शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात भाजप व काँग्रेसमध्येच पारंपरिक लढत रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:33 IST

नंदुरबार मतदारसंघ : सत्ताधारी कामाच्या बळावर जनतेपुढे जाणार, तर विरोधक गेल्या वेळच्या चुका सुधारताय

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पारंपरिक काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत काँग्रेसने मागील चुका सुधारत मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ.हीना विजयकुमार गावीत यांना आव्हान उभे राहणार आहे. काँग्रेस आघाडीतर्फे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचे नाव निश्चित आहे. त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून तयारीदेखील सुरू केली आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघाची गेल्या निवडणुकीपर्यंतची परंपरा लक्षात घेता काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. परंतु गेल्या निवडणुकीत मोदी लाट आणि आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा वैयक्तिक प्रभाव यामुळे खासदार डॉ. हीना गावीत या एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. नऊ वेळा निवडून आलेल्या माणिकराव गावीत यांना त्यांनी पराभूत केले होते. माणिकराव गावीत यांचे वय लक्षात घेता त्यांना यंदा उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित होते. त्यामुळे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी, जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावीत यांचीच नावे कळविण्यात आली. त्यात आमदार अ‍ॅड.पाडवी हे उजवे ठरले.विरोधक यावेळी आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांची एकजूट कालच्या मोर्चात दिसून आली.भाजप-सेना युती असली तरी भाजपला सेना कशी साथ देते यावरही खासदार डॉ.हीना गावीत यांचे गणित अवलंबून राहणार आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीने अंतर्गत त्यांना साथ दिली होती. यावेळीही राष्टÑवादीच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.दुसरीकडे काँग्रेसला यंदा चांगली अपेक्षा आहे. गेल्या निवडणुकीत आमदार अमरिशभाई पटेल हे धुळे मतदारसंघात अडकून पडल्याने शिरपूरमध्ये काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागला होता. यंदा आमदार पटेल हे नंदुरबार मतदारसंघात पूर्ण लक्ष घालणार आहेत. शहाद्याचे दीपक पाटील हे यंदा काँग्रेसकडे राहणार असून काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षपद देखील त्यांना देण्यात आले आहे. अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघ स्वत: अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचाच बालेकिल्ला आहेच. परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रकृतीमुळे या निवडणुकीपासून लांब राहणार असल्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. लोकसभा मतदारसंघाचा विचार करता सहा विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसकडे नवापूर, अक्कलकुवा, शिरपूर आणि साक्री मतदारसंघ आहे तर भाजपकडे केवळ नंदुरबार आणि तळोदा मतदारसंघ आहे. तळोद्याचे आमदार उदेसिंग पाडवी व खासदार डॉ.हीना गावीत यांचे पाच वर्षात जमू शकले नाही.एकूणच मोदी लाटेचा काहीसा कमी झालेला प्रभाव व काँग्रेसची आक्रमकता तर दुसरीकडे पाच वर्षातील विकास कामे व संसदेतील प्रभावी कामगिरी आणि मोदींचे वलय या बळावर अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत.