शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार शहरवासीयांना आता आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:40 IST

विरचक धरणातील साठा होतोय कमी : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : पालिकेला आता आंबेबारा धरणाचा आधार घ्यावा लागणार आहे. याआधीच आरक्षीत केलेले धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून ते शहरात आणण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विरचक धरणावरील पंपींग स्टेशवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, पालिकेने दुस:या बुस्टर पंपाचे काम देखील पुर्ण केल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन आता सुसह्य होणार आहे.नंदुबार शहरात पाणी टंचाईची तीव्रता नाही. दर एक दिवसाआड व पाऊण ते एक तास पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. परंतु भविष्यातील नियोजन आणि यदाकदाचीत पाऊस लांबलाच तर विरचक प्रकल्पातील पाणीसाठा पुरेसा शिल्लक असावा यासाठी आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. दरवर्षी हे पाणी एप्रिल व मे महिन्यात वापरले जाते. त्यानुसार ते पाणी वापरण्यास सुरुवात झाली आहे.50 टक्के आरक्षीतआंबेबारा धरणातील एकुण पाणी साठय़ापैकी 50 टक्के पाणीसाठा हा दरवर्षी पालिका आरक्षीत करीत असते. साधारणत: डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सभेत ठराव करून तो जिल्हाधिका:यांकडे पाठविला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबधित विभागाला सांगून आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने आंबेबारा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणातील पाणी साठय़ाचा फारसा प्रश्न नाही. या धरणातील आरक्षीत पाणी पाटचारीद्वारे आष्टे येथील शिवण नदीच्या पंपींग स्टेशनमध्ये आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठविल्यानंतर ते पंपींगच्या माध्यमातून शहराला पुरविले जाते. आष्टे ते नंदुरबार ही दहा   किलोमिटरची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच    तिची दुरूस्ती देखील करण्यात      येवून गळती कमी करण्यात आलेली आहे.विरचकमध्ये 33 टक्के साठाविरचक धरणात सद्या स्थितीत 33 टक्के पाणीसाठा आहे. हे संपुर्ण पाणी नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे. साधारणत: ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यार्पयत हे पाणी शहरवासीयांना पर्याप्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाऊस जरी लांबला तरी हे पाणी पुरणार आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच काटकसर करणे देखील आवश्यक आहे.गेल्या पावसाळ्यात विरचक धरणात 65 टक्केर्पयत पाणीसाठा झाला होता. धरणाचे बांधकाम झाल्यापासून आतार्पयत एकदाही या धरणात संपुर्ण 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही. पुर्ण क्षमतेने धरण भरले तरच शेतीसाठी या ठिकाणी पाणी आरक्षीत करण्याची तरतूद असल्याचे समजते.