शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

नंदुरबार : छाननीत १३ अर्ज वैध, ११ फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:27 IST

नंदुरबार : उमेदवारी अर्जांच्या छाननीत १३ अर्ज वैध ठरविण्यात आले. भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज ...

नंदुरबार : उमेदवारी अर्जांच्या छाननीत १३ अर्ज वैध ठरविण्यात आले. भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज केला होता. परंतु पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. नटावदकरांचा अपक्ष अर्ज मात्र कायम आहे. आता १२ एप्रिलच्या माघारीच्या मुदतीकडे लक्ष लागून आहे.अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ उमेदवारांनी एकुण २४ अर्ज दाखल केले होते. बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. याशिवाय भाजपच्या उमेदवार डॉ.हिना गावीत यांनी भरलेला डमी आणि अपक्ष अर्ज, काँग्रेस उमेदवार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा डमी व अपक्ष अर्ज, डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपतर्फे भरलेला अर्जही बाद करण्यात आला.वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे : अ‍ॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), रेखा सुरेश देसाई बहुजन समाज पार्टी, हिना विजयकुमार गावीत (भाजप), सुशिल सुरेश अंतुर्लीकर (बहुजन वंचीत आघाडी), कृष्णा ठोगा गावीत (भारतीय ट्रायबल पार्टी), संदीप अभिमन्यू वळवी (बहुजन मुक्ती पार्टी), तर अपक्षांमध्ये अजय करमसिंग गावीत, अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे, अशोक दौलतसिंग पाडवी, आनंदा सुकलाल कोळी, डॉ.सुहास जयंत नटावदकर, हेमलता कागडा पाडवी व भरत जाल्या पावरा यांचा समावेश आहे.