शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

कोरीट फाट्याजवळ फलकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

आवक घटली नंदुरबार : बाजार समितीत भाजीपाला आवक दिवसेंदिवस घटत आहे. ग्रामीण भागात भाजीपाला लागवडीचा हंगाम अद्याप सुरु झालेला ...

आवक घटली

नंदुरबार : बाजार समितीत भाजीपाला आवक दिवसेंदिवस घटत आहे. ग्रामीण भागात भाजीपाला लागवडीचा हंगाम अद्याप सुरु झालेला नाही. यापूर्वी लागवड केलेला भाजीपाला संपुष्टात आला आहे. यामुळे बाजारातील आवकवर परिणाम झाला आहे. बाजारात सध्या उन्हाळी भाज्यांची आवक होत आहे.

कोरोना संसर्गाच्या भीतीने गर्दी झाली कमी

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अद्याप नियंत्रणात आहे. प्रशासनाकडूनही योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रात्रीची संचारबंदी सुरु केली आहे. यामुळे धडगाव शहरातील गर्दीवर परिणाम झाला असून, दुपारी दोन वाजल्यापासून बाजारपेठेत शुकशुकाट होत असल्याचे दिसून आले आहे.

आकडीमुक्त वीज वाहिन्यांमुळे समाधान

बोरद : तळोदा तालुक्यातील विविध भागात आकडीमुक्त वीज वाहिन्या करण्यासाठी कंपनीकडून बंच केबल टाकण्यात येत आहे. यामुळे गावे आकडीमुक्त होत आहेत. यातून चांगल्या दाबाने वीज मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

घरकुल लाभार्थींना हप्त्यांची प्रतीक्षा

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समित्यांच्या कार्यालयांतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. यातील काहींनी दुसरा, तर निम्म्यापेक्षा अधिक जणांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही.

ग्रामपंचायतींच्या जोडण्यांवर संक्रांत

नंदुरबार : वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरण कंपनीकडून सध्या कारवाई करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचाही समावेश असून, त्यांच्या पाणी योजनांचे कनेक्शन कट करण्याची कारवाई होणार आहे. काही ठिकाणी कार्यवाही पूर्ण झाली असून, यामुळे त्या-त्या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याची माहिती देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बँकांचे कामकाज सुरु

तळोदा : दोन दिवस संपावर असलेले बँक कर्मचारी बुधवारी बँकांमध्ये परत आले. यानंतर सुरु झालेल्या कामकाजामुळे बँक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी शहरातील सर्वच बँकांमध्ये नागरिकांची पैसे भरणा व काढण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते.

नागरिक त्रस्त

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात मोकाट श्वानांचा संचार त्रासदायक ठरत आहे. तालुक्यातील मोठ्या व छोट्या गावांसह शहरालगतच्या गावांमध्ये मोकाट श्वान वाढीस लागले आहेत. या श्वानांचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असून, ग्रामपंचायत विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.