शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तळोद्याच्या पशू मेळाव्यात एक कोटीची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : राष्टÑ उभारणीतील प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मोलाचे योगदान देणारा सर्जाराजाची नितांत आवश्यकता ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : राष्टÑ उभारणीतील प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मोलाचे योगदान देणारा सर्जाराजाची नितांत आवश्यकता भासते. शेतकऱ्यांना सोयीनुसार सर्जाराजा उपलब्ध व्हावा, यासाठी तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत पशू मेळावा घेण्यात आला. यात ८६५ बैलांची विक्री झाली असून एक कोटींची उलाढाल झाली आहे.तीन राज्यातील पशुधन तथा बैल खरीदी-विक्रीच्या सर्वात जुन्या बाजारपेठेपैकी तळोद्याची बाजारपेठ एक आहे. तळोद्याच्या बैलबाजारासह मध्यप्रदेशातील खेतिया व गुजरातमधील कंवाट या तीन बाजारपेठेत सर्वाधिक बैलांची खरे-विक्री करण्यात येते. या तिन्ही बाजारपेठेत तिन्ही राज्यातील शेतकºयांची उपस्थिती असते. याशिवाय अक्षय तृतीयाच्या कालावधीत भरणाºया बैल बाजारात देखील मोठी उलाढाल होत असते. तळोदा येथील आठवडे बाजाराच्या दिवशी भरणाºया बैल बाजारासह अन्य दिवशीही येतील बैल खरेदी-विक्रीला चांगला प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तळोद्यात पशू मेळावा भरविण्यात येत आहे.या मेळाव्याला देखील शेतकºयांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्यामुळे मेळावा भरविण्यात तळोदा कृउबाने सातत्य ठेवले आहे. यंदा १ ते ५ जानेवारी या कालावधीत हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी एक हजार बैल विक्रीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी मेळाव्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ८६५ बैलांची खरेदी-विक्री झाली. यातून एकूण एक कोटींची उलाढाल झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुत्रांमार्फत सांगण्यात आले.मेळाव्यात गुजरातमधील तापी, नर्मदा, मध्यप्रदेशातील धार व झांबूआ जिल्हा तर महाराष्टÑातून धडगाव, शहादा, अक्कलकुवा, तळोदा, साक्री व शिंदखेडा या भागातील शेतकरी तथा पशूपालकांनी बैल विक्रीसाठी आणले होते. तर खरेदीसाठी वर नमुद सर्व ठिकाणांसह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथूनही शेतकरी आले होते. मेळाव्यात शेती साहित्यही विक्रीसाठी दाखल झाले होते.फेब्रवारीनंतर दरवर्षी नंदुरबार जिल्ह्यात होणाºया सर्वच यात्रोत्सवात बैलबाजार भरविला जातो. त्यात अक्कलकुवा, खापर तर कुकरमुंडा (गुजरात) येथील यात्रोत्सवात हा बाजार भरतो. यासाठी तिन्ही राज्यातील शेतकरी उपस्थिती नोंदवत असतात. या तिन्ही प्रमुख यात्रेनंतर वर्षाअखेरीस तथा पावसाळा सुरू होण्यापूर्वी तळोदा येथे अक्षय्य तृतीयेचा यात्रोत्सव साजरा केला जातो. खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी ही यात्रा होत असल्याने हंगामात शेतीकामासाठी लागणाºया सर्जाराजांची आवश्यकता भासत असल्याने शेतकºयांची उपस्थिती मोठी असते. या यात्रेतील बैलबाजाराला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असते. हा प्रतिसाद विचारात घेत बाजार समितीमार्फत हा पशू मेळावा सुरू करण्यात आला आहे.