शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विक्रेत्यांचे पाळेमुळे खणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने कोठली, ता. शहादा येथे एका ...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने कोठली, ता. शहादा येथे एका घरावर छापा टाकून अंदाजित एक लाख रुपये किमतीचे एचटीबीटी बियाणे जप्त केले. यंदाच्या खरीप हंगामाची ही पहिलीच कारवाई आहे. पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा शोध पथकाने घ्यावा व कारवाई करून अनधिकृत बियाणे लागवडीपासून सर्वसाधारण शेतकऱ्यांना वाचवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे विक्री होते हे सर्वश्रुत आहे. कमी दरात विक्री होत असल्याने सहाजिकच शेतकऱ्यांना हे बियाणे घेण्याचे आमिष कथित अनधिकृत विक्रेत्यांकडून केले जाते. शेतकरी या आमिषाला बळी पडून लागवड करतात. कृषी विभागाने निदान गावोगावी या बियाण्यांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा अनधिकृत बियाणे लागवड करून शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी झळ सोसावी लागेल. आधीच लॉकडाऊन तसेच तत्सम बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन तरीही बियाणे?

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी किरकोळ विक्रेता ते शेतकरी १ जूनपासून बियाणे विक्रीचे निर्देशित केले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने बऱ्याच अवैध व्यवसायांना लगाम लागला आहे; परंतु परराज्यातून एवढा मोठा बियाणाचा साठा दरवर्षी तालुक्यात येतोच कसा? यात नेमका आशीर्वाद कोणाचा याचाही शोध घेणे गरजेचे आहे. दरवर्षी कृषी विभाग माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून मुद्देमाल जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर सोपस्कार तर होतोच; परंतु अनधिकृत बियाणे विक्रेत्यांची मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचा शोध घेऊन पाळेमुळे खणण्याची गरज आहे, अन्यथा शेतकरी अनधिकृत व बोगस बियाणे विक्रेत्यांच्या आमिषाने पुरता देशोधडीला लागेल, यात शंका नाही.