शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रीम पाणी टंचाईने नंदुरबारकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:18 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाईपलाईन फोडण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न, पाच दिवसांपासून समस्या

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : गेल्या दोन आठवडय़ापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात तर गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकलेला नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत केले जात नसल्यामुळे किंवा पर्यायी व्यवस्थाही होत नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा आहे. आणखी चार ते पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या आठवडय़ापासून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. गेल्या आठवडय़ात मुख्य पाईपलाईनला नवीन व्हॉल्व बसविण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. हा व्हॉल्व बसविल्यानंतर तो लागलीच दोन दिवसांनी तो लिक झाला. परिणामी पाईपलाईनमध्ये माती जात होती. त्यासाठी पुन्हा तो व्हॉल्व दुरूस्त करण्यात आला. ते काम होत नाही तोच धुळे रस्त्यावर मुख्य पाईपलाईनला कुणीतरी विघअसंतोषी व्यक्तीने खिळा ठोकून दिला होता. त्यामुळे पाईपलाईन लिकेज होत होती. त्याच्या दुरूस्तीसाठी पुर्ण पाईपलाईन बंद करावा लागली. ओलसर पणामुळे लिकेजच्या ठिकाणी वेल्डींग देखील करता येत नव्हते. परिणामी पुर्ण पाईपलाईनमधील पाणी काढून ती कोरडी करावी लागली. त्या कामाला देखील दोन दिवस लागले. त्यानंतर निर्धारित कालावधीत जलकुंभ स्वच्छता करण्यात आले. ते भरण्यासाठी पुन्हा एक दिवस गेला.या सर्व कारणांमुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक पुर्णत: कोलमडले आहे. धुळे रस्त्यावरील अनेक वसाहतींमध्ये चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याकडे अधिकारी व पदाधिका:यांनीही दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.विस्कळीत पाणीपुरवठय़ाबाबत पालिकेकडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत करण्यात आले नसल्यामुळे नागरिक अनभिज्ञ राहिले. शिवाय ज्या भागात तीनपेक्षा अधीक दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही अशा भागात पालिकेने टँकर देखील पुरविले नसल्यामुळे नागरिकानी संताप व्यक्त केला. सोमवारी सायंकाळर्पयत वेळापत्रक कोलमडलेलेच होते. यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. उद्रेक होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा..शहरात एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागणार नाही हे स्पष्टच आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा वेळापत्रक विस्कळीत होते. त्यासंदर्भात पालिकेने नागरिकांना वेळोवेळी सुचीत करणे किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाहन करणे देखील आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.शहराला विरचक प्रकल्पातून तसेच आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंबेबारा धरणातील 50 टक्के पाणीसाठा आरक्षीत करण्यात येतो. त्यानुसार सध्या आंबेबारा धरणातून देखील आष्टे पंपींग स्टेशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकर पुरविणे आवश्यक असतांना त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले आहे.