शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

सरळ लढतींमुळे रंगत वाढणार : नंदुरबार पालिका निवडणूक

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: December 3, 2017 13:10 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सातजण रिंगणात असले तरी खरी लढत या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्येच रंगणार आहे. शिवाय तब्बल 17 प्रभागांमध्ये सरळ लढती राहणार आहेत. 15 प्रभागात तिरंगी  तर सात प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होणार ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सातजण रिंगणात असले तरी खरी लढत या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्येच रंगणार आहे. शिवाय तब्बल 17 प्रभागांमध्ये सरळ लढती राहणार आहेत. 15 प्रभागात तिरंगी  तर सात प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत. माघारी व चिन्ह वाटपानंतर आता प्रचाराला वेग आला आहे. नंदुरबारातील पालिका निवडणूक ही काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ होईल अशी शक्यता पुर्वीपासूनच राजकीय जाणकारांमध्ये व्यक्त होत होती. घडामोडी देखील तशाच रंगल्या होत्या. माघारीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला असला तरी प्रभागात पक्षाला उमेदवारांची चणचण भासली. एमआयएमने देखील नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देवून काही प्रभागात उमेदवार उभे केले. त्यामुळे 90 टक्के प्रभागात काँग्रेस-सेना युती आणि भाजप यांच्यातच सरळ लढती रंगणार आहेत.17 प्रभागात दोघेच आमनेसामनेकाँग्रेस व भाजपचे दोघेच उमेदवार आमनेसामने राहण्याची स्थिती 17 प्रभागांमध्ये आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये काटय़ाची टक्कर राहणार आहे. कारण मतविभागणीसाठी तिसरा उमेदवार नसल्यामुळे ही स्थिती राहणार आहे. अशा लढती प्रभाग 1 ब, 2 अ, 2 ब, 4 अ, 5 अ, 5 ब, 6 अ, 7 ब, 8 अ, 9 अ, 10 अ, 10 ब, 11 अ, 16 अ, 18 ब, 19 अ व 19 ब मध्ये राहणार आहेत. या प्रभागांमध्ये अनेक लढती रंगतदार होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे.15 ठिकाणी तिरंगी लढती15 प्रभागांमध्ये तिरंगी लढती रंगणार आहेत. या प्रभागातील काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांसमोर काही ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम व राष्ट्रवादीचे उमेदवार तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांचे मते फोडण्याचे प्रकार होण्यासाठी देखील काहींना उभे केले आहे. अशा प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 1 अ, 3 अ, 3 ब, 4 ब, 6 ब, 7 अ, 9 ब, 12 अ, 13 अ, 14 अ, 14 ब, 15 अ, 17 अ, 18 अ व 19 क या प्रभागांचा समावेश आहे. सर्वाधिक उमेदवारयंदा केवळ दोनच प्रभागात पाच पेक्षा अधीक उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये तब्बल आठ उमेदवार तर प्रभाग 13 ब मध्ये सात उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या पंचवार्षिकचा विचार केला असता तब्बल आठ प्रभागात सात पेक्षा अधीक उमेदवार होते. यंदा ही संख्या अवघी दोनवर आली आहे. हौशी मंडळी बाहेरचयंदा अनेक हौशी मंडळी इच्छा असूनही निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेरच राहिली. काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडे अनेक इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. परंतु दोन्ही पक्षांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा विचार करून तसेच जात, उमेदवाराचे समाजातील वलय, त्याने केलेले काम हे पाहूनच उमेदवारी दिली गेली. परिणामी उमेदवारी नाकारलेल्या अनेकांनी अपक्ष उभे न राहता निवडणूक रिंगणाच्या    बाहेरच राहणे पसंत केलेले दिसून येत आहे.