शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागात बारमाही रस्त्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अक्कलकुवा तालुक्यातील होराफळीसह परिसरातील गावांना जोडण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अक्कलकुवा तालुक्यातील होराफळीसह परिसरातील गावांना जोडण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागांना जोडणाऱ्या बारमाही रस्त्यांची निर्मिती व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी, निंबापाटी, वालांबा, बेअटी, खडकापाणी, ठाणा, टोकणापिंप्री, मोरखी हा सातपुड्यातील गुजरात राज्याच्या सीमेला लागून असणारा अतिदुर्गम भाग आहे. या भागात पोहचण्यासाठी खापरहून मोरांबा, कुंडीमार्गे रस्ता आहे. कुंडीपासून तर होराफळीपर्यंतचा रस्ता हा घाटमार्ग असून या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पक्का रस्ताच अस्तित्वात नाही. कच्या रस्त्यावर दगड-मातीमुळे मोठ्या प्रमाणात उंचसखलपणा निर्माण झाला आहे.रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे या मार्गावर अवलंबून असणारी वाहतूक सुविधा पूर्णपणे बंद झाली आहे. केवळ दुचाकीधारक व ट्रक, टेम्पो यासारखी मोठी वाहने जीवघेणी कसरत करीत या मार्गावरून ये-जा करीत असतात. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक सुविधा या भागात उपलब्ध नाही. रत्याची दुरवस्था व सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अभाव यामुळे या परिसरातील नागरिकांना आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात पायपीटच करावी लागत असल्याचा अनुभव आहे.कुंडी ते होराफळी हा अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी कुंडी ते होराफळीला जोडणारा पक्का रस्ता तयार करण्यात आला होता. होरफळीपासून कुंडीकडे येतांना तीव्र उताराच्या रत्यावर पावसाळ्यात दरडी कोसळत असल्याने दरडी कोसळणाºया भागातील रस्ता पूर्णपणे नामशेष झाला आहे. पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे या भागांतील नागरिकांना होराफळी गाठण्यासाठी शेलांबा, देवमोगरा मार्गे तब्बल ५० किलोमीटर अंतराचा फेरा मारून यावे लागते. सध्याच्या परिस्थितीतदेखील या भागात येणारी लहान चारचाकी वाहने याच परिसरात दाखल होऊ शकता.दरम्यान, रत्याअभावी या परिसरातील दळणवळणाच्या सोयीसुविधेची वाणवा असून, या परिसरातील अनेक गावात स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षातदेखील बस पोहचू शकलेली नाही. खाजगी प्रवासी वाहतूक हा या भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचा एकमेव पर्याय आहे. रस्त्याचाअभाव व दळणवळणाच्या साधनांची अनुपलब्धता ही या भागाच्या विकासासाठी मोठी अडचण असून, या भागाला तालुका मुख्यालयाला जोडणारा बारमाही रस्तानिर्माण करावा अशी, मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग महाराष्ट्र व गुजरात हद्दीला लागून आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार या भागात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात मागे पडलेले असतांना गुजरात सरकारने मात्र या भागात मजबूत व दुपदरी रस्ते निर्माण केले आहेत. होराफळीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर देडियापाड्यापासून माल या गुजरात राज्याच्या शेवटच्या गावापर्यंत गुजरात सरकारने पक्का दुपदरी रस्ता निर्माण केला आहे. अतिदुर्गम भागातील वडफळी, होराफळी, निंबापाटी, टोकणापिंप्री, मोरखी यासारख्या महाराष्ट्र हद्दीत अनेक गावाला पोहचण्यासाठी गुजरात हद्दीत या चकचकीत मार्गावरून मार्गक्रमण करावे लागते. गुजरात सरकार जर सातपुड्याच्या एवढ्या अतिदुर्गम भागात मजबूत दुपदरी रस्त्याचे जाळे निर्माण करू शकते तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.