शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नंदुरबार पालिका निवडणुक : सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:25 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर व तळोदा या तिन्ही पालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व असले तरी यावेळी मात्र भाजपने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने यावेळी या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषत: जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या नंदुरबार पालिकेच्या ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर व तळोदा या तिन्ही पालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व असले तरी यावेळी मात्र भाजपने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने यावेळी या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषत: जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी एक लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याने येथील निवडणूक अधिक प्रतिष्ठेची झाली आहे. पालिका निवडणुकीत माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून नंदुरबार पालिकेत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार आहे. या ठिकाणी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा र}ा रघुवंशी व भाजपचे डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी यांच्यात अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची लढत रंगत आहे. काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सर्व जोर लावला आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी हे स्वत: प्रत्येक मतदाराच्या भेटीगाठी घेत असून कॉर्नर सभांवरही भर दिला आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांर्पयत पोहचविण्यासाठी त्यांचे प्रय} आहेत.  गेल्या पाच वर्षाच्या काळात शहर विकासाच्या 200 कोटींपेक्षा अधीक योजना व कामांची जंत्री ते लोकांपुढे मांडत आहेत. दुसरीकडे भाजपतर्फे डॉ.रवींद्र चौधरी यांच्या बरोबरच खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शरिष चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीसह कॉर्नर सभांवर त्यांचाही भर आहे. डॉ.विजयकुमार गावीत हे आपल्या जाहिर सभांमधून नंदुरबारच्या विकासासाठी आपणही निधी मिळवून देण्यासाठी काय प्रय} केले त्याची माहिती सांगत असून खासदारांच्या माध्यमातून परिसरात व जिल्ह्यात केलेल्या विकास कामांची माहिती देत आहेत. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने पालिकेचीही सत्ता मिळाल्यास विकासाला गती येईल असे मतदारांना पटवून देण्यासाठी त्यांचा प्रय} आहे. उमेदवार डॉ.रवींद्र चौधरी स्वत: उद्योजक असल्याने शहरातील बेरोजगार युवकांसाठी उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा मुद्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय भाजपतर्फे विविध आरोपांचा पाढा वाचला जात आहे.भाजप आणि काँग्रेसचा या प्रतिष्ठेच्या लढतीत उर्वरित पाच उमेदवारांची भुमिका महत्त्वाची ठरत आहे. कारण या पाचपैकी दोन उमेदवार अर्थात एमआयएमचे सैय्यद रफअत व राष्ट्रवादीचे शेख आरिफ कमर हे मुस्लिम समाजातील आहेत. विशेष म्हणजे शहरातील एक लाख मतदारांपैकी 25 हजारापेक्षा अधीक मतदार मुस्लिम आहेत. त्यामुळे या उमेदवारांना मिळणा:या मताधिक्यावरही काँग्रेस आणि भाजपच्या विजयाचे समिकरण अवलंबून असल्याने त्याकडेही विशेष लक्ष आहे.प्रचारात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रचंड यंत्रणा कामाला लागली आहे. रिक्षावरील ध्वनीक्षेपक, एलईडी स्क्रिन, तीनचाकी सायकलच्या माध्यमातून लक्षवेधी प्रचार सुरू आहे. प्रचारातील गितांनी तर अतिरेक केला आहे. त्यामुळे एकुणच नंदुरबार शहरातील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे.नवापूर, तळोद्यात तिरंगीनंदुरबारच्या प्रचाराच्या वातावरणाच्या तुलनेत नवापूर आणि तळोद्यात प्रचार यंत्रणा फारशी सक्रीय नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी प्रचार सुरू आहे. प्रचार रॅली किंवा कॉर्नर सभा होत आहेत. पण नंदुरबारच्या तुलनेत कमी आहे.तळोद्यात काँग्रेसचे भरत माळी, भाजपचे अजय परदेशी व राष्ट्रवादीचे देवेंद्र जोहरी यांच्यात तिरंगी लढत आहे. या ठिकाणी देखील काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे उमेदवार भरत माळी हे पूर्वी नगराध्यक्ष होते परंतु त्यांना अपात्र ठरविल्याने अडिच वर्षापासून तेथे त्यांच्याच मर्जीतील काँग्रेसच्याच र}ा चौधरी या नगराध्यक्षपदाचे कामकाज सांभाळत होते. आता ते पुन्हा स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी देखील विकासाचा मुद्दा घेवून प्रचार सुरू केला आहे. भाजपचे अजय परदेशी यांनी त्यांना कडवे आव्हान दिले आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्तेच्या बळावर विकास कामे करण्याचे ते आश्वासन देत आहे. राष्ट्रवादीने देखील येथे उमेदवार दिला असून या ठिकाणी या पक्षाचेही प्राबल्य असल्याने तिरंगी लढत होत आहे.नवापूर मध्ये देखील काँग्रेसतर्फे हेमलता अजय परदेशी, राष्ट्रवादीतर्फे अर्चना नगराळे तर भाजपतर्फे ज्योती जयस्वाल हे रिंगणात आहेत. येथे एकुण सहा उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत तिघांमध्येच आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा युवानेते शिरिष नाईक व भरत गावीत यांनी स्विकारली असून केलेल्या विकास कामांच्या बळावर ते ही निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी मागील थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कै.गोविंदराव वसावे हे विजयी झाले होते. त्यांच्यानंतर गेल्या दोन, तीन वर्षापासून नरेंद्र नगराळे यांनी धूरा स्विकारीत पालिकेत विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून चांगला जम बसविला होता. त्यांच्याच प}ी अर्चना वळवी-नगराळे या निवडणूक लढवीत असल्याने त्या निवडणुकीच्या स्पर्धेत आल्या आहेत. त्यांच्या प्रचाराची धूरा माजी आमदार शरद गावीत यांनी स्विकारली आहे. भाजपचा या ठिकाणी मागील काळात पालिकेत फारसा प्रभाव नसला तरी केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप कार्यकत्र्यामध्ये येथे उत्साह आला आहे. शिवाय खासदार डॉ.हिना गावीत या स्वत: येथे प्रचाराची धूरा सांभाळत असल्याने भाजपचे उमेदवारही येथे स्पर्धेत आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत रंगत आहे.एकुणच निवडणुकीला अद्याप आठ दिवस बाकी असल्याने या आठ दिवसाच्या प्रचारात आपल्या भुमिका प्रभावीपणे मतदारांर्पयत कोण पोहचविणार त्यावर तिन्ही ठिकाणच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.