शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फळ बागांसाठी एक कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील १०० शेतकऱ्यांच्या १०२ हेक्टरसाठी फळ बागाचे साधारण एक कोटी पेक्षा अधिक अनुदान मंजूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील १०० शेतकऱ्यांच्या १०२ हेक्टरसाठी फळ बागाचे साधारण एक कोटी पेक्षा अधिक अनुदान मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तालुक्यात बागायती क्षेत्र अधिक असल्याने फळ बागाचे क्षेत्र २५० हेक्टरपर्यंत वाढविण्याच्या सूचना येथील कृषी विभागाला दिल्या आहेत.शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेती न करता फळबाग शेतीदेखील कसावी यासाठी शासनाने फळबाग शेतीला अधिक प्रोत्साहन दिले आहे. कारण या शेतीसाठी प्रति हेक्टरी एक लाख ६७ हजार रूपये दिले जात असते. तळोदा तालुक्यातील शेतकरी ही गेल्या चार ते पाच वर्षापासून फळबाग शेतीकडे वळले आहेत. गेल्या वर्षी साधारण ९० शेतकºयांनी शासनाकडून फळबाग शेतीचे अनुदान घेतले होते.यंदाही इच्छागव्हाण, टाकळी, रामपूर, सतोना, माळखुर्द या आदिवासी भागातील १०२ शेतकºयांनी तालुका कृषी कार्यालयाकडे आंबा व लिंबू या फळांच्या फळबागांचे १०२ हेक्टरचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यांचा या प्रस्तावानवर कृषी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करून संबंधीत यंत्रणेकडे अनुदानाची मागणी केली होती. जवळपास दोन कोटींची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने शेतकºयांचे फळबागांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना पहिल्या टप्प्यात एक कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदान मंजूर केल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. प्रति हेक्टरी दिले जाणारे अनुदान हे शेतकºयांना तीन वर्षात तीन टप्प्यात दिले जात असते.प्रशासनाने फळ बागांचे अनुदान तातडीने मंजूर करून उपलब्ध केल्यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले असून, आता कृषी कार्यालयाने तत्काळ पुढील कार्यवाही करून शेतकºयांना वाटप करावे, अशी अपेक्षा आहे. दरम्यान तळोदा तालुक्यात बागायती क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे आणखीन २०० ते २५० हेक्टर पेक्षा अधिक फळ बागांचे क्षेत्र वाढविण्याच्या सूचनादेखील जिल्हा प्रशासनाने कृषी कार्यालयाला दिल्या आहेत.तळोदा तालुक्यात दुर्गम भागात अनेक गावे आहेत. त्याचबरोबर अशा शेतकºयांची संख्याही मोठी आहे. कृषी विभागाने या शेतकºयांमध्ये फळ बाग शेती व त्यासाठी शासनाचे असणारे अनुदान याबाबत जनजागृती, प्रबोधन केले तर निश्चितच हे शेतकरी फळबाग शेतीसाठी स्वत:हून पुढे येतील. मात्र त्यासाठी कृषी विभागाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या अनुदानाबाबतही लवकर कार्यवाही केली पाहिजे.ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी तळोदा तालुक्यातील ३१९ शेतकºयांनी गेल्या वर्षी येथील कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील १६१ शेतकºयांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यांचा अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि अद्याप १५८ शेतकºयांना अनुदानाची प्रतिक्षा लागून आहे. वास्तविक शेतकरी उधार उसनवाणी व सावकाराकडून कर्ज काढून शेतात ठिबक सिंचन करीत असतो. साहजिकच संबंधीत पैसे देणारे त्याच्या मागे पैशांचा तगादा लावत असतात. इकडे ठिबकच्या अनुदानासाठी त्यांना सारखे कार्यालयात थेटे घालावे लागत असते. एकीकडे शासन भूगर्भातील पाण्याची बचत करण्यासाठी शेतकºयांमध्ये ठिबक योजनाद्वारे प्रोत्साहन देते तर दुसरीकडे त्याचे अनुदान देण्यात काटकसरचे धोरण अवलंबते. शासनाच्या या दिरंगाईच्या धोरणाबाबत शेतकºयांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. शेतकºयांची झालेली बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ये शिल्लक शेतकरी राहिले आहेत त्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.