शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

नंदूरबार रेल्वे स्थानकाची तपासणी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील मध्यस्थानी असलेल्या नंदूरबार रेल्वेस्थानक सार्वजनिक ठिकाणी कोरोना आजार संक्रमण होण्याची दाट शक्यता असताना रेल्वे प्रशासनाकडून ...

महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील मध्यस्थानी असलेल्या नंदूरबार रेल्वेस्थानक सार्वजनिक ठिकाणी कोरोना आजार संक्रमण होण्याची दाट शक्यता असताना रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नसल्याने कोरोना आजार संक्रमित होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व गुजरात-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर रेल्वेस्थानक असून येथून अमळनेर, जळगाव, भुसावळ या मार्गांकडे उत्तर महाराष्ट्रामधील प्रवासी ये-जा करतात. तर, गुजरात राज्यातील बारडोली, सुरत, बडोदा, अहमदाबाद या मार्गावरील प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. उद्योग व्यवसायासाठी आंतरजिल्ह्यातून व आंतरराज्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने तपासणी होणे आवश्यक आहे.

शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक व बंधनकारक असताना नंदूरबार रेल्वेस्थानकामध्ये कर्मचारी व प्रवासी विनामास्क दिसून येत आहेत. प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यवाही केलेल्या व दंडीत केलेल्या प्रवाशांच्या संख्येबाबत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचे काम आमचे नसून तिकीट तपासणी करणाऱ्यांचे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तिकीट तपासणी कर्मचाऱ्याने आम्हाला लेखी आदेश मिळाला नसल्याने आम्ही कार्यवाही करू शकत नाही. मात्र, प्रवाशांना वारंवार सूचना देण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.

रेल्वेस्थानकांत विनामास्कवर कार्यवाही करणार कोण

रेल्वे स्थानकांत प्रवासी,खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानदार व कामगार,रेेल्वे प्रशासनातील कर्मचारी व रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी मास्क लावत नसून शासन नियमाबाबत निष्काळजीपणा करताना दिसून येत आहे. त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांवर कार्यवाही करणार कोण,असा प्रश्न निर्माण होत आहे. रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराजवळ हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर व ताप मोजणे आवश्यक असताना तपासणी न करता प्रवाशांना स्थानकांत सोडले जात असल्याचे चित्र आहे.

फक्त आंतरजिल्हा व राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चौकशी

स्थानकांत रेल्वेगाडी आल्यावर प्रवासी विनामास्क खरेदी करतात,त्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्याची गरज आहे.रेल्वेस्थानकात फक्त आंतरजिल्हा व राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची फक्त तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांची फक्त नावालाच चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत कोणतीही शारीरिक चाचणी न करता फक्त नावनोंदणी करण्यात येत आहे. रेल्वेेे प्रशासनाने आंतरजिल्हा व राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे.