शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात बोगस ‘बी.टी.’चा यंदाही सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:50 IST

तस्करी व विक्री रोखण्यासाठी उपाययोजना : शेतक:यांमधील जनजागृतीचा अभाव

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : जिल्ह्यात यंदाही बोगस बी.टी. कापूस बियाण्यांचा सुळसुळाट  मोठय़ा प्रमाणावर होत आहे. गुजरातमधील काही कंपन्यांनी जिल्ह्यातील दलालांना हाताशी धरून शेतक:यांच्या माथी बोगस बी.टी. बियाणे मारले जात असल्याचे चित्र आहे. म्हसावद येथे सापडलेले बोगस बी.टी. बियाणेदेखील गुजरातमधूनच आलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बोगस बियाण्यांची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात उन्हाळी कापूस लागवडीचे क्षेत्र साधारणत: 18 ते 20 हजार हेक्टर आहे. बागायतदार शेतकरी उन्हाळी कापूस लागवड करतात. याशिवाय साधारणत: 80 हजार हेक्टर क्षेत्रावर कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड करीत असतात. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या 35 टक्के क्षेत्र हे एकटय़ा कापूस पिकाचे आहे. त्यामुळे कापसाचे बोगस बियाणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर खपविले जाते. गेल्यावर्षीदेखील तणरोधक बी.टी. बियाण्यांची मोठय़ा प्रमाणावर खासगी एजंटांमार्फत विक्री झाल्याने शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागला. यंदादेखील ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप आढावा बैठकीतदेखील याबाबत चर्चा करण्यात आली होती.2,153 क्विंटल बी.टी. बियाणेजिल्ह्यातील साधारणत: एक लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस लागवडीची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दोन हजार 153 क्विंटल कापूस बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात 538 क्विंटल, नवापूर तालुक्यात 452 क्विंटल, शहादा तालुक्यात 560 क्विंटल, तळोदा तालुक्यात 129 क्विंटल, अक्कलकुवा तालुक्यात 323 क्विंटल, धडगाव तालुक्यात 151 क्विंटल बी.टी. कापूस बियाण्यांचे नियोजन आहे. ठोस उपाययोजना करावीबोगस बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे. खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. कृषी विभागासह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. परंतु केवळ गुणवत्ता नियंत्रक पथक यंदाही नेहमीप्रमाणे स्थापन करण्यात आले आहे. ठोस कारवाईसाठी पथक नसल्याची स्थिती आहे.तणनाशक रोधक बी.टी.कपास कार्यक्षेत्रामध्ये ग्लायफॉसेटचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे माती प्रदूषण, हवा प्रदूषण व जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असून, मनुष्य प्राणी जीवनावर घातक परिणाम होत आहे. या ग्लायफॉसेट हे कर्करोगासाठी महत्त्वाचे कारण आहे. वरील बाब पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे उल्लंघन करणारे आहे. तसेच तणनाशक रोधक बी.टी. कापूस लागवड केल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर होतो. पिकाचे व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकारच्या कापसाची लागवड करणे टाळणे आवश्यक आहे. बोगस बियाणे व खते विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने 22 निरीक्षक नेमले आहेत.  त्यात पूर्णवेळ निरीक्षक एक व अर्धवेळ 21 जणांचा समावेश आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिका:यांनी यापूर्वीच ज्या निरीक्षकांच्या क्षेत्रात बोगस बियाणे विक्री होईल त्यांना त्यासाठी जबाबदार धरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय संबंधित विक्रेत्यांविरुद्धदेखील पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत.