शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नंदुरबारातील स्मार्टकार्ड वितरण दीड महिन्यापासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:06 IST

एजन्सी चालकाची मनमानी : आरटीओ अधिकारीही हतबल, वाहनमालक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरटीओ कार्यालय आणि स्मार्ट कार्ड देणारी एजन्सी यांच्यातील समन्वयाअभावी गेल्या दीड महिन्यांपासून वाहनमालक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट कार्ड देण्याच्या नावाखाली दोन महिन्यांपासून वाहन मालकांना फिरवाफिरव केली जात आहे. आरटीओ अधिका:यांचा संबधीत एजन्सीचालकावर वचकच राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमधून 28 डिसेंबरपासून वाहनमालकांना स्मार्टकार्ड देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यासंदर्भात काम दिलेल्या एजन्सीने राज्यातील काही जिल्ह्यात ते काम सुरू देखील केले आहे. परंतु नंदुरबार आरटीओ कार्यालयात केवळ वीज जोडणीच्या कारणामुळे ते सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी दोन महिन्यांपासून वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे संबधीत एजन्सीच्या मनमानीपुढे आरटीओ अधिकारी देखील हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मनमानी कायमराज्यस्तरावरून ज्या एजन्सीला याबाबतचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीने नंदुरबारात मनमानी चालविली आहे. या कामासाठी लागणारी मशिनरी आणि इतर साहित्य येवून पडले आहे. केवळ वीज जोडणीची समस्या आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार आरटीओ कार्यालयाने वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी. परंतु वीज जोडणीचे काम एजन्सीचालकाचे असल्याचे सांगून आरटीओ अधिकारी हात वर करीत आहेत. यामुळे स्मार्ट कार्ड वितरणच अद्यापर्पयत होऊ शकले नसल्याचे चित्र येथील कार्यालयात आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी देखील याकडे दुर्लक्षच केले असल्याचे दिसून येत आहे.वाहनमालक हैराणया जाचामुळे वाहनमालक हैराण झाले आहेत. ज्यांनी स्मार्टकार्डसाठी 25 डिसेंबरपासून कागदपत्रे जमा केली आहेत त्यांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. नवीन वाहनांची नोंदणीप्रमाणेच जुनी वाहने हस्तांतरीत करणे, त्यांच्यावरील कर्ज प्रक्रिया, विक्रीची कागदपत्रे ही सर्व या कारणामुळे अडून पडली आहेत. 1 जानेवारीपासून वाहनमालक आरटीओ कार्यालयाच्या चकरा मारत आहेत परंतु त्यांना योग्य उत्तर मिळत नाही, शिवाय कामही होत नसल्यामुळे    हैराण व्हावे लागत आहे. लांब अंतरावरून आलेल्या वाहनमालकांना खाली हात जावे लागत असल्यामुळे प्रचंड संताप देखील व्यक्त केला जात आहे.जुन्या पद्धतीचा वापर व्हावास्मार्टकार्ड वितरण प्रणाली जेंव्हा सुरू व्हायची असेल तेंव्हा होईल. परंतु सध्या जुन्या पद्धतीचाच वापर करून वाहनचालकांना कागदपत्रे द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत काही वाहनचालक व एजंट यांनी अधिका:यांकडे तशी मागणी देखील केली. परंतु शासन आदेशानुसारच काम करावे लागेल असे सांगून त्यांचीही बोळवण या अधिका:यांनी केली.जबाबदारी कुणाचीस्मार्टकार्ड वितरण प्रणाली चालविणा:या एजन्सीला वीज जोडणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेमकी आरटीओ कार्यालयाची आहे किंवा कसे याबाबत संदिग्धता कायम आहे. आरटीओ अधिकारी केवळ त्यांना वीज जोडणीसाठी सहकार्य करू शकतात. बाकी प्रक्रिया त्यांनी स्वत: राबविणे आवश्यक आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील त्याच पद्धतीने या एजन्सीने वीज पुरवठा घेतलेला आहे.