शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ग्रामीण भागात कोरोनाविषयी जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

मागील वर्षी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून दवंडी देण्यात येत होती. त्यामध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे ...

मागील वर्षी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून दवंडी देण्यात येत होती. त्यामध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गरज असेल तेव्हाच घराबाहेर निघणे याबाबत जनजागृती करण्यात येत होती. मात्र, आता मागील वर्षापेक्षा चारपटीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागात मास्क न वापराता व विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्या गावातील ग्रामस्थांचे तापाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये काही लक्षणे आढळल्यास स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना स्वॅब देण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. मागील वर्षी ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत होते त्या गावांमध्ये प्रशासनातर्फे काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येत होते. मात्र, आता रुग्णांची संख्या जास्त असली तरी लॉकडाऊनसदृश स्थिती कोणत्याही गावात दिसून येत नाही. म्हणून ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोना आजाराविषयी लोकांमध्ये स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून जनजागृतीची गरज आहे. जेणेकरून या संसर्गजन्य आजाराचे रूपांतर महामारीमध्ये होणार नाही.