शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नंदुरबार लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:37 IST

शहाद्यात काँग्रेसचा मेळावा : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती

शहादा : आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी शहादा येथे मंगळवारी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केला. मेळाव्यास नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे दर्शनही घडले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर टीका करताना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहनही मेळाव्यात करण्यात आले.नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा मेळावा शहादा येथील खरेदी-विक्री संघाच्या आवारात मंगळवारी झाला. अध्यक्षस्थानी माजी खासदार माणिकराव गावित होते. या वेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी खासदार बापू चौरे, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार काशीराम पावरा, आमदार डी.एस. अहिरेल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रकाशराव सोनवणे, जिल्हा प्रभारी योगेश पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर, शिरीष नाईक, भरत गावीत, रामचंद्र पाटील, रमेश गावीत, दत्तू चोरे, आत्माराम बागले, रतन पाडवी, कुणाल वसावे, संजय माळी, सी.के. पाडवी, विक्रम पाडवी, रोहिदास पाडवी, प्रा.संजय जाधव, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, गौतम जैन, जि.प. सदस्या संगीता पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, सुनील सखाराम पाटील , प्रेमसिंग आहेर, रवींद्र रावल, नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, सभापती रंजना नाईक, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शमीमबी कुरेशी, कंचनबाई पाटील, शांताबाई पवार, दीपक पटेल, विक्रम पाडवी आदी उपस्थित होते.यावेळी राज्य सरचिटणीस सोनवणे म्हणाले की, राज्य व देशात आज वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. जनता हवालदिल झाली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. यातून सावरायचे असेल तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. देशाला विकासाची दिशा देण्यासाठी आणि या नौटंकी सरकारला घालविण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.अ‍ॅड.पद्माकर वळवी म्हणाले की, नदुंरबार जिल्हा क्राँग्रेसमय आहे. शेतकरी-कष्टकºयांना उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे कायदे देश व जनतेच्या हिताचे होते ते मोडकळीस आणण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करीत आहे. जनधन योजनेतही भाजप सरकारने गोरगरीबांची लूट चालवली आहे. नुकतीच जातपडताळणी समित्या रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याचे सांगून या निर्णयाचा आपण निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पाटील म्हणाले की, शेतकरी व सहकारविरोधी असणाºया या सरकारने सहकार मोडकळीस आणण्याचे काम केले आहे. शेतकºयांचे सातबारे आजही कोरे नाहीत. काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही, आपणच आपल्याला हरवतो त्यामुळे आपले घर आपणच सांभाळताना युवकांना जवळ केले पहिजे. ज्यांना आपले महत्व नाही त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी म्हणाले की, उपसा सिंचन योजना पूर्ण होणे आवश्यक होते. रहाट्यावड धारणालाही अडचणी आणल्या जात असून विकासाच्या नावावर दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. श्याम सनेर म्हणाले की, शेतकरी-कष्टकरी, जनतेच्या विकासासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र घोडेबाजारासाठी निधी आहे. पर्यटनाच्या नावाने त्याच निधीवर डल्ला मारुन जनतेला लुटण्याचे काम हे सरकार करीत असून पीक विमा कर्ज, गॅस अनुदान आदी योजनांच्या नावाने जनतेचा खिसा खाली करणाºया या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले. माणिकराव गावीत म्हणाले की, शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेची केंद्र व राज्य सरकारकडून थट्टा सुरू आहे. आश्वासनांची खैरात वाटणाºया या सरकारला घरी बसविण्याची वेळ आल्याचे सांगितले. आमदार डी.एस. अहिरे, बापू चौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर मोरे यांनी केले.