शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
4
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
5
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
6
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
7
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
8
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
9
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
10
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
11
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
12
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
13
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
14
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
15
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
16
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
17
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
18
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
19
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
20
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट

सातपुड्यातील गावांमध्ये निसर्गपूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : चांगला पाऊस पडून मुबलक प्रमाणात उत्पादन यावे, याशिवाय निसर्गापासून कुणालाही हानी न पोहोचता पाळीव ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : चांगला पाऊस पडून मुबलक प्रमाणात उत्पादन यावे, याशिवाय निसर्गापासून कुणालाही हानी न पोहोचता पाळीव जणावरेही सुखी राहावीत यासाठी सातपुड्यातील बहुसंख्य गावांमधील आदिवासी बांधवांनी नुकतेच आपापल्या गावाच्या शिवारात निसर्गाचे अनोखेपूजन करून निसर्ग दैवतेला साकडे घातले आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग पाळत संपूर्ण गाव सहभागी झाले होते.निसर्ग देवतेपासून मानवप्राणी बरोबरच पाळीव जनावरांनादेखील सुखी ठेवावे. याशिवाय शेतकऱ्यांचा हंगामदेखील यासाठी सातपुड्यातील आदिवासी गावांमधील आदिवासींमध्ये आपल्या गावाच्या सीमेवर निसर्ग देवतेचे पूजन करण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे शेतातील पेरणी उरकल्यानंतर प्रत्येक गावात समाज पंच मंडळामार्फत गावकऱ्यांची बैठक घेतली जाते. त्यापूर्वी आदल्या दिवशी कोतवालाकडून गावात दवंडी देऊन गावकºयांना बैठकीची सूचना दिली जाते. या बैठकीत निसर्ग पुजनाच्या नियोजनाचा ठराव मांडला जात असतो. सर्वशेतकºयांच्या पेरण्या आटोपल्या की नाही यावर चर्चा होऊन सर्वांच्या संमतीने तारीख निश्चित केली जात असते. त्यामुळे गावातील कुणीही व्यक्ती बाहेर गावी जात नाही.बैठकीतच आर्थिक वर्गणीचेदेखील नियोजन केले जात असते. त्याचबरोबर प्रत्येक घरातून कोतवाल पीठ व तांदूळ गोळा करीत असतो. त्याचाच भंडारा तयार केला जात असतो, असे सगळे नियोजन केल्यानंतर गावकºयांनी गावाच्या सीमेवर निसर्गाचे देऊळ बनविले आहे. तेथे पाला-पाचोळ्याचे पूजन करतात. शिवाय सर्वात जुन्या जनावरांच्या खुट्या जवळ गायीचे शेण ठेवून त्याची पूजा केली जावून मगच भंडारा गावकरी खातात. असे अनोखे निसर्ग पूजन सातपुड्यातील बहुसंख्य गावांमधील आदिवासींनी नुकतेच पार पाडले आहे. त्यांनी निसर्ग देवतेला शेतकºयांचा हंगाम चांगला जावो, पाळीव जनावरांना व मानवास कुठलीही हाणी पोहचू नये अशी प्रार्थना निसर्गदेवतेला केली आहे. गावा-गावातील सर्वच गावकरी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे गावाचे शिवार भाविकांनी फुलले होते. गावातील प्रत्येक गावकºयांनी कोरोनाचे सामाजिक अंतर ठेवन हा उत्सव साजरा केला होता.

सातपुड्यातील आदिवासी निसर्गालाही देवमानत असतात. त्यामुळेच दरवर्षी शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्णझाल्यानंतर प्रत्येक गावात निसर्ग देवतेचे पूजन करतात. त्यापूर्वी ही कुटुंबे रानातील कुठल्याही रानभाज्या खात नाही. एवढेच नव्हे साधे झाडाचे पानदेखील तोडत नसतात. याशिवाय राना-वनातील हिरवा चारा सुद्धा कापत नाही. एवढी अढळ श्रद्धा त्यांची निसर्गावर असल्याचे गावकरी सांगतात. त्याचबरोबर पावसाळा सुरू होतो तेव्हापासून घर सारणेही बंद करतात. निसर्गपूजनानंतर गायीच्या गोठ्यात जुन्या जनावरांच्या खुट्याजवळ शेण ठेवून त्याची शेंदूराने पूजा केल्यानंतर दुसºया दिवसापासून घर सारतात.