शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

जिल्हा परिषदेच्या राजकारणाला नवे वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:33 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या पाच महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणात सुरू असलेली खदखद अखेर ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या पाच महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणात सुरू असलेली खदखद अखेर शुक्रवारी झालेल्या खाते बदलाच्या निर्णयाने शमली आहे. तथापी या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारणालाही नवे वळण मिळणार असल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५६ पैकी भाजपचे २३, काँग्रेसचे २३ शिवसेनेचे सात तर राष्टÑवादीचे तीन निवडून आले आहेत. ही निवडणूक जेंव्हा झाली तेंव्हा जिल्ह्यातील राजकारण वेगळे होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकारणही बदलले, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीचे सरकार सत्तेवर आले. सहाजिकच जि.प.ची सत्ता स्थापन करतांनाही त्याची अडचण आली. स्थानिक नेत्यांची गोची झाली. निवडणूकपूर्वी दिलेल्या आघाडीच्या वचनांचा भंग झाला. अशा स्थितीत हायकमांडच्या आदेशानुसार शिवसेना, काँग्रेसची युती होऊन नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन झाली. सभापती निवड करतांना पुन्हा नव्या राजकीय समिकरणाची आघाडी पहायला मिळाली.सभापती निवडीत भाजपलाही एक जागा देण्यात आली. ही नवी आघाडी करताना काँग्रेसने शिवसेनेला काहीसे लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. सत्ता स्थापन करतांना शिवसेनेला उपाध्यक्षपद व बांधकाम सभापतीचे ज्या बहुचर्चीत आश्वासनाची चर्चा होती ती मात्र दिसली नाही. शिवसेनेला उपाध्यक्षपद दिले पण बांधकाम सभापतीपद काँग्रेसने आपल्याच कडे ठेवले. त्याबाबतची खदखद नंतर अनेक घटनेतून उमटली. अगदी सुरूवातीच्याच काळात कार्यालयाची भिंत पाडण्याचा वाद अधीक चर्चेत राहिला. अशा स्थितीत गेल्या दोन, तीन महिन्यांपासून जि.प.तील सभापती बदलाची चर्चेला ऊत आला होता.दरम्यानच्या काळात पारनेर नगरपालिकेतील पाच शिवसेनेचे सदस्य राष्टÑवादीत प्रवेश केल्याची घटना घडली होती. राज्यातील महाआघाडीचा पक्षातच घडलेली ही घटना संपुर्ण महाराष्टÑात एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली. त्यामुळे लागलीच दोन्ही पक्षांनी आपली चूक सुधारून प्रवेश केलेल्या सदस्यांनी पुन्हा आपल्या मुळ पक्षात प्रवेश केला होता.नेमका याच घटनेचा मुद्दा करून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे मांडून जिल्हा परिषदेत काँग्रेसने दिलेले आश्वासन न पाळल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे पक्ष स्तरावरून ही सुचना काँग्रेसलाही देण्यात आली. त्याच घडामोडीतून शुक्रवारच्या सभेतील खातेबदलाची प्रक्रिया झाल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.नवीन खाते बदलामुळे आता बांधकाम सभापतीपद उपाध्यक्ष राम चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे आले आहे. तर त्यांच्याकडील कृषी व पशुसंवर्धन खाते अभिजीत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.खाते बदलाच्या या निर्णयावर अनेक खलबत्ते होत राहणार त्याबाबत वेगवेगळी चर्चाही होईल, तर्क काढले जातील. पण या निर्णयाने जिल्ह्यातील एकुणच राजकारणावर एक वेगळा परिणाम होण्याचे चित्र आहे, विशेषत: नव्या पिढीतील युवा नेत्यांमध्ये जिल्ह्यात सुरू असलेली चढाओढीची स्पर्धा यातून अधीक गडद झाल्याचे स्पष्ट आहे.