शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सातपुड्यातील गावांमध्ये निसर्गपूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : चांगला पाऊस पडून मुबलक प्रमाणात उत्पादन यावे, याशिवाय निसर्गापासून कुणालाही हानी न पोहोचता पाळीव ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : चांगला पाऊस पडून मुबलक प्रमाणात उत्पादन यावे, याशिवाय निसर्गापासून कुणालाही हानी न पोहोचता पाळीव जणावरेही सुखी राहावीत यासाठी सातपुड्यातील बहुसंख्य गावांमधील आदिवासी बांधवांनी नुकतेच आपापल्या गावाच्या शिवारात निसर्गाचे अनोखेपूजन करून निसर्ग दैवतेला साकडे घातले आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग पाळत संपूर्ण गाव सहभागी झाले होते.निसर्ग देवतेपासून मानवप्राणी बरोबरच पाळीव जनावरांनादेखील सुखी ठेवावे. याशिवाय शेतकऱ्यांचा हंगामदेखील यासाठी सातपुड्यातील आदिवासी गावांमधील आदिवासींमध्ये आपल्या गावाच्या सीमेवर निसर्ग देवतेचे पूजन करण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे शेतातील पेरणी उरकल्यानंतर प्रत्येक गावात समाज पंच मंडळामार्फत गावकऱ्यांची बैठक घेतली जाते. त्यापूर्वी आदल्या दिवशी कोतवालाकडून गावात दवंडी देऊन गावकºयांना बैठकीची सूचना दिली जाते. या बैठकीत निसर्ग पुजनाच्या नियोजनाचा ठराव मांडला जात असतो. सर्वशेतकºयांच्या पेरण्या आटोपल्या की नाही यावर चर्चा होऊन सर्वांच्या संमतीने तारीख निश्चित केली जात असते. त्यामुळे गावातील कुणीही व्यक्ती बाहेर गावी जात नाही.बैठकीतच आर्थिक वर्गणीचेदेखील नियोजन केले जात असते. त्याचबरोबर प्रत्येक घरातून कोतवाल पीठ व तांदूळ गोळा करीत असतो. त्याचाच भंडारा तयार केला जात असतो, असे सगळे नियोजन केल्यानंतर गावकºयांनी गावाच्या सीमेवर निसर्गाचे देऊळ बनविले आहे. तेथे पाला-पाचोळ्याचे पूजन करतात. शिवाय सर्वात जुन्या जनावरांच्या खुट्या जवळ गायीचे शेण ठेवून त्याची पूजा केली जावून मगच भंडारा गावकरी खातात. असे अनोखे निसर्ग पूजन सातपुड्यातील बहुसंख्य गावांमधील आदिवासींनी नुकतेच पार पाडले आहे. त्यांनी निसर्ग देवतेला शेतकºयांचा हंगाम चांगला जावो, पाळीव जनावरांना व मानवास कुठलीही हाणी पोहचू नये अशी प्रार्थना निसर्गदेवतेला केली आहे. गावा-गावातील सर्वच गावकरी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे गावाचे शिवार भाविकांनी फुलले होते. गावातील प्रत्येक गावकºयांनी कोरोनाचे सामाजिक अंतर ठेवन हा उत्सव साजरा केला होता.

सातपुड्यातील आदिवासी निसर्गालाही देवमानत असतात. त्यामुळेच दरवर्षी शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्णझाल्यानंतर प्रत्येक गावात निसर्ग देवतेचे पूजन करतात. त्यापूर्वी ही कुटुंबे रानातील कुठल्याही रानभाज्या खात नाही. एवढेच नव्हे साधे झाडाचे पानदेखील तोडत नसतात. याशिवाय राना-वनातील हिरवा चारा सुद्धा कापत नाही. एवढी अढळ श्रद्धा त्यांची निसर्गावर असल्याचे गावकरी सांगतात. त्याचबरोबर पावसाळा सुरू होतो तेव्हापासून घर सारणेही बंद करतात. निसर्गपूजनानंतर गायीच्या गोठ्यात जुन्या जनावरांच्या खुट्याजवळ शेण ठेवून त्याची शेंदूराने पूजा केल्यानंतर दुसºया दिवसापासून घर सारतात.