शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

"४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर", बाळासाहेब थोरातांची टीका

By मनोज शेलार | Updated: August 12, 2022 20:07 IST

Balasaheb Thorat: स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.

- मनोज शेलार  नंदुरबार : मनापासून एकत्र न येता केवळ स्वार्थासाठी एकत्र आल्यावर काय होते हे भाजप-शिंदे गटाच्या सरकारच्या काराभारावरून लक्षात येते. ४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही अशी परिस्थिती आहे. स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कॉंग्रेसतर्फे नंदुरबारात पदयात्रा काढून मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, शिवसेनेने काँग्रेससोबत चर्चा करणे आवश्यक होते. या पदासाठी कॉंग्रेसचीही मागणी होती. परंतु शिवसेनेने परस्पर निर्णय घेतला. आघाडी असताना ही बाब खटकणारी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रथमच बिनखात्याचे मंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करणार आहेत तर अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना झेंडावंदन करावे लागणार आहे. राज्य सरकार अस्तित्वात असताना अशी वेळ येणे ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरणार असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार