शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कृत्रीम पाणी टंचाईने नंदुरबारकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:18 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाईपलाईन फोडण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न, पाच दिवसांपासून समस्या

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : गेल्या दोन आठवडय़ापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात तर गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकलेला नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत केले जात नसल्यामुळे किंवा पर्यायी व्यवस्थाही होत नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा आहे. आणखी चार ते पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या आठवडय़ापासून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. गेल्या आठवडय़ात मुख्य पाईपलाईनला नवीन व्हॉल्व बसविण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. हा व्हॉल्व बसविल्यानंतर तो लागलीच दोन दिवसांनी तो लिक झाला. परिणामी पाईपलाईनमध्ये माती जात होती. त्यासाठी पुन्हा तो व्हॉल्व दुरूस्त करण्यात आला. ते काम होत नाही तोच धुळे रस्त्यावर मुख्य पाईपलाईनला कुणीतरी विघअसंतोषी व्यक्तीने खिळा ठोकून दिला होता. त्यामुळे पाईपलाईन लिकेज होत होती. त्याच्या दुरूस्तीसाठी पुर्ण पाईपलाईन बंद करावा लागली. ओलसर पणामुळे लिकेजच्या ठिकाणी वेल्डींग देखील करता येत नव्हते. परिणामी पुर्ण पाईपलाईनमधील पाणी काढून ती कोरडी करावी लागली. त्या कामाला देखील दोन दिवस लागले. त्यानंतर निर्धारित कालावधीत जलकुंभ स्वच्छता करण्यात आले. ते भरण्यासाठी पुन्हा एक दिवस गेला.या सर्व कारणांमुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक पुर्णत: कोलमडले आहे. धुळे रस्त्यावरील अनेक वसाहतींमध्ये चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याकडे अधिकारी व पदाधिका:यांनीही दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.विस्कळीत पाणीपुरवठय़ाबाबत पालिकेकडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत करण्यात आले नसल्यामुळे नागरिक अनभिज्ञ राहिले. शिवाय ज्या भागात तीनपेक्षा अधीक दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही अशा भागात पालिकेने टँकर देखील पुरविले नसल्यामुळे नागरिकानी संताप व्यक्त केला. सोमवारी सायंकाळर्पयत वेळापत्रक कोलमडलेलेच होते. यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. उद्रेक होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा..शहरात एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागणार नाही हे स्पष्टच आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा वेळापत्रक विस्कळीत होते. त्यासंदर्भात पालिकेने नागरिकांना वेळोवेळी सुचीत करणे किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाहन करणे देखील आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.शहराला विरचक प्रकल्पातून तसेच आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंबेबारा धरणातील 50 टक्के पाणीसाठा आरक्षीत करण्यात येतो. त्यानुसार सध्या आंबेबारा धरणातून देखील आष्टे पंपींग स्टेशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकर पुरविणे आवश्यक असतांना त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले आहे.