शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभांबाबत उदासिनता

By admin | Updated: April 23, 2017 17:41 IST

नंदुरबार जिल्ह्यात 2014 पासून आरोग्य ग्रामसभा एकाही गावात झालेली नाही़

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 23 - ग्रामस्थ व आरोग्य विभाग यांच्यामध्ये थेट संपर्क व्हावा यासाठी 2014 पासून आरोग्य मंत्रालयाने गावांमध्ये 24 एप्रिल ते 1 मे या दरम्यान आरोग्य ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होत़े शासनाने काढलेले हे आदेश कागदोपत्रीच ठरले असून नंदुरबार जिल्ह्यात 2014 पासून आरोग्य ग्रामसभा एकाही गावात झालेली नाही़ या आरोग्य ग्रामसभेमध्ये जनतेचे आरोग्यविषयक प्रश्न, आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणा:या योजना, आरोग्यविषयक कार्यक्रम, लोकांना मिळणा:या विविध सुविधा अशा विषयांवर माहिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत ही ग्रामसभा घेण्यात येणे आवश्यक असतानाही ग्रामपंचायतींकडून त्याकडे पाठ दाखवण्यात आली आह़े विशेष म्हणजे अनेकांना 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये आरोग्यविषयक एखादा  ठराव करून आरोग्यसभा असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला आह़े मात्र अद्याप पूर्णपणे आरोग्य ग्रामसभा जिल्ह्यात झालेली नाही़ नंदुरबार जिल्ह्यात 952 गावे आणि 586 ग्रामपंचायती आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात 137, शहादा 150, तळोदा 67, नवापूर 114, अक्कलकुवा 66 तर धडगाव तालुक्यात 52 ग्रामपंचायती आहेत़ या एकूण 586 ग्रामपंचायतींच्या पदाधिका:यांना आरोग्य विभागाने 2014 च्या अखेरीस ग्रामसभेमध्ये आरोग्य विषयक जनजागृती होण्यासाठी आरोग्यबाबतचे विषय  घेण्याबाबतच्या कठोर सूचना करून आरोग्य ग्रामसभा भरवण्याचे आदेश दिले होत़े शासनाच्या आरोग्य विभागाने 26 जून 2014 मध्ये पारित केलेल्या आदेशांच्या प्रती आरोग्य विभागाच्या मार्फत जिल्हा परिषद आणि तेथून ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले होत़े मात्र असे असूनही गेल्या दोन वर्षा एकाही ग्रामपंचायतीने आरोग्य ग्रामसभा घेतलेल्या नसल्याचे त्यांनी ग्रामविकास विभागाकडे केलेल्या ठरावांद्वारे दिसून आले आह़े विशेष म्हणजे ही ग्रामसभा 24 एप्रिल ते 1 मे या काळात घेतली गेलेली नाही़ पंचायत राज ते महाराष्ट्र दिन असा या सात दिवसांचा कालावधी असल्याने येत्या आठवडाभरात तरी जिल्ह्यातील गावांमध्ये आरोग्य ग्रामसभा होतील का, याकडे लक्ष लागून आह़े बहुतांश गावांच्या ग्रामसभांची कार्यक्रम पत्रिका तयार असली, तरी त्यात आरोग्य विषय नाही़  जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभा ह्या शासनाने दिलेल्या काळात व्हाव्यात म्हणून प्रयत्न केला आह़े परंतू जिल्ह्यातील गावांमध्ये या प्रकारच्या सभा झालेल्या नाहीत़ आरोग्य ही महत्त्वपूर्ण बाब असूनही दुर्लक्ष होत आह़े आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्याव़े -निशा तांबे, सामाजिक कार्यकत्र्या़