शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

गोमाई नदीवरील पुलाखालील खड्डे बुजविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

सुमारे ३५ वर्षांपूर्वी शहादा-पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीच्या पात्रात हा पूल बांधण्यात आलेला आहे. भादे, पाडळदे, परिवर्धे, औरंगपूर, तिखोरा ...

सुमारे ३५ वर्षांपूर्वी शहादा-पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीच्या पात्रात हा पूल बांधण्यात आलेला आहे. भादे, पाडळदे, परिवर्धे, औरंगपूर, तिखोरा आदी ३० ते ४० गावांतील वाहनधारक या पुलावरून ये-जा करतात. गोमाई नदीला आलेल्या पुरामुळे अनेकवेळा पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला भराव वाहून गेल्याने अनेकवेळा दुरुस्ती केली. १५ ते २० वर्षांपासून पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहन चालक जीव मुठीत धरून पुलावरून आपले वाहन चालवतात. या पुलावर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आलेले आहेत. एवढ्या अपघाताच्या घटना होऊनही संबंधित विभागाकडून अद्याप पुलाला कठडे लावण्यात आलेले नाहीत.

या पुलाच्या खाली सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच-सहा वर्षांपूर्वी बेड काँक्रिट केले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा कमी होऊन दुसऱ्या बाजूला पाणी थांबून राहील हा उद्देश आहे. या पाण्यामुळे कूपनलिकांची पाणी पातळी टिकून गुराढोरांना व नदीकाठावर असलेल्या वसाहतीतील लोकांना कपडे वगैरे धुण्यासाठी पाणी उपयोगी पडेल हे नियोजन होते. काँक्रिट केलेल्या ठिकाणी सद्यस्थितीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणी गेल्या तीन वर्षात दोन ते तीन युवकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या पावसाळ्यातही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन ते खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

गोमई नदीपात्रात करण्यात आलेल्या बेड काँक्रिटीकरणास पाच ते सात फुटाचे खड्डे झालेले आहेत. त्यात पाणी भरल्याने खेळणाऱ्या मुलांना ते दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर अंघोळीसाठी येणारे मुले आनंद लुटतात. अशावेळी दुर्घटना घडू नये म्हणून संबंधित विभागाने त्वरित बेड काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवावेत.

-इरफान पठाण, शहादा.