शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील बसस्थानकालगत डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, खेतिया रोड परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाºया टपऱ्यांसह पक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील बसस्थानकालगत डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, खेतिया रोड परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाºया टपऱ्यांसह पक्के व इतर अतिक्रमण पालिकेतर्फे काढण्यात आले. मात्र त्याठिकाणी आता अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांंनी ताबा घेतल्याने पालिकेने या अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसाठी जागा मोकळी केली का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.पालिकेतर्फे शहरात अतिक्रमण मोहीम सुरू असून बसस्थानकालगत, डोंगरगाव रोड व दोंडाईचा रोड आदी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणधारकांनी कारवाई होण्याआधीच स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. तर काही अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आला. अतिक्रमण काढल्यामुळे डोंगरगाव रस्ता व बसस्थानक चौकाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र या जागेवर सध्या अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांनी अतिक्रमण करीत वाहनांच्या रांगा लागत आहेत. या रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने बºयाचवेळा वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानक ते पटेल रेसिडेन्सी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही वाहने लावलेली असतात. हा रस्ता नवीन वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आधीच अरुंद व त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने बºयाचवेळा अपघात होतात.या अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनधारकांना खाकीचा धाक नसल्याचे जाणवते. वाटेल त्याठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. काही वाहतूक पोलीस तर अटकाव करण्याचे सोडून त्या वाहनचालकांजवळ गप्पा करत उभे असतात. काही महिन्यापूर्वी शहराच्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित करण्यात आला. मात्र विभाग थोड्याच दिवसात हा विभाग बंद पडल्याचे समजते. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील लॉरी, टपºया, हातगाड्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे केले. तर मुख्य रस्त्यांवर कोणताच धाक न बाळगता वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांवर पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमण काढून मोकळ्या झालेल्या जागेवर पालिका व पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.