शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

"४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर", बाळासाहेब थोरातांची टीका

By मनोज शेलार | Updated: August 12, 2022 20:07 IST

Balasaheb Thorat: स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.

- मनोज शेलार  नंदुरबार : मनापासून एकत्र न येता केवळ स्वार्थासाठी एकत्र आल्यावर काय होते हे भाजप-शिंदे गटाच्या सरकारच्या काराभारावरून लक्षात येते. ४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही अशी परिस्थिती आहे. स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कॉंग्रेसतर्फे नंदुरबारात पदयात्रा काढून मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, शिवसेनेने काँग्रेससोबत चर्चा करणे आवश्यक होते. या पदासाठी कॉंग्रेसचीही मागणी होती. परंतु शिवसेनेने परस्पर निर्णय घेतला. आघाडी असताना ही बाब खटकणारी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रथमच बिनखात्याचे मंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करणार आहेत तर अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना झेंडावंदन करावे लागणार आहे. राज्य सरकार अस्तित्वात असताना अशी वेळ येणे ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरणार असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार