शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लसीच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. महाराष्ट्रही त्यात मागे नसल्याने राज्य सरकारने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांची ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. महाराष्ट्रही त्यात मागे नसल्याने राज्य सरकारने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांची संचारबंदी लावली आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असल्याने नागरिक धास्तावले असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक व अति गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनीही लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना शहादा शहरात मात्र लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड सोबतच पॅनकार्ड किंवा मतदान कार्डची सक्ती काही लसीकरण केंद्रावर केली जात असल्याची ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे. ज्या केंद्रावर पहिला डोस घेतला त्याच केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्डसोबतच पॅन कार्ड किंवा मतदान कार्डची मागणी करण्यात येत आहे. पहिला डोस देताना फक्त आधार कार्ड लागल्याने नागरिक आधार कार्ड सोबत घेऊन जात आहेत. मात्र लसीकरण केंद्रावर पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड नसेल तर परत पाठवले जात आहे. खेड्यावरून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास . शिवाय अनेक नागरिकांकडे पॅनकार्ड नसल्याने ते लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लसीकरणाचे केंद्र वाढवून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याची आवश्यकता असताना पॅनकार्ड किंवा मतदान कार्डची सक्ती कशासाठी? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. काही केंद्रांवर अजूनही केवळ आधार कार्ड घेऊन लसीकरण केले जात असताना काही केंद्रांवर पॅनकार्डबाबत अडवणूक का करण्यात येत आहे? याबाबत नक्की शासनाचे काय आदेश आहेत, हे प्रशासनाने जाहीर केले पाहिजे. तसेच कोरोना लसीचा डोस देताना आधार कार्डव्यतिरिक्त इतर कागदपत्रांची मागणी करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे.