शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

नंदुरबारात बोगस ‘बी.टी.’चा यंदाही सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:50 IST

तस्करी व विक्री रोखण्यासाठी उपाययोजना : शेतक:यांमधील जनजागृतीचा अभाव

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : जिल्ह्यात यंदाही बोगस बी.टी. कापूस बियाण्यांचा सुळसुळाट  मोठय़ा प्रमाणावर होत आहे. गुजरातमधील काही कंपन्यांनी जिल्ह्यातील दलालांना हाताशी धरून शेतक:यांच्या माथी बोगस बी.टी. बियाणे मारले जात असल्याचे चित्र आहे. म्हसावद येथे सापडलेले बोगस बी.टी. बियाणेदेखील गुजरातमधूनच आलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बोगस बियाण्यांची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात उन्हाळी कापूस लागवडीचे क्षेत्र साधारणत: 18 ते 20 हजार हेक्टर आहे. बागायतदार शेतकरी उन्हाळी कापूस लागवड करतात. याशिवाय साधारणत: 80 हजार हेक्टर क्षेत्रावर कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड करीत असतात. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या 35 टक्के क्षेत्र हे एकटय़ा कापूस पिकाचे आहे. त्यामुळे कापसाचे बोगस बियाणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर खपविले जाते. गेल्यावर्षीदेखील तणरोधक बी.टी. बियाण्यांची मोठय़ा प्रमाणावर खासगी एजंटांमार्फत विक्री झाल्याने शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागला. यंदादेखील ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप आढावा बैठकीतदेखील याबाबत चर्चा करण्यात आली होती.2,153 क्विंटल बी.टी. बियाणेजिल्ह्यातील साधारणत: एक लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस लागवडीची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दोन हजार 153 क्विंटल कापूस बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात 538 क्विंटल, नवापूर तालुक्यात 452 क्विंटल, शहादा तालुक्यात 560 क्विंटल, तळोदा तालुक्यात 129 क्विंटल, अक्कलकुवा तालुक्यात 323 क्विंटल, धडगाव तालुक्यात 151 क्विंटल बी.टी. कापूस बियाण्यांचे नियोजन आहे. ठोस उपाययोजना करावीबोगस बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे. खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. कृषी विभागासह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. परंतु केवळ गुणवत्ता नियंत्रक पथक यंदाही नेहमीप्रमाणे स्थापन करण्यात आले आहे. ठोस कारवाईसाठी पथक नसल्याची स्थिती आहे.तणनाशक रोधक बी.टी.कपास कार्यक्षेत्रामध्ये ग्लायफॉसेटचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे माती प्रदूषण, हवा प्रदूषण व जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असून, मनुष्य प्राणी जीवनावर घातक परिणाम होत आहे. या ग्लायफॉसेट हे कर्करोगासाठी महत्त्वाचे कारण आहे. वरील बाब पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे उल्लंघन करणारे आहे. तसेच तणनाशक रोधक बी.टी. कापूस लागवड केल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर होतो. पिकाचे व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकारच्या कापसाची लागवड करणे टाळणे आवश्यक आहे. बोगस बियाणे व खते विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने 22 निरीक्षक नेमले आहेत.  त्यात पूर्णवेळ निरीक्षक एक व अर्धवेळ 21 जणांचा समावेश आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिका:यांनी यापूर्वीच ज्या निरीक्षकांच्या क्षेत्रात बोगस बियाणे विक्री होईल त्यांना त्यासाठी जबाबदार धरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय संबंधित विक्रेत्यांविरुद्धदेखील पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत.