शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

नंदुरबारचा कोरोनाबाधीत मृत्यूदर ९.३७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:34 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत ३२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत ३२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यूदर हा ९.३७ टक्के इतका आहे. शेजारील जिल्ह्यांच्या मानाने तो कमी असला तरी देशाच्या मानाने तो सर्वाधिक आहे. मृत्यू झालेल्यांंचा वयोगट हा युवक मध्यम वयस्क वे वृद्ध असा आहे. सध्या १० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी नंदुरबारात आढळून आला होता. त्यांच्याच परिवारातील इतर तीनजण देखील आढळून आले होते. नंतर शहादा व त्या पाठोपाठ अक्कलकुवा येथे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक १७ रुग्ण नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल ११ रुग्ण हे शहादा तालुक्यातील आहेत.अक्कलकुवा तालुक्यात चार रुग्ण होते. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात ९.३७ टक्के इतके आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये शहादा येथील ३२ वर्षीय युवक, नंदुरबार येथील ७० वर्षीय वृध्दा आणि हिंगणी, ता.शहादा येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याचा अर्थ जिल्ह्यात तरुण, मध्यम वयाचा आणि वृद्ध अशा वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे. ३२ रुग्णांपैकी १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय बामखेडा, ता.शहादा येथील रुग्ण हा नाशिक येथे डिटेक्ट झाला आहे.सोमावल, ता.तळोदा येथील मयत गरोदर महिला देखील नाशिक येथेच डिटेक्ट झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णांची नोंद ही नाशिक येथे करण्यात आली आहे.

आठवडानिहाय मृत्यू संख्या१८ ते २६ एप्रिल - १८ ते १५ मे- १२२ ते २९ मे- १नंदुरबार व हिंगणी येथील अनुक्रमे वृद्धा व व्यक्ती हे अहवाल येण्याच्या आधीच मृत्यू झाले होते. तर शहादा येथील रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता.कोरोनाबाधीतांचा वयोगट०५ ते २० वर्ष - ०३२० ते ४०- १२४० ते ६०- १३६० ते ८०- ०४तपासणी व अहवाल१,२८३ जणांची तपासणी१,२०९ जण निगेटिव्ह३२ जण पॉझिटिव्ह३४ अहवाल प्रलंबीत१९ कोरोनामुक्तपरजिल्हा व राज्यातून आलेले लोकंनंदुरबार तालुक्यात २१ हजार ३७५़नवापुर तालुक्यात ४ हजार ९२५़तळोदा तालुक्यात ८ हजार ९११़शहादा तालुका-७ हजार ३०३़अक्कलकुवा ८ हजार ८६३़तर धडगाव तालुक्यात ९ हजार ४८५ नागरिकांनी प्रवेश केला होता़एकूण ६० हजार ८६२ जिल्ह्यात प्रवेश केला.

जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर हा दहा टक्केचा आत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्ह्यात बऱ्यापैकी यश आले आहे.-डॉ.आर.डी.भोये, जिल्हा शल्य चिकित्सक. नंदुरबार.