२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी पाण्याचे महत्त्व हे घोषवाक्य घेऊन जल दिन साजरा करण्यात येत आहे . जलजीवन मिशन अंतर्गत जल दिनानिमित्त यावर्षी दिनांक २२ ते २७ मार्च दरम्यान जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या सप्ताहाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शपथ देऊन केली. यावेळी अध्यक्षा वळवी यांनी प्रत्येकाने पाणी बचतीबरोबरच पाण्याचा सुयोग्य वापराबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळून पाणी जपून वापरावे व वसुंधरेचे बरोबरच आपले भविष्यही सुरक्षित करावे. यापुढे आपण सर्वांनी देशाचा जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्याची शपथ दिली. याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज वळवी, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) वनवाला पवार, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार, सीवायडीए संस्थेचे कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.