शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

नंदुरबार लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:37 IST

शहाद्यात काँग्रेसचा मेळावा : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती

शहादा : आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी शहादा येथे मंगळवारी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केला. मेळाव्यास नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे दर्शनही घडले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर टीका करताना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहनही मेळाव्यात करण्यात आले.नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा मेळावा शहादा येथील खरेदी-विक्री संघाच्या आवारात मंगळवारी झाला. अध्यक्षस्थानी माजी खासदार माणिकराव गावित होते. या वेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी खासदार बापू चौरे, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार काशीराम पावरा, आमदार डी.एस. अहिरेल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रकाशराव सोनवणे, जिल्हा प्रभारी योगेश पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर, शिरीष नाईक, भरत गावीत, रामचंद्र पाटील, रमेश गावीत, दत्तू चोरे, आत्माराम बागले, रतन पाडवी, कुणाल वसावे, संजय माळी, सी.के. पाडवी, विक्रम पाडवी, रोहिदास पाडवी, प्रा.संजय जाधव, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, गौतम जैन, जि.प. सदस्या संगीता पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, सुनील सखाराम पाटील , प्रेमसिंग आहेर, रवींद्र रावल, नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, सभापती रंजना नाईक, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शमीमबी कुरेशी, कंचनबाई पाटील, शांताबाई पवार, दीपक पटेल, विक्रम पाडवी आदी उपस्थित होते.यावेळी राज्य सरचिटणीस सोनवणे म्हणाले की, राज्य व देशात आज वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. जनता हवालदिल झाली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. यातून सावरायचे असेल तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. देशाला विकासाची दिशा देण्यासाठी आणि या नौटंकी सरकारला घालविण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.अ‍ॅड.पद्माकर वळवी म्हणाले की, नदुंरबार जिल्हा क्राँग्रेसमय आहे. शेतकरी-कष्टकºयांना उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे कायदे देश व जनतेच्या हिताचे होते ते मोडकळीस आणण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करीत आहे. जनधन योजनेतही भाजप सरकारने गोरगरीबांची लूट चालवली आहे. नुकतीच जातपडताळणी समित्या रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याचे सांगून या निर्णयाचा आपण निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पाटील म्हणाले की, शेतकरी व सहकारविरोधी असणाºया या सरकारने सहकार मोडकळीस आणण्याचे काम केले आहे. शेतकºयांचे सातबारे आजही कोरे नाहीत. काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही, आपणच आपल्याला हरवतो त्यामुळे आपले घर आपणच सांभाळताना युवकांना जवळ केले पहिजे. ज्यांना आपले महत्व नाही त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी म्हणाले की, उपसा सिंचन योजना पूर्ण होणे आवश्यक होते. रहाट्यावड धारणालाही अडचणी आणल्या जात असून विकासाच्या नावावर दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. श्याम सनेर म्हणाले की, शेतकरी-कष्टकरी, जनतेच्या विकासासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र घोडेबाजारासाठी निधी आहे. पर्यटनाच्या नावाने त्याच निधीवर डल्ला मारुन जनतेला लुटण्याचे काम हे सरकार करीत असून पीक विमा कर्ज, गॅस अनुदान आदी योजनांच्या नावाने जनतेचा खिसा खाली करणाºया या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले. माणिकराव गावीत म्हणाले की, शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेची केंद्र व राज्य सरकारकडून थट्टा सुरू आहे. आश्वासनांची खैरात वाटणाºया या सरकारला घरी बसविण्याची वेळ आल्याचे सांगितले. आमदार डी.एस. अहिरे, बापू चौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर मोरे यांनी केले.