शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

जागेअभावी नंदुरबारचा मिरची बाजार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराची ओळख असलेल्या मिरची पथारींसाठी आता जागेची शोधाशोध करावी लागणार आहे. सध्या असलेल्या जागेवर रहिवास क्षेत्र वाढल्यामुळे या ठिकाणचे नागरिक मिरची पथारींना विरोध करू लागले आहेत. त्यामुळे मिरची बाजार आणि पथारी आता शहराबाहेर जाण्याची शक्यता आहे. योग्य जागा आणि आवश्यक सुविधा न मिळाल्यास नंदुरबारचा मिरची बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराची ओळख असलेल्या मिरची पथारींसाठी आता जागेची शोधाशोध करावी लागणार आहे. सध्या असलेल्या जागेवर रहिवास क्षेत्र वाढल्यामुळे या ठिकाणचे नागरिक मिरची पथारींना विरोध करू लागले आहेत. त्यामुळे मिरची बाजार आणि पथारी आता शहराबाहेर जाण्याची शक्यता आहे. योग्य जागा आणि आवश्यक सुविधा न मिळाल्यास नंदुरबारचा मिरची बाजार नामशेष होण्याची शक्यता आहे.नंदुरबारची ओळख लाल मिरचीच्या माध्यमातून सर्वदूर आहे. लाखो क्विंटल मिरचीची आवक दरवर्षी होते. त्या माध्यमातून कोटय़ावधी रुपयांची उलाढाल देखील होत असते. या माध्यमातून मिरची प्रक्रिया उद्योगही नंदुरबारात मोठय़ा स्वरूपात सुरू झाले. चिली पार्क देखील त्याच अनुषंगाने येथे प्रस्तावीत आहे. परंतु मिरचीचा लिलाव, साठवणूक आणि वाळविण्यासाठीची जागाच आता उलब्ध होत नसल्यामुळे मिरची बाजारावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. येत्या काळात हा बाजार शहराबाहेर स्थलांतरीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोंडाईचा, निझर स्पर्धेतनंदुरबारातील मिरची बाजाराच्या स्पर्धेत आता दोंडाईचा आणि गुजरातमधील निझर बाजार समिती स्पर्धेत उतरली आहे. दोंडाईचा येथे देखील दरवर्षी हजारो क्विंटल मिरचीची आवक होते. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. निझर चे मार्केट देखील आता स्पर्धेत आहे. पूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर या भागासह तळोदा, निझर भागातील शेतकरी नंदुरबार बाजारात मिरची विक्रीसाठी आणत होते. परंतु दोंडाईचा आणि निझर मार्केटचा पर्याय खुला झाल्याने त्या भागातील शेतकरी आता तिकडे वळू लागले आहे. त्याचा परिणाम येथील आवकवर होऊ लागला असल्याचे चित्र आहे. आता पुन्हा पथारींसाठी योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही तर हा उद्योग संकटात येईलच परंतु येथील मिरची आवक देखील मंदावेल अशी भिती व्यक्त केली जात आहे.व्यापा:यांची मागणी यासंदर्भात व्यापा:यांनी जिल्हाधिका:यांकडे पथारींसाठी जागा उ्पलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. उद्योग टिकवायचे असतील तर योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी येथील मिरची व्यापारी आणि उद्योजकांनी केली आहे.नंदुरबारचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. वळण रस्त्याच्या दोन्ही बाजुला अनेक वसाहती तयार होत आहेत. मिरची पथारीवरील जागा मालकांनी आता त्या भागात प्लॉट पाडून त्यांची विक्री सुरू केली आहे. दवाखाने, व्यापारी प्रतिष्ठाने देखील या ठिकाणी येवू लागली आहेत. ही बाब लक्षात घेता स्थानिकांचा मिरची पथारींना विरोध वाढू लागला आहे. उन्हाळ्यात तसेच हवेचा वेग जास्त राहिल्यास मिरचीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. याशिवाय वळण रस्त्यावरील वाहतूक देखील वाढली आहे. त्यामुळे वाहन चालकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नंदुरबारातील मिरची बाजार आणि येथील मिरची राज्यात  सर्वदूर प्रसिद्ध आहे. लाल मिरचीचे नंदुरबार अशी ओळख देखील आहे. मिरची हंगामात अर्थात नोव्हेंबर ते एप्रिल र्पयत शेकडो   हेक्टर क्षेत्रावर लाल मिरचीचा गालिचा पसरलेला असतो.      वळण रस्त्याच्या दोन्ही बाजुला हे चित्र गेल्या वर्षार्पयत दिसत होते. बाहेरगावच्या लोकांना या मिरची पथारींचे मोठे अप्रूप होते. बाजार समिती व व्यापारी जागा मालकांकडून भाडे तत्वावर ही जागा मिरची हंगामाच्या कालावधीत घेत होते. परंतु गेल्या दोन   ते तीन वर्षापासून मिरची पथारींना अवकळा निर्माण होत       आहे.नंदुरबारातील मिरची पथारी आता शहराबाहेर तसेच पाच किलोमिटरच्या आत नेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी जागेची चाचपणी देखील सुरू करण्यात आली  आहे. उमर्दे रस्त्याला लागूनच जागा मिळावी यासाठी     बाजार समिती प्रय}शील आहे. भाडेतत्वावर ही जागा राहणार आहे. साधारणत: दीडशे ते दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. एवढी मोठी जागा एकाच ठिकाणी मिळणे दुरापस्थ आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या आवाहनाला जमीन मालक कसे प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागून आहे. मिरची पथारीसाठीची जागा योग्य ठिकाणी न मिळाल्यास येथील मिरची उद्योगावर संकट येण्याची शक्यता आहे. येथील व्यापारी मिरची हंगामात हजारो क्विंटल मिरची खरेदी करून ती पथारींवर वाळवून घेतात. त्यानंतर ती मिरची आपल्या गोदाम व कोल्डस्टोरेजमध्ये साठवतात. प्रक्रिया उद्योगासाठी ही मिरची वर्षभर वापरली जाते. नंदुरबारात 20 ते 25 प्रक्रिया उद्योग आहे. तेथे तयार झालेली मिरची पावडर राज्यासह देशभरात विक्री केली जाते. एगमार्क आणि विशिष्ट ओळख असलेल्या येथील मिरची पावडरला मागणी देखील आहे. काही वर्ष येथील मिरची पावडर ही दुबई व आखाती देशात देखील निर्यात झाली होती. आताची परिस्थिती पाहिली तर हे उद्योग संकटात येण्याची शक्यता आहे.