शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

३० गावांचा संपर्क असलेल्या प्रकाशा गावात केवळ शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशात लौकिक असलेल्या प्रकाशा ता़ शहादा येथे लॉकडाऊनमुळे जनजीवनावर मोठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशात लौकिक असलेल्या प्रकाशा ता़ शहादा येथे लॉकडाऊनमुळे जनजीवनावर मोठा परिणाम जाणवत आहे़ परंतू आरोग्य अबाधित ठेवून कोरोना हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थ घरात राहणे पसंत करत आहेत़ यामुळे गावात केवळ शांतता असून ३० गावांचा संपर्क असलेली बाजारपेठ बंद असल्याने आर्थिक घडीही विस्कटली आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूत येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता़ त्यानंतर सोमवारी सर्व काही सुरळीत होण्याची अपेक्षा असताना राज्यसरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती़ ग्रामीण भागासाठी हे बंधनकारक नसले तरीही त्यात नागरिकांनी सहभाग घेतला़ पंतप्रधान मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून मात्र गावात पूर्णपणे शुकशुकाट आहे़ प्रकाशा पोलीस दूरक्षेत्र आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व सफाई कामगार यांच्यासह केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा येथे दैनंदिन वावर आहे़ बºहाणपूर-अंकलेश्वर आणि सेंधवा-विसरवाडी या दोन महामार्गांवरचे प्रमुख गाव असल्याने गावातील तसेच चौफुलीवरचे सर्व हॉटेल्स गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत़ यामुळे बसस्थानक, गावातील गांधी चौक, गढी परिसर यासह केदारेश्वर मंदिर परिसरातही लॉकडाऊन आहे़ मंदिराच्या परिसरात राहणारे किरकोळ व्यावसायिकांची दुकानेही गेल्या चार दिवसात उघडलेली नाहीत़ मंदिरे बंद असल्याने भाविकच येत नसल्याने येथे वास्तव्य करणाºया व्यावसायिकांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ गावातील विविध भागात दररोज सायंकाळी बसणारे नागरिकही दिसून येत नसल्याने जागोजागी ठेवण्यात आलेले बाकही रिकामे आहेत़ ग्रामपंचायतीकडून गावात दोन वेळेस औषध फवारणी आणि स्वच्छता करण्यात येत आहेग़ावातील ९० टक्के नागरिक हे घरीच राहणे पसंत करत असून १० टक्के नागरिकच केवळ गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाहेर पडत आहे़ महामार्गाच्या दुसºया बाजूला वैजाली रोड परिसरातील रहिवासी वसाहतीतही शुकशुकाट आहे़प्रकाशा येथील आठवडे बाजाराला १०० वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आहे़ दर बुधवारी भरणारा हा आठवडे बाजार प्रथमच बंद पडला आहे़ येत्या बुधवारीही हा बाजार भरणार नसल्याने तळोदा आणि शहादा तालुक्यातील ३० गावांच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे़४गावात सध्या केवळ दूध, मेडीकल दुकाने, भाजीपाला, बँक, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाचे कर्मचारी दिसून येत आहेत़शेतशिवारात जाण्यास मजूरही धजावत नसल्याने शेतकऱ्यांची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत़ बहुतांश शेतकºयांनी स्वेच्छेने शेतीकामांना थांबा दिला आहे़ विशेष म्हणजे काही शेतकºयांनी मजूरांची आबाळ होवू नये म्हणून त्यांना आगाऊ रोजगार देत त्यांची सोय करुन दिली आहे़दरम्यान प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी ग्रामस्थांना मास्क वाटप केले. किराणा दुकानावर गर्दी होऊ नये यासाठी ग्राहकांमध्ये तीन फुटाचे अंतर त्यांनी ठरवून दिले आहे. गावांमध्ये रिक्षा फिरवून जनजागृती करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने दीड हजार मास्क ग्रामस्थांना वाटप केले. कोरोना सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, गटविकास अधिकारी सी़टीग़ोसावी, ग्रामसेवक बी.जी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण भिल, रफिक खाटीक, विस्तार अधिकारी भरत निकुंभे उपस्थित होते़प्रकाशा गावातील सर्वाधिक प्रसिद्ध असा मासळी बाजार आणि बॅरेजमधील मासेमारी बंद असल्याने मच्छीमारही घरीच बसून आहेत़