शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

‘वन पोल वन डिपी’ला कोरोनामुळे लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षापासून सुरु केलेल्या वन पोल वन डिपी योजनेला कोरोनाने ब्रेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षापासून सुरु केलेल्या वन पोल वन डिपी योजनेला कोरोनाने ब्रेक लावला आहे़ यातून १ हजार २०० प्रस्तावित लाभार्थीं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून खरीपापूर्वी त्यांना या डीपीचे वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़
शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या चार तालुक्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाकडून १ हजार २०० शेतकऱ्यांना वन पोल वन डिपीचा पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ नियमित वीज बिलांचा भरणा करुन कंपनीला सहकार्य करणाºया अर्जदार शेतकºयांना प्रथम प्राधान्य देण्याचे यातून निश्चित करण्यात आले होते़ २०१९-२० या वर्षात चार तालुक्यात एक हजार २०० शेतकºयांना कनेक्शन मिळणे निश्चित होते़ परंतू कालांतराने सुरु असलेल्या अडचणींमुळे योजना बारगळत होती़ यातच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊनची घोषणा झाली़ परिणामी वन पोल वन डिपी हा उपक्रमही थांबवण्यात आला आहे़ वीज कंपनीने ही योजना सुरु करण्यापूर्वी २०२० मध्ये लाभार्थी शेतकºयांच्या शेतात डीपी देण्याचे निर्धारित केले होते़ यानुसार अर्ज मागणी करुन डिमांड भरुन घेण्यात आली आहे़ शहादा विभागातील कोटा वाढवण्याबाबत शेतकºयांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यावर चर्चाही सुरु होती़ मात्र कोरोनामुळे ह्या सर्व चर्चा थांबल्या आहेत़ येत्या खरीप हंगामात शेतकºयांना पुन्हा जुन्या पद्धतीने पिकांचे संगोपन करण्याची वेळ येणार आहे़ बºयाच वेळा पाऊस लांबल्यास खरीप हंगामासाठी कृषीपंप हे सहाय्यकारी ठरुन पिकांना वाचवले जाते़ परंतू वीज कंपनीच्या ट्रान्सफामर्सचा पावसाळ्यात बोजवारा उडत असल्याचा प्रकार घडतो़ यामुळे या योजनेला पसंती होती़ शासनाने वीज कंपनीला आदेशित करुन योजना नव्याने सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे़ तळोदा आणि शहादा या दोन तालुक्यांसह दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील बागायतदार शेतकºयांना या स्वतंत्र डिपी कृषी क्षेत्रात प्रगतीची दारे खुलणार आहेत़
जिल्ह्याच्या विविध भागात हा उपक्रम सुरु करण्याची मागणी आहे़ नंदुरबार, नवापुर या तालुक्यातही योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकºयांना डीपीचे वाटप करुन खरीप हंंगामात दिलासा देण्यात यावा अशी अपेक्षा करण्यात येत आहे़

एकीकडे कोरोनामुळे वन पोल हा उपक्रम बंद करण्यात आला असताना दुसरीकडे कंपनीने दोन वर्षांपासून नवीन कृषीपंपांचे कनेक्शन देणे बंद केले आहे़ यातून अर्ज केलेल्या शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही़ कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही़ नवीन कनेक्शनसाठी शेतकरी डिमांड भरण्यासही तयार आहेत़
शहादा विभागातील चार तालुक्यात तब्बल २७ हजार कृषीपंप कनेक्शन आहेत़ यातील बºयाच शेतकºयांचे मागील थकीत रक्कम हा गंभीर प्रश्न आहे़ कंपनीकडून सरसकट रिडिंगची मोजणी करुन बिले पाठवली गेली असल्याने शेतकºयांच्या नावांसमोर थकबाकी दिसत आहे़ कंपनीने योग्य पद्धतीने बिले काढावीत किंवा सरसकट बिले माफ करण्यात यावी अशी शेतकºयांची मागणी आहे़ चार तालुक्यात आतापर्यंतची वीज बिलांची थकबाकी ही तब्बल ४१७ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे़
वीज कंपनीकडून बºयाच शेतकºयांना वन पोल ऐवजी सोलरपंप योजनेत समाविष्ट होण्याबाबत विचारणा केली जाते़ परंतू जमिनीत खोलवर गेलेले पाणी सोलरमुळे बाहेर येण्यास अडचणी येतील असे शेतकºयांचे म्हणणे आहे़ यामुळे वन पोल यांतर्गत नवीन कोटा वाढवून शेतकºयांना लाभ देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे़
४शहादा विभागात आतापर्यंत ७०० जणांना वन पोल वन डिपीचा लाभ दिल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आहे़

चार तालुक्यांमध्ये वन पोल वन डिपींतर्गत कनेक्शन देण्याचे काम लवकरच वेगाने सुरु होईल़ कोरोनामुळे कामकाजाला मर्यादा आल्या आहेत़ त्यावर मात करुन लवकरच शेतकºयांसाठी उपक्रम सुरु करणार असून तशी माहिती दिली जाईल़
-किसन पवार, कार्यकारी अभियंता, शहादा