शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

मानवी अस्तित्वासाठी पंचतत्त्वाच्या संरक्षणाची गरज - मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा हे अभियान सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड. सीमा ...

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा हे अभियान सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात सहभागी ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अंगणवाडीसेविका, रोजगार सेवक यांच्यासाठी जिल्हास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की ,अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच प्रत्येक शासकीय विभागाने पृथ्वी ,जल ,आकाश ,अग्नी, वायू या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभागांनी वेळेत कृतिसंगम आराखडा तयार करून त्यांची अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या. माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा, लोणखेडा, वडाळी, बामखेडा, खेड दिगर, कल्साडी, पुरुषोत्तमनगर, ब्राह्मणपुरी अक्कलकुवा, राजमोही, मोठी नंदुरबार तालुक्यातील धानोरा, नवापूर तालुक्यातील खोकसा, तळवे, गणेश बुधावल तालुका तळोदा अशा एकूण १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, शहादा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुऱ्हे, जिल्हा कक्षातील युवराज सूर्यवंशी यांनी पंचतत्त्व व त्यांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोण कोणते उपक्रम राबविण्यात यावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी व त्या अनुषंगाने काम करणेबाबत शपथ दिली.

कार्यशाळेस तालुकास्तरावरील विस्तार अधिकारी (पंचायत, कृषी), शाखा अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन ) मनरेगा विभागाचे तांत्रिक कर्मचारी जिल्हा स्तरावरील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वर्षा फडोळ यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले.