शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

एक हजार नागरिक क्वारंटाईनमधून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुक्त जिल्हा अशी नवी ओळख नंदुरबारला मिळाली आहे़ या यशात आणखी भर पडली असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुक्त जिल्हा अशी नवी ओळख नंदुरबारला मिळाली आहे़ या यशात आणखी भर पडली असून १० क्वारंटाईन कक्षांमधून तब्बल १ हजार २७ नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे़ याठिकाणी त्यांना उपचार देण्यासोबत त्यांची देखभालही करण्यात येत होते़प्रामुख्याने कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर क्वारंटाईन कक्षांमध्ये अनेकांची रवानगी होत होती़ कोरोनाची स्वॅब टेस्टचा अहवाल प्राप्त त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन घरी रवाना करण्यात येत आहे़ या सर्व कक्षांसाठी एकूण ३११ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका आणि एमपीडब्ल्यू यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ यात नंदुरबार येथे ३१, नवापुर ६२, शहादा ३३, तळोदा ११३, अक्कलकुवा २४ तर धडगाव येथील कक्षात १८ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कक्षांमध्ये सध्या ठेवण्यात आलेल्या ११६ जणांची प्रकृती ही ठीक झाली असल्याने त्यांना लवकरच क्वारंटाईन कक्षांमधून घरी सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान तळोदा (आमलाड) येथील विलगीकरण कक्ष हा सर्वाधिक मोठा आहे़ या कक्षात तब्बल ४० पेक्षा अधिक खोल्या असून येथे परराज्यातून आलेल्या मजूरांच्याही तपासण्या केल्या आल्या आहेत़क्वारंटाईन कक्षांतून जिल्ह्यातील विविध भागात सोडण्यात आलेल्या या नागरिकांची येत्या १५ दिवसात वेळोवेळी तपासणी करण्यावरही भर देण्यात येणार आहे़ यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण स्तरावर पथकांची नियुक्ती केली आहे़ ही पथके नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेत लक्षणे तपासणार आहेत़नंदुरबार येथे तीन, नवापुर येथे दोन, शहादा येथे दोन, तळोदा एक, अक्कलकुवा दोन तर धडगाव येथे एक असे १० क्वांटाईन सेंटर जिल्ह्यात आहेत़ ९२० बेडची क्षमता या कक्षांची आहे़ यात आतापर्यत १ हजार १४३ जणांना दाखल करण्यात आले होते़ पैकी १ हजार २७ जणांना घरी पाठवले गेले आहे़आतापर्यंत नंदुरबार येथील तीन कक्षांमधून २१६, नवापुर ४१०, शहादा येथील दोन कक्षातून १६६, तळोदा ९९, अक्कलकुवा ९० तर धडगाव येथील कक्षातून ४६ जण सोडण्यात आले आहेत़ जिल्ह्यात सर्व १० कक्ष कोरोनामुक्तीच्या लढ्यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण साधने ठरली आहेत़क्वारंटाईन कक्षात दाखल झालेल्यांचे केवळ उपचार करण्यापेक्षा त्यांच्यातून कोरोनाची भिती घालवण्यावर भर दिली़ यामुळे अनेक जणांमधील नैराश्य दूर झाले आहे़ यामुळे डॉक्टर म्हणून समाधान मिळाले आहे़-डॉ़ महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, नंदुरबाऱ