शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

तळोद्याच्या पशू मेळाव्यात एक कोटीची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : राष्टÑ उभारणीतील प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मोलाचे योगदान देणारा सर्जाराजाची नितांत आवश्यकता ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : राष्टÑ उभारणीतील प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मोलाचे योगदान देणारा सर्जाराजाची नितांत आवश्यकता भासते. शेतकऱ्यांना सोयीनुसार सर्जाराजा उपलब्ध व्हावा, यासाठी तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत पशू मेळावा घेण्यात आला. यात ८६५ बैलांची विक्री झाली असून एक कोटींची उलाढाल झाली आहे.तीन राज्यातील पशुधन तथा बैल खरीदी-विक्रीच्या सर्वात जुन्या बाजारपेठेपैकी तळोद्याची बाजारपेठ एक आहे. तळोद्याच्या बैलबाजारासह मध्यप्रदेशातील खेतिया व गुजरातमधील कंवाट या तीन बाजारपेठेत सर्वाधिक बैलांची खरे-विक्री करण्यात येते. या तिन्ही बाजारपेठेत तिन्ही राज्यातील शेतकºयांची उपस्थिती असते. याशिवाय अक्षय तृतीयाच्या कालावधीत भरणाºया बैल बाजारात देखील मोठी उलाढाल होत असते. तळोदा येथील आठवडे बाजाराच्या दिवशी भरणाºया बैल बाजारासह अन्य दिवशीही येतील बैल खरेदी-विक्रीला चांगला प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तळोद्यात पशू मेळावा भरविण्यात येत आहे.या मेळाव्याला देखील शेतकºयांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्यामुळे मेळावा भरविण्यात तळोदा कृउबाने सातत्य ठेवले आहे. यंदा १ ते ५ जानेवारी या कालावधीत हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी एक हजार बैल विक्रीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी मेळाव्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ८६५ बैलांची खरेदी-विक्री झाली. यातून एकूण एक कोटींची उलाढाल झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुत्रांमार्फत सांगण्यात आले.मेळाव्यात गुजरातमधील तापी, नर्मदा, मध्यप्रदेशातील धार व झांबूआ जिल्हा तर महाराष्टÑातून धडगाव, शहादा, अक्कलकुवा, तळोदा, साक्री व शिंदखेडा या भागातील शेतकरी तथा पशूपालकांनी बैल विक्रीसाठी आणले होते. तर खरेदीसाठी वर नमुद सर्व ठिकाणांसह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथूनही शेतकरी आले होते. मेळाव्यात शेती साहित्यही विक्रीसाठी दाखल झाले होते.फेब्रवारीनंतर दरवर्षी नंदुरबार जिल्ह्यात होणाºया सर्वच यात्रोत्सवात बैलबाजार भरविला जातो. त्यात अक्कलकुवा, खापर तर कुकरमुंडा (गुजरात) येथील यात्रोत्सवात हा बाजार भरतो. यासाठी तिन्ही राज्यातील शेतकरी उपस्थिती नोंदवत असतात. या तिन्ही प्रमुख यात्रेनंतर वर्षाअखेरीस तथा पावसाळा सुरू होण्यापूर्वी तळोदा येथे अक्षय्य तृतीयेचा यात्रोत्सव साजरा केला जातो. खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी ही यात्रा होत असल्याने हंगामात शेतीकामासाठी लागणाºया सर्जाराजांची आवश्यकता भासत असल्याने शेतकºयांची उपस्थिती मोठी असते. या यात्रेतील बैलबाजाराला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असते. हा प्रतिसाद विचारात घेत बाजार समितीमार्फत हा पशू मेळावा सुरू करण्यात आला आहे.