शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नंदुरबारातील बोंडअळीग्रस्तांना 90 कोटींची गरज

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: February 6, 2018 13:24 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात बोंडअळीने नुकसान झालेल्या 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख 22 हजार 145 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े यात जिरायत व बागायत या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त असलेले एकूण 95 हजार 802 हेक्टर क्षेत्र आह़ेतालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात बोंडअळीने नुकसान झालेल्या 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख 22 हजार 145 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े यात जिरायत व बागायत या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त असलेले एकूण 95 हजार 802 हेक्टर क्षेत्र आह़ेतालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आह़े व आवश्यक असलेल्या मदतीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आह़े बोंडअळीग्रस्त जिरायतदार असलेल्या 52 हजार 492 शेतक:यांच्या 55 हजार 754 हेक्टरासाठी  38 कोटी 63 लाख 72 हजार 940 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़ेतर, बागायतदार असलेल्या 33 हजार 403 शेतक:यांच्या 40 हजार 47 हेक्टरसाठी 51 कोटी 1 लाख 49 हजार 205 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े जिरायतदार व बागायतदार असलेल्या 85 हजार 895 शेतक:यांचे  95 हजार 802 हेक्टर क्षेत्र बोंडअळीग्रस्त आह़े त्यासाठी 89 कोटी 65 लाख 22 हजार 115 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े गेल्या अनेक दिवसांपासून तालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यात येत होती़ परंतु काही ठिकाणी पंचनामे करण्यास अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत होत़े त्यामुळे पंचनामे करण्यासही कृषी विभागाला विलंब झाला होता़ अनेक शेतक:यांना डावलले.बोंडअळीच्या थैमानामुळे येथील शेतकरी पूर्णपणे भरडला गेला आह़े त्यामुळे बहुतेक शेतक:यांनी आपले क्षेत्रावरील कपाशीच्या पिकावर नांगर फिरवला होता़ बोंडअळीने कपाशी खाऊन टाकल्याने शेतक:यांनी दुसरे पिक घेण्यासाठी शेत रिकामे केले होत़े परंतु यात त्यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानदेखील झाले होत़े कपाशी पेरणीसाठी बि-बियाणे आदींवर मोठा खर्च करण्यात आला होता़ दुसरीकडे कृषी विभागाकडून मात्र, ज्या क्षेत्रावर सध्याच कपाशी आहे अशांचेच पंचनामे करण्यात आले होत़े त्यामुळे ज्या शेतक:यांनी कपाशी काढून टाकली आहे व दुसरे पिक घेतले आहे त्यांच्या आधीच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आह़े त्यामुळे अनेक शेतक:यांनी कृषी विभागाच्या या पंचनाम्यावर आपली नाराजी व्यक्त केली आह़े दरम्यान असे असले तरी, ज्या शेतक:यांच्या पांढ:या सोन्याला खरोखर बोंडअळीने खाल्ले आहे अशा ख:या लाभाथ्र्याची मात्र यात हेडसांड होत असल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा बोंडअळीने थैमान घातले होत़े़ यात, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरीदेखील पुरता भरडला गेला आह़े परंतु प्रशासनाच्या चालढकलपणामुळे त्याला पहिले आसमानी व नंतर  सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आह़े जिल्ह्यात कापूस पेरणी केलेल्या शेतक:यांची संख्या एकूण 91 हजार 998 ऐवढी आह़े त्यापैकी तब्बल 85 हजार 895 शेतक:यांची बोंडअळीमुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आह़े त्यात, जिरायतदार शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आह़े जवळपास 55 हजार 754 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आह़े त्यामुळे जिरायतदार शेतकरी यात चांगला आर्थिक पेचप्रसंगात सापडला आह़े शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आह़े