शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

नऊ मतदान केंद्रांवर नर्मदेच्या अथांग पाण्यातून जावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 20:27 IST

दुर्गम भागातील मतदान केंद्र : एक दिवस आधी निघणार कर्मचारी

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील नऊ मतदान केंद्रांवर सरदार सरोवरच्या अथांग पाण्यातून बार्ज अर्थात बोटीद्वारे निवडणूक कर्मचाऱ्यांना जावे लागणार आहे. अशा ठिकाणी मोबाईल रेंज राहणार नसल्यामुळे पोलिसांच्या वायरलेस सेटचा वापर संपर्काचे माध्यम म्हणून राहणार आहे.नंदुरबार लोकसभा मतदार संघातील अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके पुर्णपणे अतिदुर्गम भागातील आहेत. या तालुक्यातील नर्मदा काठावरील अनेक गावांमधील मतदान केंद्रात जाण्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. अशा कर्मचाºयांना एक दिवस आधीच अशा केंद्रांवर मतदान साहित्यासह रवाना करावे लागते. नर्मदा काठावरील अनेक ठिकाणी शाळा किंवा अंगणवाडी इमारत अथवा ग्राम पंचायत कार्यालय नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड तयार करून मतदान केंद्र तयार करावे लागत आहे.नर्मदा काठावरील नऊ मतदान केंद्रांमध्ये जाण्यासाठी निवडणूक कर्मचाºयांना थेट गुजरातमधील केवडीया कॉलनी येथे जावून तेथून सरदार सरोवरच्या अथांग पाण्यातून बार्जद्वारे अर्थात शासनाच्या बोटीद्वारे संबधीत नऊ केंद्रांवर जावे लागणार आहे. नर्मदा काठावर उतरल्यावर संबधीत गावांमध्ये जाण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेवून त्यांच्यासोबत निवडणुकीचे साहित्य घेवून संबधीत मतदान केंद्रावर जावे लागणार आहे.परतीचा प्रवास देखील तसाच राहणार असल्यामुळे मतदान झाल्यानंतर संबधीत साहित्य घेवून दुसºया दिवशी सकाळी संबधीत कर्मचारी मतदान यंत्र जमा करणार आहेत.वायरलेस सेट संपर्काचे माध्यमदुर्गम भागातील मतदान केंद्रात संपर्काचे साधन नसल्यामुळे अशा ठिकाणाहून तालुकास्तरावर किंवा जिल्हा मुख्यालयी संपर्क साधण्यासाठी पोलिसांच्या वायरलेस सेटची मदत घेतली जाणार आहे. गेल्या वेळी सॅटेलाईट फोनचा वापर करण्याचा प्रयोग झाला, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे यंदा वायरलेस सेटचाच वापर करण्यावर भर राहणार आहे.