शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

नंदुरबारात विरोधाला विरोध न ठेवता सर्वसमावेशक विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:49 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :पालिकेतील एकुण 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांना शहर विकास आणि आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्याचे नव्याने आव्हान राहणार आहे. सुदैवाने नगराध्यक्षपदी दिर्घ अनुभव असलेल्या र}ा रघुवंशी असल्याने शहराचा सर्वागिन विकास होईल आणि विकासाची गती कायम राहील. सत्ताधारी आणि ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :पालिकेतील एकुण 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांना शहर विकास आणि आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्याचे नव्याने आव्हान राहणार आहे. सुदैवाने नगराध्यक्षपदी दिर्घ अनुभव असलेल्या र}ा रघुवंशी असल्याने शहराचा सर्वागिन विकास होईल आणि विकासाची गती कायम राहील. सत्ताधारी आणि विरोधक हा भेद राहणार नाही, विरोधकांनी देखील केवळ विरोधाला विरोध म्हणून योजना आणि विकास कामांना खिळ बसविणार नाही अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.पालिकेच्या निवडणुकीचे कवित्त्व आता संपल्यासारखे आहे. परंतु आता येत्या पाच वर्षात शहर विकासाचे व्हिजन कायम ठेवून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे देखील तेवढेच गरजेचे ठरणार आहे. यापूर्वी शहर विकासाची गाडी सुपरफास्ट धावली आहे. निवडणुकांमुळे ती सध्या थांबली असली तरी सत्ताधारींकडेच जनतेने पुन्हा पालिका सोपविली असल्यामुळे ही सुपरफास्ट पुन्हा धावू लागेल यात शंका नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आधीच कामांचे नियोजन करून ठेवले असले तरी नव्याने आलेल्या सदस्यांची मर्जी सांभाळणे आणि त्यांच्या कामांच्या, विकासाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी देखील प्रय} करावे लागणार आहेत.पालिकेत निवडून आलेल्या 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने अर्थात पहिल्यांदाच पालिकेचे सदस्य म्हणून येणार आहेत. याआधी नगरसेवक असलेल्या पाच सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेजखान, किरण रघुवंशी, दिपक दिघे आणि चारुदत्त कळवणकर यांचा समावेश आहे. नवीन निवडून आलेल्या सदस्यांना पालिकेचे कामकाज, सभागृहाचे कामकाज आणि आपल्या प्रभागातील प्रश्न, समस्या आणि नागरिकांची मागणी यादृष्टीने त्यांना अवगत करून देणे आवश्यक ठरणार आहे. 39 सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या तब्बल 22 इतकी आहे. त्यातील केवळ एकच महिला माजी नगरसेवकाच्या प}ी आहेत. पालिकेत यावेळी विरोधातील 11 नगरसेवक देखील राहणार आहेत. यापूर्वी पालिकेने विकास करतांना सत्ताधारी व विरोधक हा भेद ठेवला नव्हता. सर्वसमावेशक विकास हे ध्येय समोर ठेवले होते. आता देखील तेच ध्येय ठेवणे आवश्यक ठरणार आहे. विरोधकांकडून काही कामांना, योजना, निधी यांना विरोध होऊ शकतो. लोकशाहीत ही बाब सर्वसामान्य समजली जाते. त्यामुळे विरोध केला म्हणून संबधिताच्या प्रभागात काम न करणे ही मानसिकता असू नये विरोधकांनी देखील केवळ विरोधाला विरोध म्हणून कामांमध्ये आडकाठी आणून शहर विकासाच्या योजनांना खिळ घालू नये ही देखील अपेक्षा जनतेची राहणार आहे.शहराचा विकासाचा वेग पहाता आणि झालेली कामे पहाता शहरवासीयांनी काँग्रेसवर पुन्हा विश्वास व्यक्त करीत त्यांच्याकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे झालेल्या विकास कामांच्या बळावर आणि होऊ घातलेल्या कामांच्या बळावर शहराला राज्यातील पहिल्या दहा विकसीत आणि स्मार्ट शहरांच्या रांगेत आणण्याचे ध्येय काँग्रेसला ठेवावे लागणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. शासनाकडून विविध योनजेच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याची कला आहे. शासनातील मंत्री, अधिकारी यांच्याशी वैयक्तिक संबधाच्या माध्यमातून ते योजना मंजुर करून आणून कामेही करून घेतात. त्यामुळे ‘पहिल्या दहा शहरात’ हे ध्येय पुर्ण करणे फारसे कठीण राहणार नाही. त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन करून त्यानुसार कामांची आखणी केल्यास ते शक्य होणार आहे.एकुणच शहरवासीयांनी सलग चौथ्यांदा काँग्रेसवर पर्यायाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे शहराचा सर्वागीन विकासाचे ध्येय तर त्यांनी ठेवले आहेच, परंतु विकास कामांची गती कायम राखणे देखील तेवढेचे गरजेचे ठरणार आहे.