शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आता अक्कलकुव्यातही होणार मशरूमची सेंद्रीय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:08 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा :  तालुक्यातील सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करून राजेंद्र वसावे यांनी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा :  तालुक्यातील सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करून राजेंद्र वसावे यांनी यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसह भाजीपाला व मशरूमची मोठ्या प्रमाणावर लागवड करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पारंपारिक असलेला खपली व बन्सी  गहूचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले.अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडयासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांना राजेंद्र वसावे मार्गदर्शन करीत आहेत.  त्यांच्यामुळे सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सेंद्रीय शेतीकडे आकृष्ट होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून अन्नधान्य तसेच भाजीपाल्याची निर्मिती सुरू केली असून, त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदादेखील झाला आहे. रब्बी हंगामात सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात तसेच परराज्यातही सेंद्रीय शेतीसाठी पारंपरिक बियाण्यांची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः पारंपारिक आणि आरोग्याला पोषक असलेले सेंद्रीय पद्धतीने तयार  केलेला खपली गहू त्यांनी जिल्ह्यामध्ये विक्री  केला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे उपलब्धतेनुसार त्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र या खपली गहूची मागणी जास्त असल्या कारणामुळे ती पूर्ण करता येऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.  यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या खपली गव्हाचे बियाण्यांबाबत मार्गदर्शन करणार असल्याचेही राजेंद्र वसावे यांनी सांगितले.

रब्बी हंगामात सेंद्रीय शेती करू इच्छिणार्‍या शेतकऱ्यांसाठी पारंपारिक खपली तसेच बन्सी गव्हाचे लागवडीबाबत व उत्पादनाबाबत पूर्णपणे मार्गदर्शन करण्याचे शेतकरी वसावे यांनी सांगितले. सर्व पारंपारिक कडधान्याच्या बियाण्यांबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत.  तसेच सेंद्रीय शेतीतून उत्पादीत झालेले धान्य व भाजीपाला विक्रीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक फायदा करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सद्य:स्थितीत अक्कलकुवा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये  सेंद्रीय बियाणे व खतांच्या नावावर अनेक बनावट कंपन्या व त्यांचे वितरक गावोगावी वेगवेगळे आमिषे दाखवून शेतकऱ्यांची व तरुणांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यापासून सावध राह

खपली गहू हा पारंपारिक असून,  शरीरातील अनेक विकारांना घालवणारा आहे. शरीरातील अनेक अवयवांना मजबूत करण्याचे कार्य याच्या सेवनातून होते. दुर्मिळ असलेल्या या गव्हाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.  

     - भगतसिंग पाडवी,     निवृत्त विक्रीकर अधिकारी