शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये पूर रेषेच्या गावांचा नव्याने सर्व्हेच नाही

By admin | Updated: June 7, 2017 13:46 IST

१५ वर्षांपूर्वीच्या सर्व्हेवरच उपाययोजना : चार तालुक्यात तर एकही गाव नाही

आॅनलाईन लोकमत/मनोज शेलार 
नंदुरबार,दि.७ - जिल्ह्यातील पूर रेषेतील गावांचा नव्याने सर्व्हेच करण्यात आलेला नाही. १५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारावरच दरवर्षी उपाययोजना करण्यात येतात. यंदा देखील तीच स्थिती आहे. जिल्ह्यात रेड लाईन अंतर्गत २९ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही सर्व गावे केवळ नंदुरबार व शहादा तालुक्यातीलच आहेत. इतर तालुक्यांमध्ये अशी शक्यताच नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे.
पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्यावर अनेक गावांचा संपर्क तुटतो. अनेक गावातील काही वस्त्या पाण्याखाली येतात. अशा ठिकाणी उपाययोजना कराव्या म्हणून प्रशासन पावसाळ्यापुर्वी बैठका घेवून संबधीतांना सुचना देत असतात. परंतु गांभिर्याने उपाययोजना होतच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी पाचोराबारी गावाची घटना घडली. त्या अनुषंगाने तरी पूर रेषेतील गावांचा नव्याने सर्व्हे होईल अशी अपेक्षा असतांना तसे झाले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील जुन्याच सर्व्हेवरून संबधीत गावांना सतर्क केले जात आहे. 
पूर रेषेतील गावे
जिल्ह्यात पूर रेषेतील २९ गावे प्रशासनाने निश्चित केली आहेत. नदी काठावरील अशा गावांना दोन प्रकारात विभागले जाते. एक रेड लाईनची गावे व दुसरी स्काय लाईनची गावे. स्काय लाईनच्या गावांमध्ये नदीला थोडाजरी पूर आला तरी नदीचे पाणी थेट गावात किंवा गावातील नदीकाठच्या वस्तीत घुसते. तर रेड लाईनच्या गावांमध्ये नदी किंवा नाल्याला अती पूर आला तर ते पाणी थेट गावात घुसते व गावाचा संपर्क तुटतो.
अशी आहेत गावे
रेड लाईन अर्थात लाल पट्ट्यातील गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येते. या गावांची संख्या २९ असून त्यात शहादा तालुक्यातील १८ तर नंदुरबार तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. 
या गावांमध्ये शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासखेडा, नांदरखेडा, प्रकाशा या गावांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदा, आमळथे, ओसर्ली, खापरखेडा, ओसर्ली आणि कोपर्ली या गावांचा समावेश आहे. अती पूर आला तरच या गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते असे प्रशासनाचे म्हणने आहे. तोपर्यंत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळत असतो असेही सांगण्यात आले.
चार तालुक्यात एकही नाही
रेड लाईनची निश्चित केलेल्या गावांच्या भौगोलिक परिस्थितीवर नजर टाकल्यास सर्वच गावे ही केवळ तापी नदी काठावरील निवडण्यात आली आहेत. परिणामी शहादा व नंदुरबार तालुक्यातीलच गावांचा त्यात समावेश झाला आहे. 
जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाºया नद्यांमध्ये तापी व्यतिरिक्त नर्मदा ही मोठी नदी तर गोमाई, रंगावली, शिवण, देहली, उदय, सुसरी आदी लहान नद्या देखील आहेत. या नद्यांच्या काठावर देखील मोठ्या प्रमाणावर गावे आहेत. या नद्यांना अतिवृष्टी झाल्यास मोठा पूर देखील येतो. त्याचे पाणी गावालगतच्या वस्तीत शिरते. काही गावांचा संपर्क देखील तुटतो. असे असतांना या नदी काठांवरील गावांचा समावेशच पूर रेषेतील गावांमध्ये करण्यात आलेला नाही हे विशेष.
नव्याने सर्व्हे व्हावा
सध्या नदी, नाल्यांची अवस्था बदलली आहे. काही ठिकाणी नदी व नाल्यांचा प्रवाहात किंचितसा बदल देखील झाला आहे. तापी व इतर नद्यांमधून होणारा वाळूचा बेसुमार उपसांमुळे काठावरील गावांना आधीच पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे नदी, नाल्याला थोडाजरी पूर आला तरी मोठा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. ही बाब लक्षात घेता नव्याने सर्व्हेक्षण व त्यादृष्टीने उपाययोजना होणे देखील आवश्यक ठरणार आहे.