शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या राजकारणाला नवे वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:33 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या पाच महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणात सुरू असलेली खदखद अखेर ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या पाच महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणात सुरू असलेली खदखद अखेर शुक्रवारी झालेल्या खाते बदलाच्या निर्णयाने शमली आहे. तथापी या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारणालाही नवे वळण मिळणार असल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५६ पैकी भाजपचे २३, काँग्रेसचे २३ शिवसेनेचे सात तर राष्टÑवादीचे तीन निवडून आले आहेत. ही निवडणूक जेंव्हा झाली तेंव्हा जिल्ह्यातील राजकारण वेगळे होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकारणही बदलले, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीचे सरकार सत्तेवर आले. सहाजिकच जि.प.ची सत्ता स्थापन करतांनाही त्याची अडचण आली. स्थानिक नेत्यांची गोची झाली. निवडणूकपूर्वी दिलेल्या आघाडीच्या वचनांचा भंग झाला. अशा स्थितीत हायकमांडच्या आदेशानुसार शिवसेना, काँग्रेसची युती होऊन नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन झाली. सभापती निवड करतांना पुन्हा नव्या राजकीय समिकरणाची आघाडी पहायला मिळाली.सभापती निवडीत भाजपलाही एक जागा देण्यात आली. ही नवी आघाडी करताना काँग्रेसने शिवसेनेला काहीसे लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. सत्ता स्थापन करतांना शिवसेनेला उपाध्यक्षपद व बांधकाम सभापतीचे ज्या बहुचर्चीत आश्वासनाची चर्चा होती ती मात्र दिसली नाही. शिवसेनेला उपाध्यक्षपद दिले पण बांधकाम सभापतीपद काँग्रेसने आपल्याच कडे ठेवले. त्याबाबतची खदखद नंतर अनेक घटनेतून उमटली. अगदी सुरूवातीच्याच काळात कार्यालयाची भिंत पाडण्याचा वाद अधीक चर्चेत राहिला. अशा स्थितीत गेल्या दोन, तीन महिन्यांपासून जि.प.तील सभापती बदलाची चर्चेला ऊत आला होता.दरम्यानच्या काळात पारनेर नगरपालिकेतील पाच शिवसेनेचे सदस्य राष्टÑवादीत प्रवेश केल्याची घटना घडली होती. राज्यातील महाआघाडीचा पक्षातच घडलेली ही घटना संपुर्ण महाराष्टÑात एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली. त्यामुळे लागलीच दोन्ही पक्षांनी आपली चूक सुधारून प्रवेश केलेल्या सदस्यांनी पुन्हा आपल्या मुळ पक्षात प्रवेश केला होता.नेमका याच घटनेचा मुद्दा करून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे मांडून जिल्हा परिषदेत काँग्रेसने दिलेले आश्वासन न पाळल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे पक्ष स्तरावरून ही सुचना काँग्रेसलाही देण्यात आली. त्याच घडामोडीतून शुक्रवारच्या सभेतील खातेबदलाची प्रक्रिया झाल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.नवीन खाते बदलामुळे आता बांधकाम सभापतीपद उपाध्यक्ष राम चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे आले आहे. तर त्यांच्याकडील कृषी व पशुसंवर्धन खाते अभिजीत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.खाते बदलाच्या या निर्णयावर अनेक खलबत्ते होत राहणार त्याबाबत वेगवेगळी चर्चाही होईल, तर्क काढले जातील. पण या निर्णयाने जिल्ह्यातील एकुणच राजकारणावर एक वेगळा परिणाम होण्याचे चित्र आहे, विशेषत: नव्या पिढीतील युवा नेत्यांमध्ये जिल्ह्यात सुरू असलेली चढाओढीची स्पर्धा यातून अधीक गडद झाल्याचे स्पष्ट आहे.