शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

‘बर्ड फ्लू’चा कहर; दहा लाख कोंबड्या मारणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 02:39 IST

नवापूरमध्ये ५० कोटींचे नुकसान

- रमाकांत पाटीलनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापुरात १५ वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा बर्ड फ्लू पक्ष्यांवरील संसर्गजन्य साथ पसरली आहे. या साथीमुळे  नवापूर व परिसरातील १० लाख कोंबड्या  शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. धुळे आणि  जळगावत जिल्ह्यातही या आजाराचे काही प्रमाणात लोण पसरले आहे.नवापूर येथे पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुकूल वातावरण असल्याने माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी प्रोत्साहन दिले. तीन दशकांपासून येथे माेठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. मात्र २००६ मध्ये देशात पहिल्यांदाच येथे बर्ड फ्लूची साथ आली. त्यावेळी तब्बल पाच लाख पक्षी नष्ट करण्यात आले होते. शासनाने व्यावसायिकांना २० कोटींची मदत दिली होती. त्या आजारातून सावरण्यास या व्यवसायाला दाेन वर्षे लागली होती. पुन्हा नव्याने हा व्यवसाय उभारीस आला. तेव्हापेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या कमी झाली. पण कोंबड्यांची संख्या मात्र २००६च्या तुलनेत आता दुप्पट झाली आहे. हरियाणा कनेक्शन शासकीय सर्वेक्षणानुसार या नुकसानीचा अंदाज ३० कोटीपर्यंत आहे. त्यासंदर्भात सूक्ष्म सर्वेक्षणही सुरू आहे. या परिसरात फेरफटका मारल्यानंतर या आजाराचे हरियाणा कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. एका पोल्ट्री व्यावसायिकाने हरियाणात अतिशय स्वस्तदरात पक्षी मिळाल्याने डिसेंबरमध्ये २० हजार पक्षी आणले होते. मात्र हे पक्षी आजारी होते. पोल्ट्री धारकांना २००९ नुसार भरपाई दिली जाते. त्यात साधारणपणे ९० रुपये प्रति पक्षी  दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात तीन ते चारपटीने खर्च झाला आहे, पशुखाद्याचे दरही खूप आहेत. ही मदत खूपच कमी असल्याने पोल्ट्री धारक पुन्हा उभाच राहू शकत नाही.- अरीफभाई बलेसरिया, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन, नवापूरबर्ड फ्लूबाबत २००६ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहेत. पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- डॉ. राजेंद्र भारुड,जिल्हाधिकारी, नंदुरबारधुळे : बर्ड फ्लूचा शिरकावधुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेहेरगावच्या एक किलोमीटरपर्यंतचा भाग बाधित क्षेत्र, तर १० किलोमीटरचा परिसर हा निगराणीक्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तालुकानिहाय समितींचे गठन करण्यात आले आहे, तर दोन पोल्ट्रीफार्म सील केले आहेत. २,४७५ पक्षी रविवारी नष्ट केले.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू