शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील स्मार्टकार्ड वितरण दीड महिन्यापासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:06 IST

एजन्सी चालकाची मनमानी : आरटीओ अधिकारीही हतबल, वाहनमालक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरटीओ कार्यालय आणि स्मार्ट कार्ड देणारी एजन्सी यांच्यातील समन्वयाअभावी गेल्या दीड महिन्यांपासून वाहनमालक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट कार्ड देण्याच्या नावाखाली दोन महिन्यांपासून वाहन मालकांना फिरवाफिरव केली जात आहे. आरटीओ अधिका:यांचा संबधीत एजन्सीचालकावर वचकच राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमधून 28 डिसेंबरपासून वाहनमालकांना स्मार्टकार्ड देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यासंदर्भात काम दिलेल्या एजन्सीने राज्यातील काही जिल्ह्यात ते काम सुरू देखील केले आहे. परंतु नंदुरबार आरटीओ कार्यालयात केवळ वीज जोडणीच्या कारणामुळे ते सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी दोन महिन्यांपासून वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे संबधीत एजन्सीच्या मनमानीपुढे आरटीओ अधिकारी देखील हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मनमानी कायमराज्यस्तरावरून ज्या एजन्सीला याबाबतचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीने नंदुरबारात मनमानी चालविली आहे. या कामासाठी लागणारी मशिनरी आणि इतर साहित्य येवून पडले आहे. केवळ वीज जोडणीची समस्या आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार आरटीओ कार्यालयाने वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी. परंतु वीज जोडणीचे काम एजन्सीचालकाचे असल्याचे सांगून आरटीओ अधिकारी हात वर करीत आहेत. यामुळे स्मार्ट कार्ड वितरणच अद्यापर्पयत होऊ शकले नसल्याचे चित्र येथील कार्यालयात आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी देखील याकडे दुर्लक्षच केले असल्याचे दिसून येत आहे.वाहनमालक हैराणया जाचामुळे वाहनमालक हैराण झाले आहेत. ज्यांनी स्मार्टकार्डसाठी 25 डिसेंबरपासून कागदपत्रे जमा केली आहेत त्यांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. नवीन वाहनांची नोंदणीप्रमाणेच जुनी वाहने हस्तांतरीत करणे, त्यांच्यावरील कर्ज प्रक्रिया, विक्रीची कागदपत्रे ही सर्व या कारणामुळे अडून पडली आहेत. 1 जानेवारीपासून वाहनमालक आरटीओ कार्यालयाच्या चकरा मारत आहेत परंतु त्यांना योग्य उत्तर मिळत नाही, शिवाय कामही होत नसल्यामुळे    हैराण व्हावे लागत आहे. लांब अंतरावरून आलेल्या वाहनमालकांना खाली हात जावे लागत असल्यामुळे प्रचंड संताप देखील व्यक्त केला जात आहे.जुन्या पद्धतीचा वापर व्हावास्मार्टकार्ड वितरण प्रणाली जेंव्हा सुरू व्हायची असेल तेंव्हा होईल. परंतु सध्या जुन्या पद्धतीचाच वापर करून वाहनचालकांना कागदपत्रे द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत काही वाहनचालक व एजंट यांनी अधिका:यांकडे तशी मागणी देखील केली. परंतु शासन आदेशानुसारच काम करावे लागेल असे सांगून त्यांचीही बोळवण या अधिका:यांनी केली.जबाबदारी कुणाचीस्मार्टकार्ड वितरण प्रणाली चालविणा:या एजन्सीला वीज जोडणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेमकी आरटीओ कार्यालयाची आहे किंवा कसे याबाबत संदिग्धता कायम आहे. आरटीओ अधिकारी केवळ त्यांना वीज जोडणीसाठी सहकार्य करू शकतात. बाकी प्रक्रिया त्यांनी स्वत: राबविणे आवश्यक आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील त्याच पद्धतीने या एजन्सीने वीज पुरवठा घेतलेला आहे.