शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

नऊ वर्षात अवघी साडेसहा टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 10:41 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठ ते नऊ वर्षात जिल्ह्याने सर्वच बाबतीत आघाडी घेतली असतांना ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या आठ ते नऊ वर्षात जिल्ह्याने सर्वच बाबतीत आघाडी घेतली असतांना साक्षरतेबाबतच्या ‘लोकल‘चे ‘सुपरफास्ट’ मध्ये रुपांतर मात्र झालेले नाही. 2011 च्या जनगणनेत 64.38 टक्के असलेली साक्षरता आता अवघी साडेसहा टक्के वाढून 70.80 टक्क्यांवर पोहचली आहे. जी राज्यात सर्वात कमी आहे. गडचिरोली, गोंदिया, पालघर या आदिवासी जिल्ह्यांपेक्षाही कमी   आहे.जिल्ह्याचे आपले ‘मागास’ विशेषण पुसण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातर्फे आवश्यक त्या योजना आणि निधी खर्च केला जात आहे. केंद्र शासनाने आश्वासीत जिल्ह्यांच्या यादीत नंदुरबारला घेतलेले आहे. त्या अनुषंगाने विविध कामेही सुरू झाली आहेत. राज्यात तळाला असलेला मानव निर्देशांक सुधारणे, दरडोई उत्पन्नात वाढ होईल यासाठी प्रय} करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे यासह रोजगार व कौशल्य निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे जिल्ह्याचे चित्र लवकरच बदललेले दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असले तरी प्रगती किंवा विकास करण्यासाठी जे आवश्यक असते ती साक्षरता वाढण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. नऊ वर्षात अवघी 6.42 टक्के साक्षरतेत वाढ होणे ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने नामुष्कीचीच म्हणावी लागेल. संयुक्त धुळे जिल्हा असतांना नंदुरबार विभागाची साक्षरता पहिल्या जनगणेनेवेळी अवघी 25.2 टक्के होती. त्यानंतर प्रत्येक जणगणेवेळी अर्थात दहा वर्षातील साक्षरता वाढ ही अवघी 8 ते 12 टक्क्यांच्या घरातच राहिली. त्याकाळी साधन-सुविधांचा अभाव, जनतेमधील उदासिनता कारणीभूत होती. आता मात्र सर्वच बाबतीत सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत. लोकांमधील प्रगल्बधता देखील वाढली आहे. असे असतांना साक्षरता वाढीचे प्रमाण गेल्या नऊ वर्षात अवघे साडेसहा टक्क्यांर्पयत वाढणे ही बाब आश्चर्याची मानली जात आहे.   साक्षर भारत मिशनचा फज्जासाक्षर भारत मिशन जिल्ह्यात गेल्या चार वर्षात राबविण्यात आले. या अंतर्गत 15 वर्षावरील निरक्षरांचा सव्र्हे करण्यात येवून त्यांना साक्षर करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्यासाठी प्रेरकांचीही नियुक्ती केली गेली. परंतु जिल्ह्यात अशा प्रकारचे साक्षरता वर्ग कुठे आणि कधी भरले गेले याची पुसटशीही कल्पना कुणाला आली नाही. केवळ कागदावरच हे मिशन राबविले गेले. परिणामी साक्षरतेत वाढ अवघी साडेसहा टक्केच झाली. साक्षरता ठरतेय विकासाला अवरोधज्या जिल्ह्याची, राज्याची साक्षरता अधीक त्यांचा विकास लवकर होतो हे साधे सरळ गणित आहे. संपुर्ण साक्षर असलेल्या केरळ राज्याचे उदाहरण देता येईल.     शासन आता सर्वाना बँक खाती आवश्यक करीत आहे. ऑनलाईन बँकींग व्यवहार वाढले आहेत. अनुदान, मदतीची रोख रक्कम हातात न मिळता थेट बँक खात्यात जमा होत आहे. अशा वेळी प्रत्येक नागरिकाने साक्षर राहून आपल्या अधिकार आणि हक्कांबाबत सजग राहिले पाहिजे. असे असतांना जिल्ह्यातील 29 टक्के जनता अद्यापही निरक्षर म्हणून      राहत असेल तर विकासाला ही बाब मारकच म्हणावी लागेल.     

साक्षर भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 15 वर्षापेक्षा मोठय़ा निरक्षरांचा सव्र्हे करून त्यांना साक्षरता वर्गामध्ये आणण्यात येणार होते. या निरक्षरांना शिकविण्यासाठी अर्थात किमान तिसरी इयत्तेच्या लेव्हलचे शिक्षण समजावे यासाठी प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या प्रेरकांना जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षीत करून त्यांना साक्षरता मिशनचे कार्य देण्यात आले. या प्रेरकांतर्फे गाव, पाडय़ांवर जावून निरक्षकांना साक्षर करण्याचे काम देण्यात आले.