शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

नंदुरबारला गरज ‘सुरक्षेच्या’ शिक्षणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व प्रशासन दररोज करत आहे़ परंतु नंदुरबार शहरात मात्र सर्वकाही आलबेल असल्याच्या थाटात नागरीक वावरत असून दोन पोलीस ठाण्यांनी सुमारे ५०० जणांवर कारवाई करुन मास्क वापराबाबत गांभिर्य नसल्याचे चित्र पुन्हा दिसून आले़जिल्ह्यात कोरोनबाधितांचा आकडा येत्या काही दिवसात १ हजाराच्या पुढे जाणार आहे़ मयतांची संख्या आधीच वाढून ५० च्या जवळ गेली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना किमान मास्क लावून यावे असा आग्रह प्रशासनाचा आहे़ परंतु बरेच नागरिक मात्र हा आग्रह मोडून संसर्गाला खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे़ ‘लोकमत’ने शहरातील मास्क वापराबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेकांना मास्क वापरण्याची कोणतीही गरज नसल्याच्या त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येत होता़ मास्कचा वापर हा सार्वजनिक जागी तसेच सोशल डिस्टन्सिंग नसल्यास प्रभावी ठरत असतानाही अनेक जण त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले़ शहरातील सुभाष चौक, हाटदरवाजा, सराफ बाजार, मंगळबाजार, नेहरू चौक परिसरात अनेक जण विनामास्क वापरता फिरत असल्याचे सहज नजरेस पडत होते़ बहुतेक जण दुचाकींवर तीन सीट बसूनही मास्कचा वापर करत नसल्याचे समोर आले़ काही व्यावसायिक अर्धवट मास्कचा वापर करुन सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत होते़ यातून नंदुरबार शहरात वावरणाºया नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे समोर आले आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्हाधिकारी यांनी लागू करत मनाई आदेश काढले आहेत़ सोबत साथरोग प्रतिबंधात्मक कायदाही लागू करण्यात आला आहे़ या कायद्यांन्वये उपाययोजना न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणे गुन्हा ठरतो़दोन्ही कायदे लागू असतानाही शहरातील उपनगर पोलीस हद्द व शहर पोलीस ठाणे हद्दीत अनेकजण मास्क विना फिरत असल्याचे समोर आले होते़ शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा लागू झाल्यापासून आजअखेरीस ३०० तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीत ११५ जणांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे़दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दर दिवशी दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल होत असतानाही मास्कविना फिरणारे आढळून येत आहेत़ दोन्ही ठाण्यात दररोज किमान चार जणांवर गुन्हे दाखल होतात़समोरासमोर येणाºया दोघांनी मास्क घातला असेल तर संसर्गाचा धोका कमी असतो़ एकाने मास्क न घालणे व दुसºयाने घालणे यातून तसेच मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास कोरोनाचा संसर्ग वाढतो़ नागरिकांनी योग्य त्या पद्धतीने मास्कचा वापर करावा़ मास्क वापरण्याआधी स्वत:चे हात स्वच्छपणे धुऊन वापरल्यास संसर्गाचा धोका कमी होता़-डॉ़ हार्दिक पटेल, साथरोग नियंत्रण तज्ञ, नंदुरबाऱ