शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

नंदुरबारला गरज ‘सुरक्षेच्या’ शिक्षणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व प्रशासन दररोज करत आहे़ परंतु नंदुरबार शहरात मात्र सर्वकाही आलबेल असल्याच्या थाटात नागरीक वावरत असून दोन पोलीस ठाण्यांनी सुमारे ५०० जणांवर कारवाई करुन मास्क वापराबाबत गांभिर्य नसल्याचे चित्र पुन्हा दिसून आले़जिल्ह्यात कोरोनबाधितांचा आकडा येत्या काही दिवसात १ हजाराच्या पुढे जाणार आहे़ मयतांची संख्या आधीच वाढून ५० च्या जवळ गेली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना किमान मास्क लावून यावे असा आग्रह प्रशासनाचा आहे़ परंतु बरेच नागरिक मात्र हा आग्रह मोडून संसर्गाला खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे़ ‘लोकमत’ने शहरातील मास्क वापराबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेकांना मास्क वापरण्याची कोणतीही गरज नसल्याच्या त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येत होता़ मास्कचा वापर हा सार्वजनिक जागी तसेच सोशल डिस्टन्सिंग नसल्यास प्रभावी ठरत असतानाही अनेक जण त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले़ शहरातील सुभाष चौक, हाटदरवाजा, सराफ बाजार, मंगळबाजार, नेहरू चौक परिसरात अनेक जण विनामास्क वापरता फिरत असल्याचे सहज नजरेस पडत होते़ बहुतेक जण दुचाकींवर तीन सीट बसूनही मास्कचा वापर करत नसल्याचे समोर आले़ काही व्यावसायिक अर्धवट मास्कचा वापर करुन सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत होते़ यातून नंदुरबार शहरात वावरणाºया नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे समोर आले आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्हाधिकारी यांनी लागू करत मनाई आदेश काढले आहेत़ सोबत साथरोग प्रतिबंधात्मक कायदाही लागू करण्यात आला आहे़ या कायद्यांन्वये उपाययोजना न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणे गुन्हा ठरतो़दोन्ही कायदे लागू असतानाही शहरातील उपनगर पोलीस हद्द व शहर पोलीस ठाणे हद्दीत अनेकजण मास्क विना फिरत असल्याचे समोर आले होते़ शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा लागू झाल्यापासून आजअखेरीस ३०० तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीत ११५ जणांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे़दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दर दिवशी दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल होत असतानाही मास्कविना फिरणारे आढळून येत आहेत़ दोन्ही ठाण्यात दररोज किमान चार जणांवर गुन्हे दाखल होतात़समोरासमोर येणाºया दोघांनी मास्क घातला असेल तर संसर्गाचा धोका कमी असतो़ एकाने मास्क न घालणे व दुसºयाने घालणे यातून तसेच मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास कोरोनाचा संसर्ग वाढतो़ नागरिकांनी योग्य त्या पद्धतीने मास्कचा वापर करावा़ मास्क वापरण्याआधी स्वत:चे हात स्वच्छपणे धुऊन वापरल्यास संसर्गाचा धोका कमी होता़-डॉ़ हार्दिक पटेल, साथरोग नियंत्रण तज्ञ, नंदुरबाऱ