आमशा पाडवी, शानूबाई वळवी, देवीदास अल्हाटकर, जयसिंग माळी, सुरेश इंद्रजित, अरविंद कुवर, वांगीबाई पावरा, राजेंद्र गुरव आदी उपस्थित होते. या वेळी शासनाच्या गरीबांच्या रेशन धान्याबाबत अन्यायकारक धोरणामुळे त्यांना वंचित ठेवण्याचा डाव असून पीओएससारखी क्लिष्ट प्रणाली लागू केली आहे. आता तर थम्बशिवाय कार्डधारकांना स्वस्त धान्य न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे थम्ब मॅच न होणा:यांना धान्य मिळणार नाही. साहजिकच त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे. वास्तविक पीओएस प्रणाली लागू करताना त्यातील साधनसामग्री सुसज्ज करूनच लागू केली पाहिजे होती. मात्र त्यात सतत सावळागोंधळच सुरू आहे. एकीकडे शासन अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुणालाही धान्यापासून वंचित न ठेवण्याची सक्त ताकीद दुकानदारांना देते तर दुसरीकडे शासनच अशी अन्यायकारक धोरण लागू करून गरीबांना धान्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. जोपावेतो जिल्हा पुरवठा विभाग धान्याची कपात न करता 100 टक्के धान्य उपलब्ध करून देणार नाही तोपावेतो कोणत्याही दुकानदाराने प्रशासनाकडे चलन न भरता धान्याची उचल करू नये, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन, अरविंद कुवर, शानूबाई वळवी, सुरेश इंद्रजित, जयसिंग माळी            यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रावणगीर गोसावी यांनी तर सूत्रसंचालन ताराचंद साळवे यांनी केले. बैठकीला साक:या पाडवी, विजय कदम, वसंत पाडवी, यशवंत चौधरी, रमण चौधरी, पोपट माळी, दिलीप टवाळे, भालचंद्र राणे, शरफू तेली, सिंधूबाई पिंपळे, सुनील सूर्यवंशी, विनोद चौधरी यांच्यासह तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा व नंदुरबार तालुक्यातील रेशन दुकानदार महिला व पुरुष उपस्थित होते.