शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

नंदुरबारात बोगस ‘बी.टी.’चा यंदाही सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:50 IST

तस्करी व विक्री रोखण्यासाठी उपाययोजना : शेतक:यांमधील जनजागृतीचा अभाव

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : जिल्ह्यात यंदाही बोगस बी.टी. कापूस बियाण्यांचा सुळसुळाट  मोठय़ा प्रमाणावर होत आहे. गुजरातमधील काही कंपन्यांनी जिल्ह्यातील दलालांना हाताशी धरून शेतक:यांच्या माथी बोगस बी.टी. बियाणे मारले जात असल्याचे चित्र आहे. म्हसावद येथे सापडलेले बोगस बी.टी. बियाणेदेखील गुजरातमधूनच आलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बोगस बियाण्यांची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात उन्हाळी कापूस लागवडीचे क्षेत्र साधारणत: 18 ते 20 हजार हेक्टर आहे. बागायतदार शेतकरी उन्हाळी कापूस लागवड करतात. याशिवाय साधारणत: 80 हजार हेक्टर क्षेत्रावर कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड करीत असतात. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या 35 टक्के क्षेत्र हे एकटय़ा कापूस पिकाचे आहे. त्यामुळे कापसाचे बोगस बियाणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर खपविले जाते. गेल्यावर्षीदेखील तणरोधक बी.टी. बियाण्यांची मोठय़ा प्रमाणावर खासगी एजंटांमार्फत विक्री झाल्याने शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागला. यंदादेखील ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप आढावा बैठकीतदेखील याबाबत चर्चा करण्यात आली होती.2,153 क्विंटल बी.टी. बियाणेजिल्ह्यातील साधारणत: एक लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस लागवडीची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दोन हजार 153 क्विंटल कापूस बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात 538 क्विंटल, नवापूर तालुक्यात 452 क्विंटल, शहादा तालुक्यात 560 क्विंटल, तळोदा तालुक्यात 129 क्विंटल, अक्कलकुवा तालुक्यात 323 क्विंटल, धडगाव तालुक्यात 151 क्विंटल बी.टी. कापूस बियाण्यांचे नियोजन आहे. ठोस उपाययोजना करावीबोगस बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे. खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. कृषी विभागासह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. परंतु केवळ गुणवत्ता नियंत्रक पथक यंदाही नेहमीप्रमाणे स्थापन करण्यात आले आहे. ठोस कारवाईसाठी पथक नसल्याची स्थिती आहे.तणनाशक रोधक बी.टी.कपास कार्यक्षेत्रामध्ये ग्लायफॉसेटचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे माती प्रदूषण, हवा प्रदूषण व जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असून, मनुष्य प्राणी जीवनावर घातक परिणाम होत आहे. या ग्लायफॉसेट हे कर्करोगासाठी महत्त्वाचे कारण आहे. वरील बाब पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे उल्लंघन करणारे आहे. तसेच तणनाशक रोधक बी.टी. कापूस लागवड केल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर होतो. पिकाचे व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकारच्या कापसाची लागवड करणे टाळणे आवश्यक आहे. बोगस बियाणे व खते विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने 22 निरीक्षक नेमले आहेत.  त्यात पूर्णवेळ निरीक्षक एक व अर्धवेळ 21 जणांचा समावेश आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिका:यांनी यापूर्वीच ज्या निरीक्षकांच्या क्षेत्रात बोगस बियाणे विक्री होईल त्यांना त्यासाठी जबाबदार धरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय संबंधित विक्रेत्यांविरुद्धदेखील पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत.