शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

इतिवृत्त मंजुर करण्यास सभापतींचाच विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीतील इतीवृत्त चुकीचे लिहीले गेले, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीतील इतीवृत्त चुकीचे लिहीले गेले, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत त्यामुळे इतिवृत्त मंजुर करू नये अशी मागणी करीत सभापती अभीजीत पाटील यांनी इतिवृत्त मंजुरीच्या विषयाला विरोध केला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण ऑनलाईन पद्धतीने अध्यक्षा सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत सत्ताधारी गटातील कृषी व पशुसंर्धन समिती सभापती अभिजीत पाटील यांनी गेल्या बैठकीत झालेल्या विषयांवरील चर्चा व त्याचे लिहिलेले इतीवृत्त याबाबत आक्षेप नोंदविला. इतिवृत्तात दिलेले ठराव चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणने होते. आपण उपस्थीत केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. नियमाने काहीही झालेले नाही. आपल्या विषयीचे ठराव सर्वानुमते झालेले असल्याचे म्हटले आहे. कोणतीही चर्चा सभागृहात झालेली नसतांना इतिवृत्तात अशी नोंद झालीच कशी. तीन महिन्यांपासून पाच पत्रे दिली आहेत, परंतु एकाचेही उत्तर मिळालेले नाही. आपण बैठकीत चार प्रश्न वाचून दाखविले त्याचा साधा उल्लेख देखील इतिवृत्तात नसल्याचा आक्षेप देखील त्यांनी घेतला. आपला इतिवृत्त मंजुरीस विरोध असून विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या प्रश्नाला व आक्षेपाला अध्यक्ष व सीईओ यांनीही उत्तरे दिली नाहीत. सदस्या राजश्री गावीत यांनी १५ वा वित्त आयोगाच्या निधीचे समान वाटप व्हावे, मात्र तसे झाले नाही. व हा विषय इतिवृत्तात देखील आला नाही. त्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. पेसाचा निधी खर्च करू नये याबाबतचे पत्र ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहे. याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी सांगितले, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थलांतरीत मजुरांना काम मिळावे, त्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी हरीत सातपुडा अभियानाअंतर्गत वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम घेण्याबाबत पालकमंत्र्यांनी सुचना दिलेल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील निधी वापरावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. पेसामधील चार घटकांवर २५ टक्के प्रमाणे निधी खर्च करावयाचा आहे. त्यात शेवटचा घटक वृक्षलागवड आहे. त्यात निवड झालेल्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणार आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांशी चर्चा करून ते कार्यक्रम होणार आहेत. तोपर्यत निधी खर्च करू नये अशा सुचना आहेत. त्यात १००गावांची निवड होणार आहेत. त्यात रोपे खरेदीसाठी २५ हजार रुपये साधारणत: खर्च करावा लागणार असल्याचे रौंदळ यांनी सांगितले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा झाली. बैठक यापुढे ऑनलाईन न घेता सभागृहात घेण्याची मागणी करण्यात आली. कनेक्टीव्हीटीची अडचण येत असल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, सभापती  निर्मला राऊत, रतन पाडवी उपस्थित होते.