शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला विकसनशील आणि समस्यामुक्त शहर करणारच : नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासाठी जे जे शक्य असेल ते ते विकासाचे आणि सेवेची कामे करण्याचा आपला प्रयत्न राहील. गेल्या 15 वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. आता लोकनियुक्त नगराध्यक्षा असल्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. राज्यातील पहिल्या दहा शहरात नंदुरबार आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी लोकमत संवाद कार्यक्रमात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासाठी जे जे शक्य असेल ते ते विकासाचे आणि सेवेची कामे करण्याचा आपला प्रयत्न राहील. गेल्या 15 वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. आता लोकनियुक्त नगराध्यक्षा असल्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. राज्यातील पहिल्या दहा शहरात नंदुरबार आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी लोकमत संवाद कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बुधवारी ह्यलोकमतह्ण कार्यालयास भेट दिली. ह्यलोकमतह्णचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. शहराच्या विकासाच्या योजना आणि झालेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडतांना सांगितले, पहिल्यांदा अर्थात 2001 साली आपण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. या शहराची लेक आणि सून असल्यामुळे शहरवासीयांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला. त्या विश्वाला तडा न जाऊ देता आपण पाच वर्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने विकासाची कामे केली. त्याकाळी झालेली कामे ही सर्वाधिक कामे म्हणून गणली गेली. त्यानंतरच्या निवडणुकीतही मला नगरसेवक म्हणून निवडून दिले. नंतर नगराध्यक्षा म्हणून पुन्हा संधी मिळाली. गेल्या पंचवार्षीकला देखील पुर्ण पाच वर्ष नगराध्यक्षा म्हणून राहण्याची संधी मिळाली. या 15 वर्षाच्या कालखंडात शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. एक विकसीत शहर म्हणून नावारुपास आणले.यंदाच्या पालिका निवडणुकीत देखील थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून मला मोठय़ा मताधिक्याने निवडून देत पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. नंदुरबारात सर्व विकासाची कामे केली गेली आहे. काही राहिलेली कामे आता पुर्ण करण्यात येणार आहे. नंदुरबारात काय नाही असे आता विचारले जाते. निवडणुकीत जनतेला 24 तास पाणी पुरवठा करण्याचे सांगितले होते. त्यावर काम सुरू झाले आहे. वर्धा येथील संस्थेला सव्र्हेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शहराच्या 2040 सालची लोकसंख्या गृहित धरून पाणी पुरवठय़ाचे नियोजन केलेले आहे. शिवाय गुरूत्वाकर्षणामुळे जादा पंपींगची गरज लागत नाही. ही बाब लक्षात घेता शहरात 24 तास पाणी पुरवठय़ाची योजना यशस्वी होईल यात शंका नाही. त्यासाठी मिटर पद्धत अवलंबवावी लागेल. त्यातही जनतेचाच फायदा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आताच्या घडीला खान्देशातील सर्वात कमी पाणीपट्टी आकारणारी नंदुरबार पालिका आहे. विस्तारीत पाणी पुरवठा योजना शासनाने मंजुर केली तेंव्हा पाच वर्षात टप्प्याटप्याने पाणी पट्टी वाढविण्याचे निर्देश होते. परंतु जनतेच्या हिताकरीता ते वाढविले नाहीत.पालिकेची अद्ययावत इमारत आज उभी राहिली असती. परंतु केवळ विरोधाला विरोध म्हणून ते काम रखडविण्यात आले. आता जुन्या न्यायालयाच्या जागेची अडचण लवकरच सुटून पालिकेची इमारत आकारास येईल असा विश्वास रत्ना रघुवंशी यांनी व्यक्त केला.रस्ते प्रकल्प मार्गी लागला आहे. काही ठिकाणी रस्त्यांची तुरळक कामे अपुर्ण आहेत ती पुर्ण करण्यात येतील. स्वच्छतेबाबत देखील राज्यातील मोजक्या शहरांमध्ये नंदुरबार शहर आले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच कार्यान्वीत होणार आहे. जल-मल:निसारण केंद्र देखील सुरू झाले आहे. शहराला आधीच हगणदारीमुक्त गाव घोषीत करण्यात आलेले आहे. जनतेच्या सहकार्यानेच हे सर्व शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.खान्देशातील किंबहुना राज्यातील माँ-बेटी गार्डन देखील नंदुरबार पालिका आकारास आणत आहे. वळण रस्त्यावरील पालिकेच्या सर्वात मोठय़ा खुल्या जागेत हे गार्डन उभारण्यात येणार आहे. या गार्डनमध्ये भारतातील कतूरूत्ववान व आजची पिढीला आदर्शवत राहतील अशा महिलांचे पुतळे व अर्थात शिल्प या ठिकाणी बसवले जाणार आहे.पालिकेने केवळ नागरी सुविधा पुरविणे एवढेच ध्येय ठेवले नाही तर या शहरातील नागरिकांच्या हितासाठी जे जे शक्य असेल ते देण्याचा आणि करण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यात नागरिकांचा आरोग्याकडेही लक्ष दिले आहे. अवघ्या 200 रुपयात डायलेसीसची सोय आहे. 200 रुपयातच सोनोग्राफी, 70 रुपयात एक्सरे काढला जातो. रक्त तपासणी अवघ्या 20 रुपयात केली जाते. लवकरच राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत दोन दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. बांधकाम पुर्ण झाले असून केवळ अधिकारी, कर्मचा:यांची भरती तेवढी बाकी आहे. येत्या 15 दिवसात ते देखील पुर्ण होऊन हे दोन्ही दवाखाने सुरू करण्याचा मानस आहे. शिवाय पालिकेचेच 20 खाटांचे रुग्णालय सुरू करून ते जीवनदायी योजनेत समाविष्ट करून सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न त्यातून राहणार आहे.विद्याथ्र्यासाठी ई-लायब्रररी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी बारावीच्या विद्याथ्र्यासाठी एमएचसीईटी चे वर्ग विनामुल्य आयोजित करण्यात येतात. महिलांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित करून स्वयंरोजगारासाठी साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नंदनगरीवासीयांचा विश्वासाच्या बळावर शहराला आणखी पुढे नेण्यासाठी आपला प्रयत्न आहे. येत्या पाच वर्षात शहराचे रुप आणखी बदललेले दिसेल असा विश्वासही नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी व्यक्त केला.