शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

१५ दिवसानंतर सीसीआयकडून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी सीसीसायची खरेदी १५ दिवसांपासून बंद होती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता नंदुरबार बाजार समितीने सीसीआयकडे पाठपुरावा करून पुन्हा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी भाव देखील ५,२५० ते ५,४५० मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.नंदुरबार बाजार समितीतर्फे खाजगी व्यापारी आणि सीसीआयकडून कापूस खरेदी केली जाते. यंदा डिसेंबर महिन्यापासून हे केंद्र सुरू करण्यात आले होते. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापूस उत्पादन देखील चांगले आले. परिणामी अजूनही कापूस विक्रीसाठी येत आहे. परंतु १५ दिवसांपासून सीसीआयने कापूस खरेदी अचानक बंद केली होती. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाºयांकडे कापूस विक्री करावा लागत होता. त्यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी सीसीसायच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठपुरावा करून आणखी काही दिवस सीसीआयची कापूस खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीवरून सीसीआयने पुन्हा कापूस खरेदीला सुुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी २०० वाहनेसीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात करताच पहिल्याच दिवशी तब्बल २०० वाहने खरेदी केंद्रात दाखल झाली. सर्व वाहनांमधील कापसाची खरेदी करण्यात आली. यापुढे दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधीलच कापूस खरेदी केला जाणार असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले आहे. सीसीआयच्या अटी व शर्ती कायम राहणार आहेत. चांगल्याच चांगल्या कापसाला जास्तीत जास्त भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान देखील व्यक्त होत आहे. कमीत कमी ५,२५० ते ५,४५० रुपये भाव सध्या या ठिकाणी मिळत आहे. कापूस खरेदी शुभारंभाच्या वेळी सभापती किशोर पाटील, सचिव योगेश अमृतकर, सीसीआयचे केंद्रप्रमुख आदित्य वामन, पंकज झाडे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.खेडा खरेदीत फसवणूकअद्यापही शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत होते. परिणामी मिळेल त्या भावात कापूस विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल होता. त्यातच सीसीआयची खरेदी बंद होती. परिणामी खाजगी व्यापारी खेडा खरेदीतून शेतकºयांना अगदी कमी भाव दिला जात होता. शिवाय वजन देखील सदोष राहत होते. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अद्यापही गावोगावी अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करून खेडा खरेदीत कापूस विक्री करीत आहेत.बाजार समितीचे आवाहनसीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असली तरी कापूस ठेवण्याासाठीची जागा, मणुष्यबळ लक्षात घेता दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधील कापूस लिलाव होणार आहे. यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.