शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
3
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
5
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
6
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
9
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
10
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
11
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
12
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
13
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
14
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
15
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
16
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
17
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
18
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
19
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
20
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान

जिल्ह्यात अधिकारी येत नाही की येऊ दिले जात नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

मनोेज शेलार जिल्ह्यात अधिकारी येत नाही? की येऊ दिले जात नाही? हा संशोधनाचा विषय ठरू पहात आहे. महत्वाच्या पदांवरील ...

मनोेज शेलार

जिल्ह्यात अधिकारी येत नाही? की येऊ दिले जात नाही? हा संशोधनाचा विषय ठरू पहात आहे. महत्वाच्या पदांवरील तब्बल सात अधिकारी जिल्ह्यात नाहीत. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडे जिल्हास्तरीय पदभार द्यावा लागत आहे. घरकुल मंजुरी व वाटपात कोट्यवधींचा गैरकारभार झाल्याचा आरोप करीत खासदारासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी त्याची सीबीआय चौकशीची मागणी केली त्याच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद दोन वर्षापासून रिक्त राहू दिले जात आहे. यावरून शंका घेण्यास बराच वाव असल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्र्यांनी देखील मंत्रिमंडळात आपले वजन वापरून जिल्ह्याला अधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असतांना तसेही होत नसल्याचे चित्र गेल्या दीड वर्षात दिसून आले आहे.

नंदुरबार जिल्हा नीती आयोगाच्या अंतर्गत आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित आहे. त्या अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात कामे सुरू आहेत. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे अंमलबजावणी करणारी यंत्रणा पांगळी ठरली आहे. जिल्हा परिषदेसारख्या ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या विभागाचा विचार करता तेथे अधिकाऱ्यांचा दुष्काळ आहे. प्रभारी पदभार घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकाऱ्यांच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. ती खंत त्यांनी जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत बोलून दाखविली. एका अधिकाऱ्याकडे किती विभागांचा अतिरिक्त पदभार देणार याची देखील त्यांना मर्यादा आहे. त्यामुळे ते देखील या प्रकाराला कंटाळले असल्याचे त्यांच्या उद्विग्न प्रतिक्रियेवरून दिसून आले.

वास्तविक जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. पालकमंत्री काँग्रेसचे आहेत. आदिवासी विकास विभागासारखे वजनदार खाते त्यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. असे असतांना त्यांनी आपल्याच जिल्हा परिषदेत अधिकारी आणू नये ही बाब अनेकांना संभ्रमात टाकणारी आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे त्यांच्या विभागासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पदही ते सांभाळत आहेत. समाजकल्याण अधिकारीच भेटत नसल्याने तालुका स्तरावरून अधिकारी जिल्हा स्तरावर बसवावे लागले आहेत. बांधकाम सारख्या महत्त्वाच्या व कोट्यवधींची उलाढाल करणारा आणि नेहमीच ठेकेदारांचा राबता राहणाऱ्या या विभागासाठी कार्यकारी अभियंतांचा प्रभारी पदभारही तालुका स्तरावरून अधिकारी आणून त्यांना द्यावा लागला आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची आणखी किती अवहेलना होणार ही बाब जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने चिंतेची ठरत आहे. जिल्ह्याला नियमित शिक्षणाधिकारीच नाहीत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे येथे अधिकारीच टिकत नसल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे नाईलाजाने डायटच्या अधिव्याख्यातांना या पदावर प्रभारी बसवावे लागले आहे. यापूर्वी देखील या विभागाचा गंध नसलेल्या रोहयोच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या विभागाचा पदभार काही काळ द्यावा लागला होता. त्यामुळे या विभागाचेही वॅाशआऊट करणे आता गरजेचे ठरणार आहे. महिला व बालकल्याण विभागही अधांतरी आहे. गेल्या वर्षभरापासून या विभागाला अधिकारी नाहीत. लॉकडाऊनच्या काळात पोषण आहाराचा गैरप्रकाराचा मुद्दा प्रभारी पद असतांनाच गाजलेला आहे. तरीही नियमित अधिकारी या विभागाला नाहीत. कुपोषण, बाल मृत्यू सारखे ज्वलंत प्रश्न जिल्ह्यात असतांना या विभागाला अधिकारी नसणे ही एक प्रकारे जिल्ह्याच्या दृष्टीने शोकांतिकाच म्हणावी लागेल. तालुकास्तरावर दोन बालविकास प्रकल्प अधिकारी, चार गट शिक्षणाधिकारी नाहीत. अगदी विस्तार अधिकाऱ्यांकडे या पदांचा पदभार आहे.

एकीकडे आकांक्षित जिल्हा अंतर्गत कामे सुरू आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी येत आहे. त्या माध्यमातून योजना व प्रकल्प राबवून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असताना ते राबविणारे प्रमुख अधिकाऱ्यांचे पदच रिक्त ठेवले जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अधिकारी येत नाही? की येऊ दिले जात नाहीत? हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.