शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नंदुरबार शहरवासीयांना आता आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:40 IST

विरचक धरणातील साठा होतोय कमी : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : पालिकेला आता आंबेबारा धरणाचा आधार घ्यावा लागणार आहे. याआधीच आरक्षीत केलेले धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून ते शहरात आणण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विरचक धरणावरील पंपींग स्टेशवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, पालिकेने दुस:या बुस्टर पंपाचे काम देखील पुर्ण केल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन आता सुसह्य होणार आहे.नंदुबार शहरात पाणी टंचाईची तीव्रता नाही. दर एक दिवसाआड व पाऊण ते एक तास पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. परंतु भविष्यातील नियोजन आणि यदाकदाचीत पाऊस लांबलाच तर विरचक प्रकल्पातील पाणीसाठा पुरेसा शिल्लक असावा यासाठी आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. दरवर्षी हे पाणी एप्रिल व मे महिन्यात वापरले जाते. त्यानुसार ते पाणी वापरण्यास सुरुवात झाली आहे.50 टक्के आरक्षीतआंबेबारा धरणातील एकुण पाणी साठय़ापैकी 50 टक्के पाणीसाठा हा दरवर्षी पालिका आरक्षीत करीत असते. साधारणत: डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सभेत ठराव करून तो जिल्हाधिका:यांकडे पाठविला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबधित विभागाला सांगून आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने आंबेबारा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणातील पाणी साठय़ाचा फारसा प्रश्न नाही. या धरणातील आरक्षीत पाणी पाटचारीद्वारे आष्टे येथील शिवण नदीच्या पंपींग स्टेशनमध्ये आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठविल्यानंतर ते पंपींगच्या माध्यमातून शहराला पुरविले जाते. आष्टे ते नंदुरबार ही दहा   किलोमिटरची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच    तिची दुरूस्ती देखील करण्यात      येवून गळती कमी करण्यात आलेली आहे.विरचकमध्ये 33 टक्के साठाविरचक धरणात सद्या स्थितीत 33 टक्के पाणीसाठा आहे. हे संपुर्ण पाणी नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे. साधारणत: ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यार्पयत हे पाणी शहरवासीयांना पर्याप्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाऊस जरी लांबला तरी हे पाणी पुरणार आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच काटकसर करणे देखील आवश्यक आहे.गेल्या पावसाळ्यात विरचक धरणात 65 टक्केर्पयत पाणीसाठा झाला होता. धरणाचे बांधकाम झाल्यापासून आतार्पयत एकदाही या धरणात संपुर्ण 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही. पुर्ण क्षमतेने धरण भरले तरच शेतीसाठी या ठिकाणी पाणी आरक्षीत करण्याची तरतूद असल्याचे समजते.