शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

१५ दिवसानंतर सीसीआयकडून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी सीसीसायची खरेदी १५ दिवसांपासून बंद होती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता नंदुरबार बाजार समितीने सीसीआयकडे पाठपुरावा करून पुन्हा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी भाव देखील ५,२५० ते ५,४५० मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.नंदुरबार बाजार समितीतर्फे खाजगी व्यापारी आणि सीसीआयकडून कापूस खरेदी केली जाते. यंदा डिसेंबर महिन्यापासून हे केंद्र सुरू करण्यात आले होते. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापूस उत्पादन देखील चांगले आले. परिणामी अजूनही कापूस विक्रीसाठी येत आहे. परंतु १५ दिवसांपासून सीसीआयने कापूस खरेदी अचानक बंद केली होती. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाºयांकडे कापूस विक्री करावा लागत होता. त्यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी सीसीसायच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठपुरावा करून आणखी काही दिवस सीसीआयची कापूस खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीवरून सीसीआयने पुन्हा कापूस खरेदीला सुुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी २०० वाहनेसीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात करताच पहिल्याच दिवशी तब्बल २०० वाहने खरेदी केंद्रात दाखल झाली. सर्व वाहनांमधील कापसाची खरेदी करण्यात आली. यापुढे दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधीलच कापूस खरेदी केला जाणार असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले आहे. सीसीआयच्या अटी व शर्ती कायम राहणार आहेत. चांगल्याच चांगल्या कापसाला जास्तीत जास्त भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान देखील व्यक्त होत आहे. कमीत कमी ५,२५० ते ५,४५० रुपये भाव सध्या या ठिकाणी मिळत आहे. कापूस खरेदी शुभारंभाच्या वेळी सभापती किशोर पाटील, सचिव योगेश अमृतकर, सीसीआयचे केंद्रप्रमुख आदित्य वामन, पंकज झाडे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.खेडा खरेदीत फसवणूकअद्यापही शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत होते. परिणामी मिळेल त्या भावात कापूस विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल होता. त्यातच सीसीआयची खरेदी बंद होती. परिणामी खाजगी व्यापारी खेडा खरेदीतून शेतकºयांना अगदी कमी भाव दिला जात होता. शिवाय वजन देखील सदोष राहत होते. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अद्यापही गावोगावी अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करून खेडा खरेदीत कापूस विक्री करीत आहेत.बाजार समितीचे आवाहनसीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असली तरी कापूस ठेवण्याासाठीची जागा, मणुष्यबळ लक्षात घेता दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधील कापूस लिलाव होणार आहे. यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.