शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये पूर रेषेच्या गावांचा नव्याने सर्व्हेच नाही

By admin | Updated: June 7, 2017 13:46 IST

१५ वर्षांपूर्वीच्या सर्व्हेवरच उपाययोजना : चार तालुक्यात तर एकही गाव नाही

आॅनलाईन लोकमत/मनोज शेलार 
नंदुरबार,दि.७ - जिल्ह्यातील पूर रेषेतील गावांचा नव्याने सर्व्हेच करण्यात आलेला नाही. १५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारावरच दरवर्षी उपाययोजना करण्यात येतात. यंदा देखील तीच स्थिती आहे. जिल्ह्यात रेड लाईन अंतर्गत २९ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही सर्व गावे केवळ नंदुरबार व शहादा तालुक्यातीलच आहेत. इतर तालुक्यांमध्ये अशी शक्यताच नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे.
पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्यावर अनेक गावांचा संपर्क तुटतो. अनेक गावातील काही वस्त्या पाण्याखाली येतात. अशा ठिकाणी उपाययोजना कराव्या म्हणून प्रशासन पावसाळ्यापुर्वी बैठका घेवून संबधीतांना सुचना देत असतात. परंतु गांभिर्याने उपाययोजना होतच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी पाचोराबारी गावाची घटना घडली. त्या अनुषंगाने तरी पूर रेषेतील गावांचा नव्याने सर्व्हे होईल अशी अपेक्षा असतांना तसे झाले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील जुन्याच सर्व्हेवरून संबधीत गावांना सतर्क केले जात आहे. 
पूर रेषेतील गावे
जिल्ह्यात पूर रेषेतील २९ गावे प्रशासनाने निश्चित केली आहेत. नदी काठावरील अशा गावांना दोन प्रकारात विभागले जाते. एक रेड लाईनची गावे व दुसरी स्काय लाईनची गावे. स्काय लाईनच्या गावांमध्ये नदीला थोडाजरी पूर आला तरी नदीचे पाणी थेट गावात किंवा गावातील नदीकाठच्या वस्तीत घुसते. तर रेड लाईनच्या गावांमध्ये नदी किंवा नाल्याला अती पूर आला तर ते पाणी थेट गावात घुसते व गावाचा संपर्क तुटतो.
अशी आहेत गावे
रेड लाईन अर्थात लाल पट्ट्यातील गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येते. या गावांची संख्या २९ असून त्यात शहादा तालुक्यातील १८ तर नंदुरबार तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. 
या गावांमध्ये शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासखेडा, नांदरखेडा, प्रकाशा या गावांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदा, आमळथे, ओसर्ली, खापरखेडा, ओसर्ली आणि कोपर्ली या गावांचा समावेश आहे. अती पूर आला तरच या गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते असे प्रशासनाचे म्हणने आहे. तोपर्यंत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळत असतो असेही सांगण्यात आले.
चार तालुक्यात एकही नाही
रेड लाईनची निश्चित केलेल्या गावांच्या भौगोलिक परिस्थितीवर नजर टाकल्यास सर्वच गावे ही केवळ तापी नदी काठावरील निवडण्यात आली आहेत. परिणामी शहादा व नंदुरबार तालुक्यातीलच गावांचा त्यात समावेश झाला आहे. 
जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाºया नद्यांमध्ये तापी व्यतिरिक्त नर्मदा ही मोठी नदी तर गोमाई, रंगावली, शिवण, देहली, उदय, सुसरी आदी लहान नद्या देखील आहेत. या नद्यांच्या काठावर देखील मोठ्या प्रमाणावर गावे आहेत. या नद्यांना अतिवृष्टी झाल्यास मोठा पूर देखील येतो. त्याचे पाणी गावालगतच्या वस्तीत शिरते. काही गावांचा संपर्क देखील तुटतो. असे असतांना या नदी काठांवरील गावांचा समावेशच पूर रेषेतील गावांमध्ये करण्यात आलेला नाही हे विशेष.
नव्याने सर्व्हे व्हावा
सध्या नदी, नाल्यांची अवस्था बदलली आहे. काही ठिकाणी नदी व नाल्यांचा प्रवाहात किंचितसा बदल देखील झाला आहे. तापी व इतर नद्यांमधून होणारा वाळूचा बेसुमार उपसांमुळे काठावरील गावांना आधीच पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे नदी, नाल्याला थोडाजरी पूर आला तरी मोठा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. ही बाब लक्षात घेता नव्याने सर्व्हेक्षण व त्यादृष्टीने उपाययोजना होणे देखील आवश्यक ठरणार आहे.