शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला गरज ‘सुरक्षेच्या’ शिक्षणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व प्रशासन दररोज करत आहे़ परंतु नंदुरबार शहरात मात्र सर्वकाही आलबेल असल्याच्या थाटात नागरीक वावरत असून दोन पोलीस ठाण्यांनी सुमारे ५०० जणांवर कारवाई करुन मास्क वापराबाबत गांभिर्य नसल्याचे चित्र पुन्हा दिसून आले़जिल्ह्यात कोरोनबाधितांचा आकडा येत्या काही दिवसात १ हजाराच्या पुढे जाणार आहे़ मयतांची संख्या आधीच वाढून ५० च्या जवळ गेली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना किमान मास्क लावून यावे असा आग्रह प्रशासनाचा आहे़ परंतु बरेच नागरिक मात्र हा आग्रह मोडून संसर्गाला खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे़ ‘लोकमत’ने शहरातील मास्क वापराबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेकांना मास्क वापरण्याची कोणतीही गरज नसल्याच्या त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येत होता़ मास्कचा वापर हा सार्वजनिक जागी तसेच सोशल डिस्टन्सिंग नसल्यास प्रभावी ठरत असतानाही अनेक जण त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले़ शहरातील सुभाष चौक, हाटदरवाजा, सराफ बाजार, मंगळबाजार, नेहरू चौक परिसरात अनेक जण विनामास्क वापरता फिरत असल्याचे सहज नजरेस पडत होते़ बहुतेक जण दुचाकींवर तीन सीट बसूनही मास्कचा वापर करत नसल्याचे समोर आले़ काही व्यावसायिक अर्धवट मास्कचा वापर करुन सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत होते़ यातून नंदुरबार शहरात वावरणाºया नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे समोर आले आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्हाधिकारी यांनी लागू करत मनाई आदेश काढले आहेत़ सोबत साथरोग प्रतिबंधात्मक कायदाही लागू करण्यात आला आहे़ या कायद्यांन्वये उपाययोजना न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणे गुन्हा ठरतो़दोन्ही कायदे लागू असतानाही शहरातील उपनगर पोलीस हद्द व शहर पोलीस ठाणे हद्दीत अनेकजण मास्क विना फिरत असल्याचे समोर आले होते़ शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा लागू झाल्यापासून आजअखेरीस ३०० तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीत ११५ जणांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे़दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दर दिवशी दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल होत असतानाही मास्कविना फिरणारे आढळून येत आहेत़ दोन्ही ठाण्यात दररोज किमान चार जणांवर गुन्हे दाखल होतात़समोरासमोर येणाºया दोघांनी मास्क घातला असेल तर संसर्गाचा धोका कमी असतो़ एकाने मास्क न घालणे व दुसºयाने घालणे यातून तसेच मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास कोरोनाचा संसर्ग वाढतो़ नागरिकांनी योग्य त्या पद्धतीने मास्कचा वापर करावा़ मास्क वापरण्याआधी स्वत:चे हात स्वच्छपणे धुऊन वापरल्यास संसर्गाचा धोका कमी होता़-डॉ़ हार्दिक पटेल, साथरोग नियंत्रण तज्ञ, नंदुरबाऱ