शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

तीन कारखान्यांकडून एक लाख 85 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगामाला गती आली असून अवघ्या महिनाभरात तीनही साखर कारखान्यांनी दोन लाख 17 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगामाला गती आली असून अवघ्या महिनाभरात तीनही साखर कारखान्यांनी दोन लाख 17 हजार 308 टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून एक लाख 84 हजार        558 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.जिल्ह्यात यंदा मोठय़ा प्रमाणावर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने सर्वानाच त्याची चिंता लागून            आहे. विशेषत: उसाचे उत्पादन            घटेल, अशी ऊस उत्पादकांना व साखर कारखाना प्रशासनाला भीती आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा जिल्ह्यातील तीनही साखर कारखाने गेल्या हंगामाच्या तुलनेत लवकर सुरू झाले. सातपुडा साखर कारखाना           30 ऑक्टोबरला, आदिवासी कारखाना 2 नोव्हेंबर तर समशेरपूरचा कारखाना 4 नोव्हेंबरला सुरू झाला. त्यातच पहिल्या आठवडय़ातच शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने गाळपावर परिणाम झाला. त्यानंतर मात्र गाळप नियमित सुरू                झाल्याने हंगामाला गती आली आहे. यावर्षी विशेषत: मराठवाडा व इतर भागात दुष्काळाची स्थिती असल्याने ऊस तोडणीसाठी तीनही कारखान्यांकडे मजूर मोठय़ा               संख्येने आल्याने नियोजनाप्रमाणे कारखान्याचे ऊस गाळप सुरू झाले आहे.सातपुडा साखर कारखान्याने 3 डिसेंबर्पयत 82 हजार 270 टन उसाचे गाळप केले असून 8.52 च्या सरासरीने 70 हजार 75 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आदिवासी सहकारी साखर कारखान्याने 33  हजार 878 टन उसाचे गाळप केले असून 8.06 च्या सरासरीने 27            हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. समशेरपूर येथील कारखान्याने एक लाख एक               हजार 160 टन उसाचे गाळप केले असून 8.62 च्या सरासरीने 87 हजार 183 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.एकूण जिल्ह्याची स्थिती पाहता तीनही कारखान्यांतर्फे दोन लाख 17 हजार 308 टन उसाचे गाळप झाले असून सरासरी 8.49 च्या उता:याने साखरेचे एक लाख 84 हजार         558 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. समशेरपूर येथील कारखान्याची गाळप क्षमता केवळ अडीच हजार मेट्रीक टन असली तरी या कारखान्यातर्फे रोज सरासरी चार हजार टन उसाचे गाळप होत आहे तर सातपुडा साखर कारखानाही चार हजार टन उसाचे गाळप करीत आहे. यावर्षी कारखान्यातर्फे मोठय़ा प्रमाणावर गाळप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.